शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सुखावला

By admin | Updated: July 11, 2015 02:04 IST

गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : अखेर रोवण्यांना सुरूवात, उकाड्यापासून दिलासागोंदिया/देवरी : गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. त्यामुळे मरणासन्न झालेल्या धानाच्या रोपट्यांना जीवदान मिळाले आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे.गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण देवरी तालुका ओलाचिंब झाला आहे. तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे सुखावला आहे. तसेच दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने लोकांना मागील पंधरा दिवसांपासून होत असलेल्या उकाडयापासून दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाही त्या शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या रोपांना या पावसाने मोठे जीवनदान मिळाले आहे. काही शेतकऱ्यांची लागलीच रोवणीलाही सुरूवात केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी मान्सुनच्या पावसाने बळीराजा कामाला लागला होता. शेतात बीजे टाकल्याच्या कामाला वेग आला होता. परंतु मागील पंधरा दिवसाप्ाांसून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत पडला होता. महागडे बियाणे टाकून केलेली पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट तर येणार नाही? हा प्रश्न शेतकल्याला भेडसावत होता. परंगु गुरुवारपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसाधारण माणुससुद्धा सुखावला आहे. या सत्ांतधार पावसाने लोकांना जरी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी वातावरणातील उकाडा चांगलाच दूर झाला आहे. गर्मीपासून सुटका मिळाल्याचा आनंद लोक व्यक्त करीत आहेत. इंद्रदेवतेचे आभार मानीत आहेत. या पावसामुळे बाजारात छत्री व रेनकोट तसेच मोऱ्या घेणाऱ्यांची गर्दी बघायला मिळत आहे. ग्रामीण क्षेत्रातील रस्ते चिखलाने माखले असून ये-जाणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस होत असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत होती. एकंदरित नफा-नुकसान बघता सर्वांनीच या पावसामुळे आनंद व्यक्त केला आहे. दिवसभर आकाशात काळे ढग असल्याने व पावसाच्या रीपरिपीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की अशाच पावसामुळे रोवणीला गती मिळाने आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरूवात झाली. तिसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने सर्वांनाच हायसे वाटले. त्यातच शेतकऱ्यांनी धानाचे बियाणे घेऊन लागवड केली. पण नर्सरीची लागवड झाल्यानंतर पावसाने दडी मारून शेतकऱ्यांना चांगलेच चिंतेत टाकले होते.यावर्षी पाऊस अनियमित असल्याने नर्सरी टाकताना एकाच वेळी टाकू नका असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेत पूर्ण नर्सरी लावली नाही. मात्र ज्यांनी आधी लागवड केली होती त्यांचा जीव टांगणीला लागला होता. रोपे मोठी होऊन रोवणीची वेळ आली असताना पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे लागल्या होत्या. अनेकांनी वरुणराजाला साकडे घालणे सुरू केले होते. अखेर गुरूवारी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही पाऊस सुरू असल्याने रोपांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. येत्या १५-२० दिवसात रोवणीच्या कामांना चांगलाच वेग येणार आहे. (जिल्हा / तालुका प्रतिनिधी)