शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

वाहकांकडील तिकीट यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड

By admin | Updated: May 21, 2015 01:03 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये वाहकांकडून तिकीटयंत्रांचा वापर करून प्रवाशांना तिकीट दिले जाते.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये वाहकांकडून तिकीटयंत्रांचा वापर करून प्रवाशांना तिकीट दिले जाते. मात्र या यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड होत असल्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यासाठी जुन्या पंचिंग यंत्राचा उपयोग करावाच लागत आहे. या प्रकारामुळे वाहकांसह प्रवाशांनाही मन:स्ताप सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आय.पी. लिमिटेड कंपनीसह पाच वर्षांचा करार करून तिकीट यंत्रे पुरविली होती. या तिकीट यंत्रांमध्ये काही बिघाड झाला तर सदर कंपनी ते दुरूस्त करून देते. गोंदिया आगारातील यंत्रांचा सदर कंपनीसह असलेला कंत्राट १० डिसेंबर २०१४ रोजीच संपला होता. परंतु एसटी महामंडळाने काही कार्यवाही करून एक वर्षाचा वाढीव कालावधी (एक्सटेंडेड पिरिआॅड) मिळवून घेतला. त्यामुळे सदर यंत्रांमध्ये लहान-मोठा काहीही बिघाड झाला तर सदर कंपनीमार्फत ते दुरूस्त करून दिले जाते. गोंदिया आगारात ही तिकीट यंत्रे ११८ होती. यापैकी एक यंत्र तिरोडा आगाराला देण्यात आला आहे. तर आणखी एक यंत्र बसखाली पडून निकामी झालेला आहे. त्यामुळे गोंदिया आगारात सद्यस्थितीत एकूण ११६ तिकीटयंत्रे आहेत. तर तिरोडा आगारात ६० ते ६५ च्या संख्येत ही तिकीटयंत्रे आहेत. या यंत्रांमुळे प्रवाशांना तिकीट घेणे व वाहकांनाही तिकीट देणे सोईचे ठरले आहे. मात्र या यंत्रांमध्ये दर दोन-तीन दिवसांत होणाऱ्या बिघाडामुळे नाईलाजास्तव वाहकांना जुन्या पंचिंग मशिनचा वापर करण्यास भाग पडावे लागत आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी एसटीच्या बसेसमध्ये पंचिंग केलेले तिकीट मिळत होते. सन २००९ मध्ये टीटीआयएम मशिनचा वापर सुरू झाला. जा यंत्रांमध्ये मार्गावरील टप्पे व तिकीट दर नोंदवून वाहकांना सोपविले जाते. प्रवास मार्गावर तिकीट देण्यासाठी वाहक त्यांचा वापर करतात. तसेच पासधारकांच्या पासची नोंदणीसुद्धा त्याद्वारे केली जाते. वाहन तपासणीवेळी व हिशेब सादर करताना एका क्लिकवर संपूर्ण माहिती मिळते. मात्र आता या यंत्रांमध्ये दर दोन-तीन दिवसांत बिघाड होत असल्याने समस्या निर्माण होते.तिकीट बाहेर न येणे, मध्येच हँग होणे, वेळ बदलणे आदी बाबींमुळे वाहकांची डोकेदुखी वाढून प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अधूनमधून जुन्या पद्धतीचा अवलंब प्रवाशांना तिकीट देण्यासाठी दर दोन-तीन दिवसांत करावाच लागत आहे.(प्रतिनिधी)