शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

वाहकांकडील तिकीट यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड

By admin | Updated: May 21, 2015 01:03 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये वाहकांकडून तिकीटयंत्रांचा वापर करून प्रवाशांना तिकीट दिले जाते.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये वाहकांकडून तिकीटयंत्रांचा वापर करून प्रवाशांना तिकीट दिले जाते. मात्र या यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड होत असल्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यासाठी जुन्या पंचिंग यंत्राचा उपयोग करावाच लागत आहे. या प्रकारामुळे वाहकांसह प्रवाशांनाही मन:स्ताप सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आय.पी. लिमिटेड कंपनीसह पाच वर्षांचा करार करून तिकीट यंत्रे पुरविली होती. या तिकीट यंत्रांमध्ये काही बिघाड झाला तर सदर कंपनी ते दुरूस्त करून देते. गोंदिया आगारातील यंत्रांचा सदर कंपनीसह असलेला कंत्राट १० डिसेंबर २०१४ रोजीच संपला होता. परंतु एसटी महामंडळाने काही कार्यवाही करून एक वर्षाचा वाढीव कालावधी (एक्सटेंडेड पिरिआॅड) मिळवून घेतला. त्यामुळे सदर यंत्रांमध्ये लहान-मोठा काहीही बिघाड झाला तर सदर कंपनीमार्फत ते दुरूस्त करून दिले जाते. गोंदिया आगारात ही तिकीट यंत्रे ११८ होती. यापैकी एक यंत्र तिरोडा आगाराला देण्यात आला आहे. तर आणखी एक यंत्र बसखाली पडून निकामी झालेला आहे. त्यामुळे गोंदिया आगारात सद्यस्थितीत एकूण ११६ तिकीटयंत्रे आहेत. तर तिरोडा आगारात ६० ते ६५ च्या संख्येत ही तिकीटयंत्रे आहेत. या यंत्रांमुळे प्रवाशांना तिकीट घेणे व वाहकांनाही तिकीट देणे सोईचे ठरले आहे. मात्र या यंत्रांमध्ये दर दोन-तीन दिवसांत होणाऱ्या बिघाडामुळे नाईलाजास्तव वाहकांना जुन्या पंचिंग मशिनचा वापर करण्यास भाग पडावे लागत आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी एसटीच्या बसेसमध्ये पंचिंग केलेले तिकीट मिळत होते. सन २००९ मध्ये टीटीआयएम मशिनचा वापर सुरू झाला. जा यंत्रांमध्ये मार्गावरील टप्पे व तिकीट दर नोंदवून वाहकांना सोपविले जाते. प्रवास मार्गावर तिकीट देण्यासाठी वाहक त्यांचा वापर करतात. तसेच पासधारकांच्या पासची नोंदणीसुद्धा त्याद्वारे केली जाते. वाहन तपासणीवेळी व हिशेब सादर करताना एका क्लिकवर संपूर्ण माहिती मिळते. मात्र आता या यंत्रांमध्ये दर दोन-तीन दिवसांत बिघाड होत असल्याने समस्या निर्माण होते.तिकीट बाहेर न येणे, मध्येच हँग होणे, वेळ बदलणे आदी बाबींमुळे वाहकांची डोकेदुखी वाढून प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अधूनमधून जुन्या पद्धतीचा अवलंब प्रवाशांना तिकीट देण्यासाठी दर दोन-तीन दिवसांत करावाच लागत आहे.(प्रतिनिधी)