शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

वाहकांकडील तिकीट यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड

By admin | Updated: May 21, 2015 01:03 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये वाहकांकडून तिकीटयंत्रांचा वापर करून प्रवाशांना तिकीट दिले जाते.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये वाहकांकडून तिकीटयंत्रांचा वापर करून प्रवाशांना तिकीट दिले जाते. मात्र या यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड होत असल्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यासाठी जुन्या पंचिंग यंत्राचा उपयोग करावाच लागत आहे. या प्रकारामुळे वाहकांसह प्रवाशांनाही मन:स्ताप सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आय.पी. लिमिटेड कंपनीसह पाच वर्षांचा करार करून तिकीट यंत्रे पुरविली होती. या तिकीट यंत्रांमध्ये काही बिघाड झाला तर सदर कंपनी ते दुरूस्त करून देते. गोंदिया आगारातील यंत्रांचा सदर कंपनीसह असलेला कंत्राट १० डिसेंबर २०१४ रोजीच संपला होता. परंतु एसटी महामंडळाने काही कार्यवाही करून एक वर्षाचा वाढीव कालावधी (एक्सटेंडेड पिरिआॅड) मिळवून घेतला. त्यामुळे सदर यंत्रांमध्ये लहान-मोठा काहीही बिघाड झाला तर सदर कंपनीमार्फत ते दुरूस्त करून दिले जाते. गोंदिया आगारात ही तिकीट यंत्रे ११८ होती. यापैकी एक यंत्र तिरोडा आगाराला देण्यात आला आहे. तर आणखी एक यंत्र बसखाली पडून निकामी झालेला आहे. त्यामुळे गोंदिया आगारात सद्यस्थितीत एकूण ११६ तिकीटयंत्रे आहेत. तर तिरोडा आगारात ६० ते ६५ च्या संख्येत ही तिकीटयंत्रे आहेत. या यंत्रांमुळे प्रवाशांना तिकीट घेणे व वाहकांनाही तिकीट देणे सोईचे ठरले आहे. मात्र या यंत्रांमध्ये दर दोन-तीन दिवसांत होणाऱ्या बिघाडामुळे नाईलाजास्तव वाहकांना जुन्या पंचिंग मशिनचा वापर करण्यास भाग पडावे लागत आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी एसटीच्या बसेसमध्ये पंचिंग केलेले तिकीट मिळत होते. सन २००९ मध्ये टीटीआयएम मशिनचा वापर सुरू झाला. जा यंत्रांमध्ये मार्गावरील टप्पे व तिकीट दर नोंदवून वाहकांना सोपविले जाते. प्रवास मार्गावर तिकीट देण्यासाठी वाहक त्यांचा वापर करतात. तसेच पासधारकांच्या पासची नोंदणीसुद्धा त्याद्वारे केली जाते. वाहन तपासणीवेळी व हिशेब सादर करताना एका क्लिकवर संपूर्ण माहिती मिळते. मात्र आता या यंत्रांमध्ये दर दोन-तीन दिवसांत बिघाड होत असल्याने समस्या निर्माण होते.तिकीट बाहेर न येणे, मध्येच हँग होणे, वेळ बदलणे आदी बाबींमुळे वाहकांची डोकेदुखी वाढून प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अधूनमधून जुन्या पद्धतीचा अवलंब प्रवाशांना तिकीट देण्यासाठी दर दोन-तीन दिवसांत करावाच लागत आहे.(प्रतिनिधी)