शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाकडे वळावे

By admin | Updated: July 3, 2016 01:48 IST

माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी राज्यातील शेतीच्या विकासाचे स्वप्न बघितले होते. त्यांचे हे स्वप्न आता हळूहळू पूर्ण होताना दिसत आहे.

पालकमंत्री : यांत्रिकी शेती करण्याचा सल्लागोंदिया : माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी राज्यातील शेतीच्या विकासाचे स्वप्न बघितले होते. त्यांचे हे स्वप्न आता हळूहळू पूर्ण होताना दिसत आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी यांत्रिकी पध्दतीने शेती करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता नगदी पिकाकडे वळावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पालक सचिव डॉ.पी.एस.मीना, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यंवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.च्या उपाध्यक्षा रचना गहाणे, जि.प.च्या कृषि व पशूसंवर्धन समितीच्या सभापती छाया दसरे यांची उपस्थिती होते. याशिवाय मंचावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदूराव चव्हाण व देवरीचे उपविभागीय कृषि अधिकारी युवराज शहारे होते.पालकमंत्री म्हणाले, कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळागळातील शेतकऱ्यांपर्यत पोहोचवून त्यांना त्या योजनांचा लाभ द्यावा. जिल्हयाचा मानवी विकास निर्देशांक वाढला पाहिजे यासाठी कृषि विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. केंद्राने व राज्याने शेतकऱ्यांसाठी शेतकरी पिक विमा योजना व शेतकरी अपघात विमा योजना सुरु केल्या आहेत.या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. जिल्हयातील शेतकऱ्यांना आता भाजीपाला, उडीद, मुंग, यासह अन्य नगदी पिकाकडे वळण्यासाठी कृषि विभागाने प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी सांगितले. पालक सचिव डॉ.मीना म्हणाले, शेतकऱ्यांनी, कुकुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे करावे. (जिल्हा प्रतिनिधी)फिरत्या भाजीपाला विक्र ी केंद्राचे उद्घाटन राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्पाच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे पुरस्कृत शेतकरी ते ग्राहक थेट फिरत्या भाजीपाला विक्र ी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वाहनाला हिरवी झेंडी दाखवून केले. या फिरत्या भाजीपाला विक्री केंद्रामुळे ग्राहकांना थेट शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे. या विक्र ी केंद्रामुळे दलालाचे उच्चाटन होण्यास मदत होणार आहे.