शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: March 23, 2015 01:41 IST

मागील १५ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तीनतेरा करुन हरभरा, लाखोळी, गहू, जवस, भाजीपाल्यांचे नुकसान केले आहे.

परसवाडा : मागील १५ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तीनतेरा करुन हरभरा, लाखोळी, गहू, जवस, भाजीपाल्यांचे नुकसान केले आहे. उन्हाळी धानाचे पऱ्हेही धोक्यात आले आहेत. शिवाय पाहणी न करता सर्वेक्षणाची यादी तयार केली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांना काय मदत मिळणार, याबाबत शंकाच आहे. यातूनच शेतकरी हवालदिल झाला आहे. तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने प्रधान सचिव मीना, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह लोकप्रतिनिधीनींही पाहणी करून नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. पण अधिकाऱ्यांच्या आदेशाला काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी कचरापेटी दाखवित कार्यालय, पानटपरी व सरपंचांच्या घरी बसूनच यादी तयार करुन सर्वेक्षण झाल्याचे सांगितल्याचे दिसून येत आहे. गावातील किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले याची यादी जाहीर करण्यात आलीच नाही व यादी गुलदस्त्यात ठेवली आहे. तिरोडा तालुक्यात सर्वाधिक लाखोळी पीक घेतले जाते. पण काही ठिकाणी त्यांचे सर्वेक्षण व पंचनामा केलाच नसून लाखोळीचे नुकसान लिहिण्यात येऊ नये, असे शासन व अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. सततच्या पावसाने उन्हाळी धानपिकांवर रोग लागत असल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कर्ज घेऊन पीक वाचवित आहेत. एकीकडे शासन शेतकऱ्यांची पाठ थोपटत असताना दुसरीकडे जिल्हा बँकेकडून सक्तीची वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरातील वस्तुंची जप्ती करुन अधिकारी शेतकऱ्यांना धमकावित आहेत.दुसरीकडे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या पैशावर विदेशवारी करुन आले आहेत. याची चौकशी होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी त्वरित मदतीची मागणी केली आहे. (वार्ताहर)