शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

फडणवीस सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:54 IST

महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : सातबारा वाटप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लघू सिंचन,जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव, तलाव खोलीकरण व पुनरुज्जीवन, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, उपसा सिंचन प्रकल्पांना विशेष निधी, भातखाचर दुरुस्ती कार्यक्रम, मग्रारोहयो माध्यमातून रस्ता खडीकरण व तिरोडा शहराकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन योजनेकरिता २७ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करुन दिला असून प्रत्यक्ष कामाला सुध्दा सुरुवात झाली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने दिलेल्या शब्द पूर्ण केला असल्याचे आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले.तालुक्यातील अर्जुनी, सेजगाव व कवलेवाडा क्षेत्र अंतर्गत शेतकºयांना सातबारा वाटप कार्यक्रम शनिवारी (दि.२६) पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, उपसभापती डॉ. वसंत भगत, जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर, कृउबास संचालक चत्रभूज बिसेन, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, सरपंच कमलेश आतिलकर उपस्थित होते. रहांगडाले म्हणाले, केंद्र सरकारने उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांची धुरापासून मुक्तता करुन वृक्षतोड थांबविली. सर्व विभागाच्या योजनांचा प्रत्यक्ष जनतेस थेट लाभ डीबीटीच्या माध्यमातून कसा होईल यावर भर दिला आहे. महसूल विभागाने दिलेल्या निर्णयानुसार शेतकºयांचे सातबारा वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये हस्तांतरीत करुन वर्ग १ चा सातबारा उताºयाचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.