शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शेतकरी दिंडीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : शेतकऱ्यांची नव्हे कार्पोरेटची सरकार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. अविनाश काशिवार, नरेश माहेश्वरी, दिलीप बन्सोड, रमेश चुऱ्हे, गजानन परशुरामकर, नरेश भेंडारकर, सेवकराम रहांगडाले, माधव हटवार, निरज मेश्राम, रहांगडाले, एफ.टी. शहा, बाबोडे, दादोजी परशुरामकर, सुधाकर पंधरे, अग्रवाल, आनंद परशुरामकर, दामोदर बोपचे, परिसरातील सरपंच व उपसरपंच दिंडी अभियानात सहभागी झाले होते.शेतकरी दिंडी अभियानाची सुरुवात होण्यापूर्वी प्रदेश प्रतिनिधी किसान सभा अध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जात असून शासनाने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकºयांना मिळाला नसल्याचे सांगत सर्व कर्ज माफ करण्याचे मागणी केली. सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना उत्पादक खर्चाचा दिडपट भाव देणे, ३०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बोनस जाहीर करणे गरजेचे आहे, परंतु शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही सरकार शेतकऱ्यांची नाही कार्पोरेट लोकांची असल्याचे ते म्हणाले.यावेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी सरकाच्यजा कानपिचक्या घेतल्या. ते म्हणाले, शरदचंद्र पवार यांनी शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ केले होते. परंतु या परिसरातील मंत्री असून सुद्धा सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी परिसरातील शेतकºयांचा दुष्काळ घोषित करण्यात आला नाही. तिरोडा, गोरेगाव, गोंदिया तहसीलचा सर्व शेतकऱ्यांचा मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. त्यामुळे येणाºया ३० डिसेंबरला जेलभरो आंदोलन खा. प्रफुल्ल पटले यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अधिक संख्येत भाग घेण्याचे आवाहन केले.शेतकरी दिंडी अभियान २५ ते २९ डिसेंबर २०१७ पर्यंत पांढरी, डव्वा, सौंदड, चिखली, शेंडा अशा प्रकारे जिल्हा परिषद क्षेत्रातील गावामध्ये दिंडी काढून सर्व शेतकरी जनतेला शासन विषयी जनजागृती करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका सडक अर्जुनी अवलंबविण्यात आले आहे.संपूर्ण सडक-अर्जुनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी या दिंडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.