शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

खोटे श्रेय लाटत आहे भाजपची टोळी

By admin | Updated: July 27, 2016 02:13 IST

तत्कालीन कॉंग्रेस शासनाने मंजूर केलेली निधी. राज्य शासनाने वैशिष्टपूर्ण कार्य अंतर्गत मंजूर केलेला दोन कोटींचा निधी.

राकेश ठाकूर : मूर्ती रस्ता बांधकामप्रकरणी काँग्रेसची टीका गोंदिया : तत्कालीन कॉंग्रेस शासनाने मंजूर केलेली निधी. राज्य शासनाने वैशिष्टपूर्ण कार्य अंतर्गत मंजूर केलेला दोन कोटींचा निधी. तसेच जिल्हा नियोजन समितीतील आमच्या तीन सदस्यांच्या प्रयत्नांमुळे बाजपेईचौक- सूरज चौक-भवानी मंदिर चौक पर्यंतच्या रस्ता बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाची टोळी या कामाचे भूमिपूजन करून खोटे लाटण्याचे काम करीत आहे. हा प्रकार अत्यंत आश्चर्यजनक व हास्यास्पद असल्याचे नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गट नेता तसेच प्रभाग क्रमांक ७ चे सदस्य राकेश ठाकूर यांनी कळविले आहे. ठाकूर यांच्या पत्रकानुसार, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने तत्कालीन कॉंग्रेस सरकारने गुरूनानक गेट-प्रेम जायस्वाल व सिंधी शाळा रस्त्यासाठी १३५ लाखांचा निधी सन २०१३ मध्ये मंजूर केला. त्या कामातून उरलेल्या ३५ लाखांतून मुर्री चौकी ते बाजपेई चौक रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. तर बाजपेई चौक-सूरज चौक-भवानी चौक रस्ता बांधकामासाठी ४ कोटींची गरज होती. यातील २ कोटी वैशिष्टपूर्ण कार्य अंतर्गत मंजूर करीत राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. तर ४ फेब्रुवारीच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ५ मताधिकार प्राप्त सदस्यांतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी बहुमताच्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात रस्ता बांधकामासाठी २.०३ कोटींचा निधी देण्याची मागणी केली होती. यात पालकमंत्री व नगराध्यक्षांच्या विरोधात बहुमताच्या आधारावर रस्ताचे काम मंजूर करविण्यात आले. विशेष म्हणजे या रस्ता बांधकामासाठी २.०३ कोटींचा निधी तसेच नगराध्यक्षांनी प्रस्तावीक केलेल्या कामांसाठी एकूण ५.९४ कोटींचा निधी उपलब्ध करवून दिला. मात्र नगराध्यक्षांनी अत्यंत हुशारीने सूरज चौक - पोस्टमेन चौक रस्ता वगळून स्वत: प्रस्तावीत केलेल्या अन्य कामांची निविदा काढून हा पैसा खर्च करण्याचा कट रचला होता. मात्र ही निवीदा बघताच आमदार अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत रस्त्यासाठी २.०३ कोटींचा निधी आरक्षीत ठेवून फक्त रस्ता बांधकामासाठीच नखर्च करण्याचे निर्देश दिले. परिणामी या रस्त्यासाठी निविदा झाली मात्र आतापर्यंत कार्यादेश देण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे तर निधीची कमतरता असल्याने स्वत:च्या प्रभागातील सुमारे ५० लाख रूपयांचे काम स्थगित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचेही ठाकूर यांनी सांगीतले. हे सर्व केल्यानंतर मात्र भाजपचे नेता रस्त्याचे भूमिपूजन करून त्याचे श्रेय लाटत आहेत. विशेष म्हणजे, या समारंभापासून सुनियोजीत रित्या त्यांना दूर ठेवण्यात आल्याचेही त्यांनी कळविले. करिता मुख्याधिकाऱ्यांनी या मार्गावरील रस्ता दुभाजक बनविण्याचे तसेच रस्त्यावरील अतिक्र मण हटविण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)