शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला दुप्पट दाम देण्याचे आश्वासन फोल

By admin | Updated: May 8, 2015 01:02 IST

सन २०१४ च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट दाम देण्याचे आश्वासन देऊन भाजपच्या सरकारने सत्ता हातात घेतली.

शेंडा (कोयलारी) : सन २०१४ च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट दाम देण्याचे आश्वासन देऊन भाजपच्या सरकारने सत्ता हातात घेतली. परंतु सत्तेवर येताच घुमजाव केले. उलट त्यांना आर्थिक संकटाच्या कचाट्यात ढकलून अन्याय केल्याचा आरोप शेंडा परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.पावसाळी धान पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हतबल झाले. त्याची उणीव भरुन काढण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात रबी धान पिकाची लागवड करण्यात आली. सध्या धान पिकाची कापणी सुरू असून मळणीसुद्धा सुरू आहे. शासनाने हमी भाव धान खरेदी केंद्र उघडण्याची परवानगी आजपावेतो दिली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना अत्यल्प दरात धान विकावे लागत आहे. हे दर उत्पादन खर्चाच्या निम्मे असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धानाचे पीक घेताना शेतकऱ्यांना प्रति एकर पंधरा हजार रुपये खर्च करावा लागतो. यामध्ये लागवडीसाठी ट्रॅक्टर खर्च, बियाणे, पेरणी, रोवणी, निंदण, रासायनिक खत, कीटकनाशक, औषध फवारणीपासून मळणीपर्यंतचा खर्च जोडलेला आहे. परंतु शेतकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबातील काम करणाऱ्या महिलांची रोजी जोडली नाही. असे असताना सध्या धान प्रतिक्विंटल नऊशे ते एक हजार रुपये भावाने धान विकावे लागत आहे, ते उत्पादन खर्चाच्या निम्मे आहे.महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्यांना सिंचनाची सोय म्हणून मोठ्या प्रमाणात विहिरी, दुष्काळात मदत व धानाला बोनस देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासले. परंतु सन २०१४ मध्ये सत्ता परिवर्तन होवून भाजपचे सरकार सत्तेवर येताच शेतकरी विरोधी धोरण स्वीकारुन त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप होत आहे. नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहणाऱ्या या जिल्ह्याच्या दबंग नेत्याला परिर्वतनाचा लाटेत पराभव पत्करावा लागला. याचा पश्चाताप शेतकरी करीत आहेत. त्याचप्रमाणे स्वत:ला भूमिपूत्र म्हणवून घेणारे खासदार निवडणूक पूर्व काळापासून दिसेनासे झाल्याने जनतेत रोष आहे.आपला देश कृषीप्रधान आहे. सव्वा कोटी जनतेच्या पोटाची काळजी करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती फारच बिकट आहे. त्यांच्या हिताच्या दृष्टीने उत्पादन खर्चावर भाव मिळणे अपेक्षित आहे. शासनाने तातडीने हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली आहे. (वार्ताहर)