शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

अड्याळ परिसरात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: December 26, 2015 02:02 IST

‘इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..’ या सुरेश भटांच्या ओवी फार काही सांगून जातात.

उपाययोजनांची गरज : आश्वासनांनी आत्महत्या थांबणार काय?अड्याळ : ‘इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..’ या सुरेश भटांच्या ओवी फार काही सांगून जातात. आत्महत्या केल्यानंतर सरणावर शेवटची आपल्या स्वकियांना, आप्तांना भेट देणारा शेतकरी जणू हेच बोलून जात असणार. नैसर्गिक संकटांबाबत आपण काहीच करू शकत नाही. परंतु त्यातून सावरायला उपाययोजना असतात. मात्र या परिसरात केवळ आश्वासनांपलिकडे काहीही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत.आपले दु:ख खांद्यावर घेवून सरणावर चढणारा शेतकरी, कर्जबाजारी होणारा शेतकरी हा या दशकातील महत्वाचा विषय ठरत आहे. उत्पन्न व खर्च यांच्यातील प्रमाणामुळे शेती खरोखर फायद्याची आहे काय, हा विषय आता चर्चेचा झाला आहे. नापिकीमुळे आत्महत्याचे प्रसंग अड्याळ व परिसरात पोहचणार नाही असे वाटत असतानाच एका आठवड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. १७ डिसेंबरला आकोट येथील बाळकृष्ण नागो देशमुख (४८) या शेतकऱ्याने शेशतावर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली तर १६ डिसेंबरच्या रात्री ३ च्या सुमारास विष प्राशन केले होते व त्यांचे उपचाराअंती २२ डिसेंबरला प्राण गमावले. राजु विठ्ठलराव पोटवार (५३) रा. अड्याळ या दोघांनी वेगवेगळ्या मार्गाने आपले जीव दिले. परंतु शेतात राबणाऱ्या बळीराजाचे बळी घेणारे राजे कोण, बळी जाण्याच्या वाटा आणि वाट्याला येणारे मृत्यु यांना आताच ब्रेक दिला नाही तर दर दिवसाला गावात मोठ्या नेत्यांचे आमगन राहिल आणि शेतकऱ्यांचे स्मशानात निर्गमन याकडे गांभीर्याने उपाय योजना आखण्याची नितांत गरज आहे.ज्या गावातील तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत नाही याचा अर्थ तो कर्जबाजारी नाही, असे घेवून चालणार नाही. या प्रश्नाकडे आता नव्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आत्महत्या होण्यामागील कारणेधान्य बाजारात चाललेली दलालांची मनमानी, बँकेच्या कर्जयोजनेची नव्याने मांडणी, किचकच असणारी विमा पद्धत व जर धान्य शेतीतून शेतकरी सावरणार नसेल तर त्याला अन्य मार्ग उपलब्ध करून देण्याची तयारी आदी सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: आणेवारी संदर्भात शेतकरी केव्हा कर्जबाजारी झाला हे किंवा त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर किती कर्ज होते हे विचारण्यापेक्षा तो कर्जबाजारी झालाच कसा याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे, सिंचनाअभावी रोगामुळे, आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही यासाठी या सर्वांचे नियंत्रण, नियोजन, प्रबोधन लोकशिक्षण करण्याची जबाबदारी अर्थात कोणावर ज्याच्यावर आहे ते सरकार विषेशत: आताचे युती सरकार शेतकऱ्यांच्या बाजुचे आहे काय, असा प्रश्न शेतकरी व्यक्त करीत आहेत.