शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

सरकार करतेय शेतकऱ्यांना ‘एप्रिल फूल’- प्रफुल्ल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 01:09 IST

शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त भाव देण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्तारूढ सरकारचे नेते सत्तेवर येताच

राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर : १५ एप्रिलनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन गोंदिया : शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त भाव देण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्तारूढ सरकारचे नेते सत्तेवर येताच आपले आश्वासन विसरले आहे. शेतमालाला योग्य भाव देणे तर दूर, उलट २०१४ च्या तुलनेत २०१७ मधील शेतमालाचे भाव कमी आहेत. यामुळे समस्त शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ना योग्य भाव, ना कर्जमाफी, यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना ‘एप्रिल फूल’ करीत आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता, माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी गोंदियात पत्रकारांशी बोलताना केली. नोटाबंदीला आम्ही विरोध केला नाही, पण नोटाबंदीनंतर आज ठिकठिकाणच्या जिल्हा सहकारी बँकांमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्याचे निर्देश सरकारने दिलेले नाही. हा शेतकऱ्यांचा पैसा आहे. तो पैसा आणि त्यावरील व्याज बुडाल्यास शेतकऱ्यांना फटका बसेल. जिल्हा सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशानुसारच काम करतात, तरीही सरकार हा भेदभाव का करीत आहे? असा सवाल खा.पटेल यांनी केला. गोंदिया आणि भंडारा जिल्हा सहकारी बँकांवर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सरकारने प्रशासक नेमून सर्व व्यवहारांची चौकशी आपल्या यंत्रणेमार्फत केली, पण काहीच हाती लागले नाही. अखेर न्यायालयाने दणका देत प्रशासक बसविण्याचा निर्णय मागे घेण्याचा आदेश दिला. सरकारने किमान शेतकऱ्यांचे हितसंबंध येतात तिथे तरी राजकारण करू नये, अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली. यावेळी नरेश माहेश्वरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) आधीचे मंजूर प्रकल्पही ठप्प गेल्या अडीच वर्षात सरकारने विकासाच्या नावावर कोणत्याही नवीन गोष्टी केलेल्या नाहीत. शेतकऱ्यांसह बेरोजगारांचे प्रश्न काही अंशीही सोडविले नाहीत. एवढेच नाही तर आधीच्या सरकारच्या कार्यकाळात मंजूर केलेले प्रकल्पही सत्तारूढ सरकारमधील नेते मार्गी लावू शकले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विविध प्रश्नांवर येत्या १५ एप्रिलनंतर रस्त्यावरून उतरून ठिकठिकाणी आंदोलन सुरू करणार आहे, अशी माहिती खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिली.