शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शेतकरी झाला हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:45 IST

जिल्ह्यात शेतकºयांवर उपासमारीची बिकट परिस्थिती आली असून शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहावे.

ठळक मुद्देसुरेश हर्षे : शेतकºयांच्या पाठीशी उभे न राहिल्यास आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : जिल्ह्यात शेतकºयांवर उपासमारीची बिकट परिस्थिती आली असून शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहावे. अन्यथा सरकार विरोधात आंदोलनाची भूमिका घेणार असे इशारा जिल्हा परिषद सदस्य व स्थाई समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.तालुक्यात शेतकºयांनी धानपीक लागवडीकरिता आर्थिक पाठबळ उभारुन शेवटी हातात काहीही लाभले नाही. सध्या शेतकरी निराश होवून शासनाच्या मदतीची वाट बघत आहे. त्यांच्या या आतुरतेला शासन दरबारी गंभीरतेने बघत नसल्याने येथील शेतकरी हताश झाले आहे. जगाचा पोशिंदा आज निराश होवून त्यांची मानसिक स्थिती ढासळत आहे. त्यांच्या समोर सावकार, सहकारी पतसंस्था, राष्टÑीयकृत बँक आदिंकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार. तसेच गहाण ठेवलेले घर व दागिने कसे सोडविणार असा प्रश्न बळीराजा पुढे उभा आहे.शेतात केलेली मशागत, धान्य, बीज, वखरणी, निंदाई, पेरणी अ ादी खर्चांचे ओझे कसे झेलणार. घरात खायला अन्न सुद्धा नाही त्यात जनावरांच्या चाºयाचा प्रश्न या संघर्षातून शेतकºयांना निघने कठीण झाले आहे. यावर्षी पावसाची अनियमितता व अपुरेपणा यामुळे काहींनी पेरणी सुद्धा केली नाही. आजही धानपिकाची खार शेतात पडून आहे.तर एकीकडे जसे तसे लागवड झाली त्यांच्या शेतात मावा, तुडतुडा या रोगाने हल्ला चढविला. यामुळे संपूर्ण शेतातील उभे पीक नष्ट झाले.अशा संकटसमयी शासनाने शेतकºयांना मदत करणे अपेक्षीत असून शेतकरी शासनाकडे मदतीची मागणी करीत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे रहावे अन्यथा शासन विरोधात आंदोलन करणार अशा इशारा हर्षे यांनी दिला आहे.पीक विमा रिलायन्सची फसवेगीरीशासनाने रिलायन्स या खासगी कंपनीला सन २०१७-१८ करिता पीक विमा योजनेस मंज़ुरी दिली. पण सदर कंपनीने आॅनलाईन पद्धतीने शेतकºयांचे कर्ज स्विकारले. आॅनलाईन प्रक्रियेच्या वेळेस आॅनलाईन सेवा मंदगतीने चालत असल्याने हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले. सदर परिस्थिती विरोधी पक्षांनी उचलून धरल्याने नंतर शासनाने आॅनलाईन अर्ज मागविले. परंतु आॅफलाईन अर्ज कचºयाच्या पेटीत फेकले गेले. त्या शेतकºयांचा कोणी वाली नाही अशी खंत हर्षे यांनी व्यक्त केली.