शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेती करण्यास शेतकरी उदासीन; खर्चच अधिक

By admin | Updated: June 13, 2014 00:18 IST

भारत कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. आज कृषीवर आधारित असणारे शेतकरी शेती करायला तयार नाहीत. शेती राबताना खर्च अधिक आणि धानाला कमी भाव मिळत

काचेवानी : भारत कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. आज कृषीवर आधारित असणारे शेतकरी शेती करायला तयार नाहीत. शेती राबताना खर्च अधिक आणि धानाला कमी भाव मिळत असल्याने शेती करण्यास शेतकरी विचार करित आहे. भाड्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना परवडत नाही. शेतीत गुंतवलेले पैसे निघत नसल्याने शेती करायला शेतकरी धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

शेतीचे दिवस मे महिन्याच्या १५ तारखेला सुरू होतात. रोहिणी नक्षत्र लागले की शेतकऱ्यांना शेतीची चिंता भोवते. मृग लागताच पेरणीची लगबग सुरू होते. शेतीचे दिवस आले की शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. पण आता शेतकऱ्यांचे मन शेतीवरून उडत चालले आहे. शेतकऱ्यांचा उत्साह मागील पाच वर्षांत पूर्णत: नष्ट झाला आहे. नैसर्गिक संकटे, खताच्या वाढलेल्या किमती, औषधीच्या किमती, रोग व किडींचा प्रादुर्भाव, धानाच्या घसरत्या किमती, मजुरांची समस्या, मजुरीत झालेली बेसुमार वाढ या सर्व कारणांनी शेतकरी शेती करण्यात मागे-पुढे पाहात आहेत.

भाड्याने शेती करणाऱ्याला शेती करणे परवडण्यासारखी राहिली नाही. एका एकराला भाड्याने शेती करण्याकरिता सुरूवातीपासून धान घरी येईपर्यंत १२ ते १४ हजार रुपये खर्च येतो. काही तालुके वगळता गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, तुमसर, मोहाळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना १२ क्विंटलच्या वर उत्पन्न होत नाही. धानाला ७०० ते हजार रुपये किंमत असल्याने लागणारा खर्च आणि उत्पन्नातील किंमत पाहता शेतकरी शेती करील का? ही वास्तव असून एकरी दोन ते तीन हजाराचे नुकसान सहन करावे लागत आहे. निसर्गाने साथ दिली तर बरे, नाही तर संकटच आहे. घरी शेती करणाऱ्याला नांगरणी खर्च, काही प्रमाणात मजुरी खर्च, मळणी खर्च येत नसल्याने येणाऱ्या खर्चातून २५ टक्के फायदा मिळतो. एकरी येणाऱ्या १२ ते १४ हजाराच्या खर्चातून पाच हजार कमी केले तर यांना दोन ते पाच हजार फायदा मिळतो. पण मेपासून फेबु्रवारी, मार्च या आठ महिन्यांच्या मेहनतीतून दोन ते पाच हजार रुपये फायद्याला किती अर्थ आहे? शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटूंब शेतीमध्ये जुंपल्या जाते. याचा विचार केल्यास शेतकऱ्यास महिन्याला ३०० रुपयेसुद्धा पडत नाही. तरीपण शेतकरी नाईलाजास्तव शेती करीत आहे. दोन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या तावडीत सापडला. कधी अवकाळी पाऊस तर कधी पाण्याच्या अभावाने दुष्काळ परिस्थती. अशा वेळी शासन आणि लोकप्रतिनिधी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना कितीतरी आश्वासने देतात. पण किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला हे शेतकऱ्यांना आणि देणाऱ्या शासनालाच माहीत आहे.

शेतकऱ्यांना आस लावून ठेवण्यात आली. लाभ मात्र देण्यात आला नाही. सरकार किती देणार? नुकसान होते एकरी १० हजार रुपयांचे आणि मदत मिळते एक हजार रुपये. हे रडत्याचे अश्रू पुसण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. (वार्ताहर)