शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

शेतकऱ्यांना ‘जलयुक्त’चा आधार

By admin | Updated: October 2, 2016 01:36 IST

धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे.

उत्पादन वाढणार : म्हसवाणी परिसरात विहिरींमध्ये पाणीपातळी वाढलीगोंदिया : धानावर प्रक्रिया करणारे लहान-मोठे उद्योग आणि मुख्य पीक म्हणून धानाचे उत्पादन यामुळे जिल्हयाला ‘धानाचे कोठार’ अशी ओळख मिळाली आहे. पण पावसाचा लहरीपणा, अनियमतिपणा, दुष्काळी परिस्थिती, नापिकी यामुळे शेतकरी नेहमीच संकटात सापडत होता. आता जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे म्हसवाणी परिसरातील सिंचन विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून शेतकऱ्यांची कोरड्या दुष्काळाच्या चिंतेतून मुक्तता होणार आहे.पावसामुळे कधी कधी दुबार तिबार पेरणी करावी लागायची. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची व्हायची. लहान शेतकरी तसेच सर्वसामान्य शेतकरी कर्ज घेऊन शेतीची कामे करायचे पण, पावसाच्या लहरीपणाचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होऊन शेतकरी कर्जात बुडायचा.शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचा शेतीच्या कामासाठी पुरेपूर वापर करण्यासाठी म्हसवाणी या छोटयाशा गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१४-१५ या पाहिल्याच वर्षी निवड करण्यात आली. या अभियानातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे म्हसवाणीच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. सोबतच धानाचे उत्पादनही वाढले आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी या छोटयाशा गावाची लोकसंख्या १४४५ इतकी आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २७६.९० हेक्टर आहे. पिकाखाली एकूण क्षेत्र २२०.५० हेक्टर आहे. भात हे मुख्य पिक असून या पिकाखाली १८६ हेक्टर क्षेत्र आहे. म्हसवाणी या छोटयाशा गावात दारीद्रय रेषेखाली जीवन जगणारेही शेतकरी आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या शेतात १८ विहीरी व ८ बोरवेल्स आहे. परंतू छोटया शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करावी लागत होती. शेतशिवारातून लहानसा नाला वाहत गेला आहे. पण या नाल्याचे पाणी पावसाळयाच्या दिवसात वाहून जात होते. जलयुक्त शिवार अभियानातून या नाल्यावर दोन बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पडणारे पाणी अडविल्या जावू लागले. त्यामुळे नाल्यात पाणी साठवू लागल्यामुळे भुर्गभातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. विहीर व विंधन विहीरींची पातळी वाढली. नाल्याच्या दोन्ही काठावरील शेतीला पाण्यामुळे मदत झाली. पुर्वी या शेतकऱ्यांना नाल्याचा उपयोग होत नव्हता. जलयुक्तमुळे पाण्याची उपलब्धता झाली. पुर्वी या शेतकर्यांना पाण्याची उपलब्धता होत नसल्यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी घट व्हायची. कधी कधी तर एका पाण्याच्या अभावी हातचे पीक जायचे. मागील दोन वर्षात शेतीच्या उत्पादनातील पैसेवारी कमी आल्याने म्हसवाणी टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले होते. पण आता तिथे बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे नाला तुडूंब भरलेला आहे. या साठविलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळी तसेच पावसाळी पिकासाठी होईल असे गावातील शेतकरी सांगत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमूळे गावातील शेतकर्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सिमेंट बंधाऱ्यामुळे जलसाठ्यात वाढम्हसवाणी टंचाईग्रस्त असल्यामुळे या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली. शेतशिवारातून वाहत असलेल्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कृषी विभागाकडून २.७० मीटर उंच व ८.८६ मीटर लांबीच्या सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्यातून पाणी साठवणुकीची क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. दुसऱ्या बंधाऱ्यातून पाणी साठवणूक क्षमता ८.९८ दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण झाली. साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी करण्यात येत आहेत. साठविलेल्या पाण्यापासून विहीरी व इतर जलाशयातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानामूळे व शेतातील डोलदार धानाच्या पिकाकडे पाहून शेतीच्या उत्पादनात यावर्षी निश्चित वाढ होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.