शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात ३१ ते ३ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे याचा रब्बी पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकेंद्रावरील धान भिजले : धानाला फुटले अंकुर, बळीराजा संकटात, मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. गुरूवारी सकाळी सुध्दा अवकाळी पावसाने हजेरी लावली.परिणामी शासकीय धान खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरेदी केंद्रावर छल्ली मारून ठेवलेल्या धानाला अंकुर फुटू लागल्याने हे धान कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. हरभरा, गहू, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात ३१ ते ३ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे याचा रब्बी पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. यामुळे गुरुवारी दिवसभर गारव्यामुळे हुडहुडी कायम होती. सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे धान वगळता इतर कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे हरभरा आणि गहू हे दोन्ही पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे. जिल्ह्यात यंदा ३६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे. यात २६ हजार हेक्टरवर धान तर १० हजार हेक्टरवर हरभरा, गहू आणि इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस धानासाठी अनुकुल असला तरी इतर कडधान्य पिकांसाठी तो नुकसानकारक आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रब्बी हंगामात हे नुकसान भरुन काढू अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढावले आहे.जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत धान खरेदी केली जाते. सध्या या दोन्ही विभागाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.आदिवासी विकास महामंडळाकडे गोदामे नसल्याने त्यांचा धान उघड्यावर असतो. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर आवक अधिक असल्याने शेतकऱ्यांचा धानाचा पंधरा पंधरा दिवस काटा होत नसल्याने हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. दरम्यान या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने काही धानाला अंकुर सुध्दा फुटल्याने तो धान खरेदी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर जोपर्यंत धानाचा काटा होत नाही तोपर्यंत त्या धानाची जवाबदारी ही शेतकऱ्यांची असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे दोन्हीकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.हरभरा, गव्हाचे सर्वाधिक नुकसानजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी तूर, हरभरा, लाखोळी, वटाणा, करडई, भूईमूंग आदी कडधान्य युक्त पिकांची लागवड करतात. मात्र ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे किडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान झाले.बहरात असलेल्या तूर पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला असून हे पीक अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस