शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ‘जलयुक्त’चा आधार

By admin | Updated: October 2, 2016 01:36 IST

धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे.

उत्पादन वाढणार : म्हसवाणी परिसरात विहिरींमध्ये पाणीपातळी वाढलीगोंदिया : धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे. पण पावसाचा लहरीपणा, अनियमतिपणा, दुष्काळी परिस्थिती, नापिकी यामुळे शेतकरी नेहमीच संकटात सापडत होता. आता जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे म्हसवाणी परिसरातील सिंचन विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून शेतकऱ्यांची कोरड्या दुष्काळाच्या चिंतेतून मुक्तता होणार आहे.पावसामुळे कधी कधी दुबार तिबार पेरणी करावी लागायची. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची व्हायची. लहान शेतकरी तसेच सर्वसामान्य शेतकरी कर्ज घेऊन शेतीची कामे करायचे पण, पावसाच्या लहरीपणाचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होऊन शेतकरी कर्जात बुडायचा.शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचा शेतीच्या कामासाठी पुरेपूर वापर करण्यासाठी म्हसवाणी या छोटयाशा गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१४-१५ या पाहिल्याच वर्षी निवड करण्यात आली. या अभियानातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे म्हसवाणीच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. सोबतच धानाचे उत्पादनही वाढले आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी या छोटयाशा गावाची लोकसंख्या १४४५ इतकी आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २७६.९० हेक्टर आहे. पिकाखाली एकूण क्षेत्र २२०.५० हेक्टर आहे. भात हे मुख्य पिक असून या पिकाखाली १८६ हेक्टर क्षेत्र आहे. म्हसवाणी या छोटयाशा गावात दारीद्रय रेषेखाली जीवन जगणारेही शेतकरी आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या शेतात १८ विहीरी व ८ बोरवेल्स आहे. परंतू छोटया शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करावी लागत होती. शेतशिवारातून लहानसा नाला वाहत गेला आहे. पण या नाल्याचे पाणी पावसाळयाच्या दिवसात वाहून जात होते. जलयुक्त शिवार अभियानातून या नाल्यावर दोन बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पडणारे पाणी अडविल्या जावू लागले. त्यामुळे नाल्यात पाणी साठवू लागल्यामुळे भुर्गभातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. विहीर व विंधन विहीरींची पातळी वाढली. नाल्याच्या दोन्ही काठावरील शेतीला पाण्यामुळे मदत झाली. पुर्वी या शेतकऱ्यांना नाल्याचा उपयोग होत नव्हता. जलयुक्तमुळे पाण्याची उपलब्धता झाली. पुर्वी या शेतकर्यांना पाण्याची उपलब्धता होत नसल्यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी घट व्हायची. कधी कधी तर एका पाण्याच्या अभावी हातचे पीक जायचे. मागील दोन वर्षात शेतीच्या उत्पादनातील पैसेवारी कमी आल्याने म्हसवाणी टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले होते. पण आता तिथे बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे नाला तुडूंब भरलेला आहे. या साठविलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळी तसेच पावसाळी पिकासाठी होईल असे गावातील शेतकरी सांगत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमूळे गावातील शेतकर्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सिमेंट बंधाऱ्यामुळे जलसाठ्यात वाढम्हसवाणी टंचाईग्रस्त असल्यामुळे या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली. शेतशिवारातून वाहत असलेल्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कृषी विभागाकडून २.७० मीटर उंच व ८.८६ मीटर लांबीच्या सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्यातून पाणी साठवणुकीची क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. दुसऱ्या बंधाऱ्यातून पाणी साठवणूक क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी करण्यात येत आहेत. साठविलेल्या पाण्यापासून विहीरी व इतर जलाशयातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानामूळे व शेतातील डोलदार धानाच्या पिकाकडे पाहून शेतीच्या उत्पादनात यावर्षी निश्चित वाढ होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.