शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सरकार करतेय शेतकऱ्यांना ‘एप्रिल फूल’- प्रफुल्ल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 01:09 IST

शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त भाव देण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्तारूढ सरकारचे नेते सत्तेवर येताच

राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर : १५ एप्रिलनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन गोंदिया : शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त भाव देण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्तारूढ सरकारचे नेते सत्तेवर येताच आपले आश्वासन विसरले आहे. शेतमालाला योग्य भाव देणे तर दूर, उलट २०१४ च्या तुलनेत २०१७ मधील शेतमालाचे भाव कमी आहेत. यामुळे समस्त शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ना योग्य भाव, ना कर्जमाफी, यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना ‘एप्रिल फूल’ करीत आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता, माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी गोंदियात पत्रकारांशी बोलताना केली. नोटाबंदीला आम्ही विरोध केला नाही, पण नोटाबंदीनंतर आज ठिकठिकाणच्या जिल्हा सहकारी बँकांमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्याचे निर्देश सरकारने दिलेले नाही. हा शेतकऱ्यांचा पैसा आहे. तो पैसा आणि त्यावरील व्याज बुडाल्यास शेतकऱ्यांना फटका बसेल. जिल्हा सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशानुसारच काम करतात, तरीही सरकार हा भेदभाव का करीत आहे? असा सवाल खा.पटेल यांनी केला. गोंदिया आणि भंडारा जिल्हा सहकारी बँकांवर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सरकारने प्रशासक नेमून सर्व व्यवहारांची चौकशी आपल्या यंत्रणेमार्फत केली, पण काहीच हाती लागले नाही. अखेर न्यायालयाने दणका देत प्रशासक बसविण्याचा निर्णय मागे घेण्याचा आदेश दिला. सरकारने किमान शेतकऱ्यांचे हितसंबंध येतात तिथे तरी राजकारण करू नये, अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली. यावेळी नरेश माहेश्वरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) आधीचे मंजूर प्रकल्पही ठप्प गेल्या अडीच वर्षात सरकारने विकासाच्या नावावर कोणत्याही नवीन गोष्टी केलेल्या नाहीत. शेतकऱ्यांसह बेरोजगारांचे प्रश्न काही अंशीही सोडविले नाहीत. एवढेच नाही तर आधीच्या सरकारच्या कार्यकाळात मंजूर केलेले प्रकल्पही सत्तारूढ सरकारमधील नेते मार्गी लावू शकले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विविध प्रश्नांवर येत्या १५ एप्रिलनंतर रस्त्यावरून उतरून ठिकठिकाणी आंदोलन सुरू करणार आहे, अशी माहिती खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिली.