शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

पुनर्वसू नक्षत्रात शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय म्हणून विंधन विहिरी तयार करून सिंचनाची सोय केली आहे. त्यामुळे हमखास पिके घेतली जातात. पण जिथे पाण्याची सोय नाही त्याठिकाणी नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागते. परसोडी, वडेगाव, चिखली, कोहमारा, कणेरी, पुतळी या गावात सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना वरथेंबी पावसावरच अवलंबून राहावे लागते.

ठळक मुद्देतालुक्यात हलक्या धानाची अधिक लागवड : सिंचनाची सोय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील शेतकरी पुनर्वसू नक्षत्रात रोवणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मागील १५-२० दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवणीची कामे खोळंबली होती. मात्र पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने दमदार हजेरी लावल्याने या परिसरातील रोवणीच्या कामाला वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय म्हणून विंधन विहिरी तयार करून सिंचनाची सोय केली आहे. त्यामुळे हमखास पिके घेतली जातात. पण जिथे पाण्याची सोय नाही त्याठिकाणी नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागते. परसोडी, वडेगाव, चिखली, कोहमारा, कणेरी, पुतळी या गावात सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना वरथेंबी पावसावरच अवलंबून राहावे लागते. सडक अर्जुनी तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ५५ हजार ४६० हेक्टर आर. क्षेत्र असून १९३५० हेक्टर आर क्षेत्र खरीप पिकाखाली आहे. त्यात २९५ हेक्टर आर क्षेत्रावर आवत्या धानाची लागवड केली आहे. पुनर्वसू नक्षत्रात आतापर्यंत ३५ टक्के रोवणी झाली आहे.तालुक्यात ४० टक्के बारीक, तर ६० टक्के जाड धान पिकाचे लागवड केली आहे. यावर्षी हायब्रीड व कमी दिवसात येणाºया धानाची लागवड केली आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम धानाच्या शेतीवर होत आहे. त्यामुळे भाजीपाला, केळी, टरबूज, खरबूज, भेंडी, काकडी आदी पिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळत आहेत.- जोशिराम लंजेशेतकरी सिंदिपारगेल्या २ दिवसांत पाऊस बऱ्याच प्रमाणात झाल्याने तालुक्यातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात सध्या ३५ टक्के रोवणी झाली आहे. कीड व रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.- किशोर पात्रीकरतालुका कृषी अधिकारी, सडक अर्जुनी

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती