शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: March 23, 2015 01:41 IST

मागील १५ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तीनतेरा करुन हरभरा, लाखोळी, गहू, जवस, भाजीपाल्यांचे नुकसान केले आहे.

परसवाडा : मागील १५ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तीनतेरा करुन हरभरा, लाखोळी, गहू, जवस, भाजीपाल्यांचे नुकसान केले आहे. उन्हाळी धानाचे पऱ्हेही धोक्यात आले आहेत. शिवाय पाहणी न करता सर्वेक्षणाची यादी तयार केली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांना काय मदत मिळणार, याबाबत शंकाच आहे. यातूनच शेतकरी हवालदिल झाला आहे. तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने प्रधान सचिव मीना, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह लोकप्रतिनिधीनींही पाहणी करून नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. पण अधिकाऱ्यांच्या आदेशाला काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी कचरापेटी दाखवित कार्यालय, पानटपरी व सरपंचांच्या घरी बसूनच यादी तयार करुन सर्वेक्षण झाल्याचे सांगितल्याचे दिसून येत आहे. गावातील किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले याची यादी जाहीर करण्यात आलीच नाही व यादी गुलदस्त्यात ठेवली आहे. तिरोडा तालुक्यात सर्वाधिक लाखोळी पीक घेतले जाते. पण काही ठिकाणी त्यांचे सर्वेक्षण व पंचनामा केलाच नसून लाखोळीचे नुकसान लिहिण्यात येऊ नये, असे शासन व अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. सततच्या पावसाने उन्हाळी धानपिकांवर रोग लागत असल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कर्ज घेऊन पीक वाचवित आहेत. एकीकडे शासन शेतकऱ्यांची पाठ थोपटत असताना दुसरीकडे जिल्हा बँकेकडून सक्तीची वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरातील वस्तुंची जप्ती करुन अधिकारी शेतकऱ्यांना धमकावित आहेत.दुसरीकडे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या पैशावर विदेशवारी करुन आले आहेत. याची चौकशी होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी त्वरित मदतीची मागणी केली आहे. (वार्ताहर)