शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

शेतकरी दिंडीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : शेतकऱ्यांची नव्हे कार्पोरेटची सरकार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. अविनाश काशिवार, नरेश माहेश्वरी, दिलीप बन्सोड, रमेश चुऱ्हे, गजानन परशुरामकर, नरेश भेंडारकर, सेवकराम रहांगडाले, माधव हटवार, निरज मेश्राम, रहांगडाले, एफ.टी. शहा, बाबोडे, दादोजी परशुरामकर, सुधाकर पंधरे, अग्रवाल, आनंद परशुरामकर, दामोदर बोपचे, परिसरातील सरपंच व उपसरपंच दिंडी अभियानात सहभागी झाले होते.शेतकरी दिंडी अभियानाची सुरुवात होण्यापूर्वी प्रदेश प्रतिनिधी किसान सभा अध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जात असून शासनाने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकºयांना मिळाला नसल्याचे सांगत सर्व कर्ज माफ करण्याचे मागणी केली. सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना उत्पादक खर्चाचा दिडपट भाव देणे, ३०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बोनस जाहीर करणे गरजेचे आहे, परंतु शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही सरकार शेतकऱ्यांची नाही कार्पोरेट लोकांची असल्याचे ते म्हणाले.यावेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी सरकाच्यजा कानपिचक्या घेतल्या. ते म्हणाले, शरदचंद्र पवार यांनी शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ केले होते. परंतु या परिसरातील मंत्री असून सुद्धा सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी परिसरातील शेतकºयांचा दुष्काळ घोषित करण्यात आला नाही. तिरोडा, गोरेगाव, गोंदिया तहसीलचा सर्व शेतकऱ्यांचा मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. त्यामुळे येणाºया ३० डिसेंबरला जेलभरो आंदोलन खा. प्रफुल्ल पटले यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अधिक संख्येत भाग घेण्याचे आवाहन केले.शेतकरी दिंडी अभियान २५ ते २९ डिसेंबर २०१७ पर्यंत पांढरी, डव्वा, सौंदड, चिखली, शेंडा अशा प्रकारे जिल्हा परिषद क्षेत्रातील गावामध्ये दिंडी काढून सर्व शेतकरी जनतेला शासन विषयी जनजागृती करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका सडक अर्जुनी अवलंबविण्यात आले आहे.संपूर्ण सडक-अर्जुनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी या दिंडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.