शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गाेड; जिल्ह्याला मिळाले २ कोटी ७० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

या नुकसान भरपाईपाेटी शासनाने नुकतीच २ कोटी ७० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. या मदतीचे वाटप दिवाळी पूर्व आपदग्रस्तांना वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निमार्ण होवून १३४५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. भरपाईपोटी शासनाने २ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे

ठळक मुद्देदिवाळीपूर्वी रक्कमेचे वाटप करण्याच्या सूचना : प्रती हेक्टरी १० हजार रुपयांप्रमाणे मिळणार नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : यंदा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचे नुकसान झाले होते. तर अतिवृष्टीमुळे घरांची सुध्दा पडझड झाली होती. पुराचा सर्वाधिक फटका गोंदिया व तिरोडा तालुक्यातील ४० गावांना बसला होता. या नुकसान भरपाईपाेटी शासनाने नुकतीच २ कोटी ७० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. या मदतीचे वाटप दिवाळी पूर्व आपदग्रस्तांना वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निमार्ण होवून १३४५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. भरपाईपोटी शासनाने २ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. अतिवृष्टीमुळे घरांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यासाठी ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. 

मदतीतून वसूली न करण्याचे आदेशशासनाने अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून झालेल्या नुकसानी करिता २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र या निधीतून बॅंकांनी कुठल्याच रक्कमेची वसुुली न करता संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले आहे. या मदतीचे वाटप सुध्दा सुरु झाले आहे. 

पडझड झालेल्या घरांकरिता दीड काेटीजिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण होवून घर व गोठ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. यासाठी १ कोटी ५३ लाख ९४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. घरगुती साहित्याचे ३२ लाख ९ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. मात्र झालेल्या नुकसानीच्या तुलनेत शासनाकडून मिळालेली भरपाई फार कमी आहे. 

शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी मदत मंजूर केली आहे. तहसील कार्यालयाने नुकसानीची रक्कम आली असल्याचे सांगितले. मात्र अजूनपर्यंत आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही.- लिखीराम नागपूरे, शेतकरीलोधीटोला