शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

अड्याळ परिसरात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: December 26, 2015 02:02 IST

‘इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..’ या सुरेश भटांच्या ओवी फार काही सांगून जातात.

उपाययोजनांची गरज : आश्वासनांनी आत्महत्या थांबणार काय?अड्याळ : ‘इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..’ या सुरेश भटांच्या ओवी फार काही सांगून जातात. आत्महत्या केल्यानंतर सरणावर शेवटची आपल्या स्वकियांना, आप्तांना भेट देणारा शेतकरी जणू हेच बोलून जात असणार. नैसर्गिक संकटांबाबत आपण काहीच करू शकत नाही. परंतु त्यातून सावरायला उपाययोजना असतात. मात्र या परिसरात केवळ आश्वासनांपलिकडे काहीही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत.आपले दु:ख खांद्यावर घेवून सरणावर चढणारा शेतकरी, कर्जबाजारी होणारा शेतकरी हा या दशकातील महत्वाचा विषय ठरत आहे. उत्पन्न व खर्च यांच्यातील प्रमाणामुळे शेती खरोखर फायद्याची आहे काय, हा विषय आता चर्चेचा झाला आहे. नापिकीमुळे आत्महत्याचे प्रसंग अड्याळ व परिसरात पोहचणार नाही असे वाटत असतानाच एका आठवड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. १७ डिसेंबरला आकोट येथील बाळकृष्ण नागो देशमुख (४८) या शेतकऱ्याने शेशतावर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली तर १६ डिसेंबरच्या रात्री ३ च्या सुमारास विष प्राशन केले होते व त्यांचे उपचाराअंती २२ डिसेंबरला प्राण गमावले. राजु विठ्ठलराव पोटवार (५३) रा. अड्याळ या दोघांनी वेगवेगळ्या मार्गाने आपले जीव दिले. परंतु शेतात राबणाऱ्या बळीराजाचे बळी घेणारे राजे कोण, बळी जाण्याच्या वाटा आणि वाट्याला येणारे मृत्यु यांना आताच ब्रेक दिला नाही तर दर दिवसाला गावात मोठ्या नेत्यांचे आमगन राहिल आणि शेतकऱ्यांचे स्मशानात निर्गमन याकडे गांभीर्याने उपाय योजना आखण्याची नितांत गरज आहे.ज्या गावातील तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत नाही याचा अर्थ तो कर्जबाजारी नाही, असे घेवून चालणार नाही. या प्रश्नाकडे आता नव्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आत्महत्या होण्यामागील कारणेधान्य बाजारात चाललेली दलालांची मनमानी, बँकेच्या कर्जयोजनेची नव्याने मांडणी, किचकच असणारी विमा पद्धत व जर धान्य शेतीतून शेतकरी सावरणार नसेल तर त्याला अन्य मार्ग उपलब्ध करून देण्याची तयारी आदी सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: आणेवारी संदर्भात शेतकरी केव्हा कर्जबाजारी झाला हे किंवा त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर किती कर्ज होते हे विचारण्यापेक्षा तो कर्जबाजारी झालाच कसा याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे, सिंचनाअभावी रोगामुळे, आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही यासाठी या सर्वांचे नियंत्रण, नियोजन, प्रबोधन लोकशिक्षण करण्याची जबाबदारी अर्थात कोणावर ज्याच्यावर आहे ते सरकार विषेशत: आताचे युती सरकार शेतकऱ्यांच्या बाजुचे आहे काय, असा प्रश्न शेतकरी व्यक्त करीत आहेत.