शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ परिसरात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: December 26, 2015 02:02 IST

‘इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..’ या सुरेश भटांच्या ओवी फार काही सांगून जातात.

उपाययोजनांची गरज : आश्वासनांनी आत्महत्या थांबणार काय?अड्याळ : ‘इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..’ या सुरेश भटांच्या ओवी फार काही सांगून जातात. आत्महत्या केल्यानंतर सरणावर शेवटची आपल्या स्वकियांना, आप्तांना भेट देणारा शेतकरी जणू हेच बोलून जात असणार. नैसर्गिक संकटांबाबत आपण काहीच करू शकत नाही. परंतु त्यातून सावरायला उपाययोजना असतात. मात्र या परिसरात केवळ आश्वासनांपलिकडे काहीही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत.आपले दु:ख खांद्यावर घेवून सरणावर चढणारा शेतकरी, कर्जबाजारी होणारा शेतकरी हा या दशकातील महत्वाचा विषय ठरत आहे. उत्पन्न व खर्च यांच्यातील प्रमाणामुळे शेती खरोखर फायद्याची आहे काय, हा विषय आता चर्चेचा झाला आहे. नापिकीमुळे आत्महत्याचे प्रसंग अड्याळ व परिसरात पोहचणार नाही असे वाटत असतानाच एका आठवड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. १७ डिसेंबरला आकोट येथील बाळकृष्ण नागो देशमुख (४८) या शेतकऱ्याने शेशतावर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली तर १६ डिसेंबरच्या रात्री ३ च्या सुमारास विष प्राशन केले होते व त्यांचे उपचाराअंती २२ डिसेंबरला प्राण गमावले. राजु विठ्ठलराव पोटवार (५३) रा. अड्याळ या दोघांनी वेगवेगळ्या मार्गाने आपले जीव दिले. परंतु शेतात राबणाऱ्या बळीराजाचे बळी घेणारे राजे कोण, बळी जाण्याच्या वाटा आणि वाट्याला येणारे मृत्यु यांना आताच ब्रेक दिला नाही तर दर दिवसाला गावात मोठ्या नेत्यांचे आमगन राहिल आणि शेतकऱ्यांचे स्मशानात निर्गमन याकडे गांभीर्याने उपाय योजना आखण्याची नितांत गरज आहे.ज्या गावातील तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत नाही याचा अर्थ तो कर्जबाजारी नाही, असे घेवून चालणार नाही. या प्रश्नाकडे आता नव्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आत्महत्या होण्यामागील कारणेधान्य बाजारात चाललेली दलालांची मनमानी, बँकेच्या कर्जयोजनेची नव्याने मांडणी, किचकच असणारी विमा पद्धत व जर धान्य शेतीतून शेतकरी सावरणार नसेल तर त्याला अन्य मार्ग उपलब्ध करून देण्याची तयारी आदी सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: आणेवारी संदर्भात शेतकरी केव्हा कर्जबाजारी झाला हे किंवा त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर किती कर्ज होते हे विचारण्यापेक्षा तो कर्जबाजारी झालाच कसा याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे, सिंचनाअभावी रोगामुळे, आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही यासाठी या सर्वांचे नियंत्रण, नियोजन, प्रबोधन लोकशिक्षण करण्याची जबाबदारी अर्थात कोणावर ज्याच्यावर आहे ते सरकार विषेशत: आताचे युती सरकार शेतकऱ्यांच्या बाजुचे आहे काय, असा प्रश्न शेतकरी व्यक्त करीत आहेत.