शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

शेतकरी जात आहेत सावकाराच्या दारात

By admin | Updated: August 21, 2014 23:56 IST

महाराष्ट्र राज्य को-आॅप मार्केटींग फेडरेशन गोंदियातर्फे दि तालुका खरेदी विक्री अर्जुनी/मोरगावने गेल्या १३ ते ३० जून २०१४ या कालावधीत फक्त महागावच्या हमीभाव धान केंद्रावर जवळपास

खताचा भुर्दंड : धानाचे चुकारे मिळालेच नाहीमहागाव : महाराष्ट्र राज्य को-आॅप मार्केटींग फेडरेशन गोंदियातर्फे दि तालुका खरेदी विक्री अर्जुनी/मोरगावने गेल्या १३ ते ३० जून २०१४ या कालावधीत फक्त महागावच्या हमीभाव धान केंद्रावर जवळपास ६५०० क्विंटल धान खरेदी केला. परंतु धान विकून एवढे दिवस लोेटूनही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना हमीभावानुसार केंद्रावर विकलेल्या धानाचे चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर सावकारी कर्ज घेवून खरीप पिकांची सोय करण्याची पाळी आली आहे.या भागातील स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या उदासीन राजकारण्यांमुळे अजूनही शेतकऱ्यांच्या या समस्येकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही. शेतकऱ्यांची ही व्यथा एकाही राजकीय पुढाऱ्याला अजून दिसून आलेली नाही. आता त्यांची शेतकऱ्याविषयीची तळमळ कुठे गेली? असा सवाल या भागातील गरजू शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आपला धान व्यापाऱ्यांना विकला असता तर प्रतिक्विंटल जवळपास ५० रु. जास्तीचे मिळाले असते. तसेच रोख रक्कम मिळाली असती. खत खरेदीवर सुध्दा प्रती बोरी १० रुपयांची बचत झाली असती. कारण सध्या शासकीय गोदामातील खताचा दर व्यापाऱ्याच्या दरापेक्षा १० रुपये प्रतीबोरी जास्त आहे. एवढ्या सर्व हालअपेष्टा व नुकसान सहन करूनही शेतकरी चुपचाप आहेत. यापुढे त्यांच्या सहनशिलतेचा अधिक अंत न पाहता त्यांच्या धानाचे चुकारे त्वरीत देण्यात यावे, अथवा जर पुढे काही बरे वाईट घडल्यास त्यास धान खरेदी यंत्रणा संपूर्ण जबाबदार राहील असा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)