शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शेतकरी झाला हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:45 IST

जिल्ह्यात शेतकºयांवर उपासमारीची बिकट परिस्थिती आली असून शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहावे.

ठळक मुद्देसुरेश हर्षे : शेतकºयांच्या पाठीशी उभे न राहिल्यास आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : जिल्ह्यात शेतकºयांवर उपासमारीची बिकट परिस्थिती आली असून शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहावे. अन्यथा सरकार विरोधात आंदोलनाची भूमिका घेणार असे इशारा जिल्हा परिषद सदस्य व स्थाई समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.तालुक्यात शेतकºयांनी धानपीक लागवडीकरिता आर्थिक पाठबळ उभारुन शेवटी हातात काहीही लाभले नाही. सध्या शेतकरी निराश होवून शासनाच्या मदतीची वाट बघत आहे. त्यांच्या या आतुरतेला शासन दरबारी गंभीरतेने बघत नसल्याने येथील शेतकरी हताश झाले आहे. जगाचा पोशिंदा आज निराश होवून त्यांची मानसिक स्थिती ढासळत आहे. त्यांच्या समोर सावकार, सहकारी पतसंस्था, राष्टÑीयकृत बँक आदिंकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार. तसेच गहाण ठेवलेले घर व दागिने कसे सोडविणार असा प्रश्न बळीराजा पुढे उभा आहे.शेतात केलेली मशागत, धान्य, बीज, वखरणी, निंदाई, पेरणी अ ादी खर्चांचे ओझे कसे झेलणार. घरात खायला अन्न सुद्धा नाही त्यात जनावरांच्या चाºयाचा प्रश्न या संघर्षातून शेतकºयांना निघने कठीण झाले आहे. यावर्षी पावसाची अनियमितता व अपुरेपणा यामुळे काहींनी पेरणी सुद्धा केली नाही. आजही धानपिकाची खार शेतात पडून आहे.तर एकीकडे जसे तसे लागवड झाली त्यांच्या शेतात मावा, तुडतुडा या रोगाने हल्ला चढविला. यामुळे संपूर्ण शेतातील उभे पीक नष्ट झाले.अशा संकटसमयी शासनाने शेतकºयांना मदत करणे अपेक्षीत असून शेतकरी शासनाकडे मदतीची मागणी करीत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे रहावे अन्यथा शासन विरोधात आंदोलन करणार अशा इशारा हर्षे यांनी दिला आहे.पीक विमा रिलायन्सची फसवेगीरीशासनाने रिलायन्स या खासगी कंपनीला सन २०१७-१८ करिता पीक विमा योजनेस मंज़ुरी दिली. पण सदर कंपनीने आॅनलाईन पद्धतीने शेतकºयांचे कर्ज स्विकारले. आॅनलाईन प्रक्रियेच्या वेळेस आॅनलाईन सेवा मंदगतीने चालत असल्याने हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले. सदर परिस्थिती विरोधी पक्षांनी उचलून धरल्याने नंतर शासनाने आॅनलाईन अर्ज मागविले. परंतु आॅफलाईन अर्ज कचºयाच्या पेटीत फेकले गेले. त्या शेतकºयांचा कोणी वाली नाही अशी खंत हर्षे यांनी व्यक्त केली.