शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

फडणवीसांना आत्मपरीक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:28 IST

अर्जुनी-मोरगाव : आपला पक्ष कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे, आपल्या पक्षाची राज्यात सत्ता असताना आपण काय केलं याचा ...

अर्जुनी-मोरगाव : आपला पक्ष कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे, आपल्या पक्षाची राज्यात सत्ता असताना आपण काय केलं याचा विचार न करता इतरांवर आगपाखड करायची सवय भाजपच्या लोकांना आहे. मात्र आजचा मतदार सुजाण आहे. मतदारराजाला सर्व कळते. याचे भान भाजपच्या मंडळींनी ठेवावे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनाम्याची मागणी करावी, असे सूचक मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी व्यक्त केले.

सन २०१४ पूर्वी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असताना विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळाप्रकरणी आरोप करून सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर गावितांची मुलगी खासदार व ते आमदार झाले होते. सिंचन घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार व तटकरे यांच्याविरोधात जबरदस्त फटकेबाजी करत या घोटाळ्याचे गाडी भरून पुरावे दिले होते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. उलट अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना सभागृहात राणे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना आरोप आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच वाचून दाखवली होती. तेच राणे भाजपचे खासदार अन् मुलगा आमदार झाला. त्याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँकेमध्ये घोटाळे झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी केली होती. सन २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर दरेकरांना भाजपमध्ये घेतले. विधान परिषदेतून त्यांना आमदार केले व आता ते विधान परिषदेत भाजपचे विरोधी पक्षनेते आहेत. मुख्यमंत्री असताना शिक्षकांचे वेतनखाते मुंबई बँकेत वळते केले. न्यायालयाने फटकारल्यानंतर बँक खाते मागे घेऊन तोंडघशी पडले होते. याच सभागृहात कृपाशंकर सिंह यांच्यावरील घोटाळ्याबद्दल आरोप केले होते. स्वतः मुख्यमंत्री व कृपाशंकर सिंह विरोधी पक्ष नेता असताना त्यांच्याविरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले. त्यांच्या कार्यकाळात नागपुरात गुन्हेगारी गोविंद पानसरे, शेतकरी धर्मा पाटील मृत्यूप्रकरण असे अनेक उदाहरणे आहेत. त्याचे उत्तर फडणवीस यांनी जनतेला दिले पाहिजेत अशी मागणी परशुरामकर यांनी केली आहे.