शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांना आत्मपरीक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:28 IST

अर्जुनी-मोरगाव : आपला पक्ष कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे, आपल्या पक्षाची राज्यात सत्ता असताना आपण काय केलं याचा ...

अर्जुनी-मोरगाव : आपला पक्ष कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे, आपल्या पक्षाची राज्यात सत्ता असताना आपण काय केलं याचा विचार न करता इतरांवर आगपाखड करायची सवय भाजपच्या लोकांना आहे. मात्र आजचा मतदार सुजाण आहे. मतदारराजाला सर्व कळते. याचे भान भाजपच्या मंडळींनी ठेवावे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनाम्याची मागणी करावी, असे सूचक मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी व्यक्त केले.

सन २०१४ पूर्वी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असताना विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळाप्रकरणी आरोप करून सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर गावितांची मुलगी खासदार व ते आमदार झाले होते. सिंचन घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार व तटकरे यांच्याविरोधात जबरदस्त फटकेबाजी करत या घोटाळ्याचे गाडी भरून पुरावे दिले होते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. उलट अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना सभागृहात राणे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना आरोप आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच वाचून दाखवली होती. तेच राणे भाजपचे खासदार अन् मुलगा आमदार झाला. त्याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँकेमध्ये घोटाळे झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी केली होती. सन २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर दरेकरांना भाजपमध्ये घेतले. विधान परिषदेतून त्यांना आमदार केले व आता ते विधान परिषदेत भाजपचे विरोधी पक्षनेते आहेत. मुख्यमंत्री असताना शिक्षकांचे वेतनखाते मुंबई बँकेत वळते केले. न्यायालयाने फटकारल्यानंतर बँक खाते मागे घेऊन तोंडघशी पडले होते. याच सभागृहात कृपाशंकर सिंह यांच्यावरील घोटाळ्याबद्दल आरोप केले होते. स्वतः मुख्यमंत्री व कृपाशंकर सिंह विरोधी पक्ष नेता असताना त्यांच्याविरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले. त्यांच्या कार्यकाळात नागपुरात गुन्हेगारी गोविंद पानसरे, शेतकरी धर्मा पाटील मृत्यूप्रकरण असे अनेक उदाहरणे आहेत. त्याचे उत्तर फडणवीस यांनी जनतेला दिले पाहिजेत अशी मागणी परशुरामकर यांनी केली आहे.