शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

शेतकऱ्यांना ‘जलयुक्त’चा आधार

By admin | Updated: October 2, 2016 01:36 IST

धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे.

उत्पादन वाढणार : म्हसवाणी परिसरात विहिरींमध्ये पाणीपातळी वाढलीगोंदिया : धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे. पण पावसाचा लहरीपणा, अनियमतिपणा, दुष्काळी परिस्थिती, नापिकी यामुळे शेतकरी नेहमीच संकटात सापडत होता. आता जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे म्हसवाणी परिसरातील सिंचन विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून शेतकऱ्यांची कोरड्या दुष्काळाच्या चिंतेतून मुक्तता होणार आहे.पावसामुळे कधी कधी दुबार तिबार पेरणी करावी लागायची. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची व्हायची. लहान शेतकरी तसेच सर्वसामान्य शेतकरी कर्ज घेऊन शेतीची कामे करायचे पण, पावसाच्या लहरीपणाचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होऊन शेतकरी कर्जात बुडायचा.शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचा शेतीच्या कामासाठी पुरेपूर वापर करण्यासाठी म्हसवाणी या छोटयाशा गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१४-१५ या पाहिल्याच वर्षी निवड करण्यात आली. या अभियानातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे म्हसवाणीच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. सोबतच धानाचे उत्पादनही वाढले आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी या छोटयाशा गावाची लोकसंख्या १४४५ इतकी आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २७६.९० हेक्टर आहे. पिकाखाली एकूण क्षेत्र २२०.५० हेक्टर आहे. भात हे मुख्य पिक असून या पिकाखाली १८६ हेक्टर क्षेत्र आहे. म्हसवाणी या छोटयाशा गावात दारीद्रय रेषेखाली जीवन जगणारेही शेतकरी आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या शेतात १८ विहीरी व ८ बोरवेल्स आहे. परंतू छोटया शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करावी लागत होती. शेतशिवारातून लहानसा नाला वाहत गेला आहे. पण या नाल्याचे पाणी पावसाळयाच्या दिवसात वाहून जात होते. जलयुक्त शिवार अभियानातून या नाल्यावर दोन बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पडणारे पाणी अडविल्या जावू लागले. त्यामुळे नाल्यात पाणी साठवू लागल्यामुळे भुर्गभातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. विहीर व विंधन विहीरींची पातळी वाढली. नाल्याच्या दोन्ही काठावरील शेतीला पाण्यामुळे मदत झाली. पुर्वी या शेतकऱ्यांना नाल्याचा उपयोग होत नव्हता. जलयुक्तमुळे पाण्याची उपलब्धता झाली. पुर्वी या शेतकर्यांना पाण्याची उपलब्धता होत नसल्यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी घट व्हायची. कधी कधी तर एका पाण्याच्या अभावी हातचे पीक जायचे. मागील दोन वर्षात शेतीच्या उत्पादनातील पैसेवारी कमी आल्याने म्हसवाणी टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले होते. पण आता तिथे बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे नाला तुडूंब भरलेला आहे. या साठविलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळी तसेच पावसाळी पिकासाठी होईल असे गावातील शेतकरी सांगत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमूळे गावातील शेतकर्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सिमेंट बंधाऱ्यामुळे जलसाठ्यात वाढम्हसवाणी टंचाईग्रस्त असल्यामुळे या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली. शेतशिवारातून वाहत असलेल्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कृषी विभागाकडून २.७० मीटर उंच व ८.८६ मीटर लांबीच्या सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्यातून पाणी साठवणुकीची क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. दुसऱ्या बंधाऱ्यातून पाणी साठवणूक क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी करण्यात येत आहेत. साठविलेल्या पाण्यापासून विहीरी व इतर जलाशयातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानामूळे व शेतातील डोलदार धानाच्या पिकाकडे पाहून शेतीच्या उत्पादनात यावर्षी निश्चित वाढ होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.