शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

शेतमालाला दुप्पट दाम देण्याचे आश्वासन फोल

By admin | Updated: May 8, 2015 01:02 IST

सन २०१४ च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट दाम देण्याचे आश्वासन देऊन भाजपच्या सरकारने सत्ता हातात घेतली.

शेंडा (कोयलारी) : सन २०१४ च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट दाम देण्याचे आश्वासन देऊन भाजपच्या सरकारने सत्ता हातात घेतली. परंतु सत्तेवर येताच घुमजाव केले. उलट त्यांना आर्थिक संकटाच्या कचाट्यात ढकलून अन्याय केल्याचा आरोप शेंडा परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.पावसाळी धान पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हतबल झाले. त्याची उणीव भरुन काढण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात रबी धान पिकाची लागवड करण्यात आली. सध्या धान पिकाची कापणी सुरू असून मळणीसुद्धा सुरू आहे. शासनाने हमी भाव धान खरेदी केंद्र उघडण्याची परवानगी आजपावेतो दिली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना अत्यल्प दरात धान विकावे लागत आहे. हे दर उत्पादन खर्चाच्या निम्मे असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धानाचे पीक घेताना शेतकऱ्यांना प्रति एकर पंधरा हजार रुपये खर्च करावा लागतो. यामध्ये लागवडीसाठी ट्रॅक्टर खर्च, बियाणे, पेरणी, रोवणी, निंदण, रासायनिक खत, कीटकनाशक, औषध फवारणीपासून मळणीपर्यंतचा खर्च जोडलेला आहे. परंतु शेतकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबातील काम करणाऱ्या महिलांची रोजी जोडली नाही. असे असताना सध्या धान प्रतिक्विंटल नऊशे ते एक हजार रुपये भावाने धान विकावे लागत आहे, ते उत्पादन खर्चाच्या निम्मे आहे.महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्यांना सिंचनाची सोय म्हणून मोठ्या प्रमाणात विहिरी, दुष्काळात मदत व धानाला बोनस देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासले. परंतु सन २०१४ मध्ये सत्ता परिवर्तन होवून भाजपचे सरकार सत्तेवर येताच शेतकरी विरोधी धोरण स्वीकारुन त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप होत आहे. नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहणाऱ्या या जिल्ह्याच्या दबंग नेत्याला परिर्वतनाचा लाटेत पराभव पत्करावा लागला. याचा पश्चाताप शेतकरी करीत आहेत. त्याचप्रमाणे स्वत:ला भूमिपूत्र म्हणवून घेणारे खासदार निवडणूक पूर्व काळापासून दिसेनासे झाल्याने जनतेत रोष आहे.आपला देश कृषीप्रधान आहे. सव्वा कोटी जनतेच्या पोटाची काळजी करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती फारच बिकट आहे. त्यांच्या हिताच्या दृष्टीने उत्पादन खर्चावर भाव मिळणे अपेक्षित आहे. शासनाने तातडीने हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली आहे. (वार्ताहर)