शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

शेती करण्यास शेतकरी उदासीन; खर्चच अधिक

By admin | Updated: June 13, 2014 00:18 IST

भारत कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. आज कृषीवर आधारित असणारे शेतकरी शेती करायला तयार नाहीत. शेती राबताना खर्च अधिक आणि धानाला कमी भाव मिळत

काचेवानी : भारत कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. आज कृषीवर आधारित असणारे शेतकरी शेती करायला तयार नाहीत. शेती राबताना खर्च अधिक आणि धानाला कमी भाव मिळत असल्याने शेती करण्यास शेतकरी विचार करित आहे. भाड्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना परवडत नाही. शेतीत गुंतवलेले पैसे निघत नसल्याने शेती करायला शेतकरी धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

शेतीचे दिवस मे महिन्याच्या १५ तारखेला सुरू होतात. रोहिणी नक्षत्र लागले की शेतकऱ्यांना शेतीची चिंता भोवते. मृग लागताच पेरणीची लगबग सुरू होते. शेतीचे दिवस आले की शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. पण आता शेतकऱ्यांचे मन शेतीवरून उडत चालले आहे. शेतकऱ्यांचा उत्साह मागील पाच वर्षांत पूर्णत: नष्ट झाला आहे. नैसर्गिक संकटे, खताच्या वाढलेल्या किमती, औषधीच्या किमती, रोग व किडींचा प्रादुर्भाव, धानाच्या घसरत्या किमती, मजुरांची समस्या, मजुरीत झालेली बेसुमार वाढ या सर्व कारणांनी शेतकरी शेती करण्यात मागे-पुढे पाहात आहेत.

भाड्याने शेती करणाऱ्याला शेती करणे परवडण्यासारखी राहिली नाही. एका एकराला भाड्याने शेती करण्याकरिता सुरूवातीपासून धान घरी येईपर्यंत १२ ते १४ हजार रुपये खर्च येतो. काही तालुके वगळता गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, तुमसर, मोहाळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना १२ क्विंटलच्या वर उत्पन्न होत नाही. धानाला ७०० ते हजार रुपये किंमत असल्याने लागणारा खर्च आणि उत्पन्नातील किंमत पाहता शेतकरी शेती करील का? ही वास्तव असून एकरी दोन ते तीन हजाराचे नुकसान सहन करावे लागत आहे. निसर्गाने साथ दिली तर बरे, नाही तर संकटच आहे. घरी शेती करणाऱ्याला नांगरणी खर्च, काही प्रमाणात मजुरी खर्च, मळणी खर्च येत नसल्याने येणाऱ्या खर्चातून २५ टक्के फायदा मिळतो. एकरी येणाऱ्या १२ ते १४ हजाराच्या खर्चातून पाच हजार कमी केले तर यांना दोन ते पाच हजार फायदा मिळतो. पण मेपासून फेबु्रवारी, मार्च या आठ महिन्यांच्या मेहनतीतून दोन ते पाच हजार रुपये फायद्याला किती अर्थ आहे? शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटूंब शेतीमध्ये जुंपल्या जाते. याचा विचार केल्यास शेतकऱ्यास महिन्याला ३०० रुपयेसुद्धा पडत नाही. तरीपण शेतकरी नाईलाजास्तव शेती करीत आहे. दोन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या तावडीत सापडला. कधी अवकाळी पाऊस तर कधी पाण्याच्या अभावाने दुष्काळ परिस्थती. अशा वेळी शासन आणि लोकप्रतिनिधी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना कितीतरी आश्वासने देतात. पण किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला हे शेतकऱ्यांना आणि देणाऱ्या शासनालाच माहीत आहे.

शेतकऱ्यांना आस लावून ठेवण्यात आली. लाभ मात्र देण्यात आला नाही. सरकार किती देणार? नुकसान होते एकरी १० हजार रुपयांचे आणि मदत मिळते एक हजार रुपये. हे रडत्याचे अश्रू पुसण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. (वार्ताहर)