शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

अवकाळीने शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात ३१ ते ३ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे याचा रब्बी पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकेंद्रावरील धान भिजले : धानाला फुटले अंकुर, बळीराजा संकटात, मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. गुरूवारी सकाळी सुध्दा अवकाळी पावसाने हजेरी लावली.परिणामी शासकीय धान खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरेदी केंद्रावर छल्ली मारून ठेवलेल्या धानाला अंकुर फुटू लागल्याने हे धान कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. हरभरा, गहू, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात ३१ ते ३ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे याचा रब्बी पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. यामुळे गुरुवारी दिवसभर गारव्यामुळे हुडहुडी कायम होती. सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे धान वगळता इतर कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे हरभरा आणि गहू हे दोन्ही पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे. जिल्ह्यात यंदा ३६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे. यात २६ हजार हेक्टरवर धान तर १० हजार हेक्टरवर हरभरा, गहू आणि इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस धानासाठी अनुकुल असला तरी इतर कडधान्य पिकांसाठी तो नुकसानकारक आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रब्बी हंगामात हे नुकसान भरुन काढू अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढावले आहे.जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत धान खरेदी केली जाते. सध्या या दोन्ही विभागाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.आदिवासी विकास महामंडळाकडे गोदामे नसल्याने त्यांचा धान उघड्यावर असतो. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर आवक अधिक असल्याने शेतकऱ्यांचा धानाचा पंधरा पंधरा दिवस काटा होत नसल्याने हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. दरम्यान या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने काही धानाला अंकुर सुध्दा फुटल्याने तो धान खरेदी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर जोपर्यंत धानाचा काटा होत नाही तोपर्यंत त्या धानाची जवाबदारी ही शेतकऱ्यांची असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे दोन्हीकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.हरभरा, गव्हाचे सर्वाधिक नुकसानजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी तूर, हरभरा, लाखोळी, वटाणा, करडई, भूईमूंग आदी कडधान्य युक्त पिकांची लागवड करतात. मात्र ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे किडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान झाले.बहरात असलेल्या तूर पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला असून हे पीक अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस