शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

फडणवीस सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:54 IST

महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : सातबारा वाटप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लघू सिंचन,जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव, तलाव खोलीकरण व पुनरुज्जीवन, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, उपसा सिंचन प्रकल्पांना विशेष निधी, भातखाचर दुरुस्ती कार्यक्रम, मग्रारोहयो माध्यमातून रस्ता खडीकरण व तिरोडा शहराकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन योजनेकरिता २७ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करुन दिला असून प्रत्यक्ष कामाला सुध्दा सुरुवात झाली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने दिलेल्या शब्द पूर्ण केला असल्याचे आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले.तालुक्यातील अर्जुनी, सेजगाव व कवलेवाडा क्षेत्र अंतर्गत शेतकºयांना सातबारा वाटप कार्यक्रम शनिवारी (दि.२६) पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, उपसभापती डॉ. वसंत भगत, जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर, कृउबास संचालक चत्रभूज बिसेन, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, सरपंच कमलेश आतिलकर उपस्थित होते. रहांगडाले म्हणाले, केंद्र सरकारने उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांची धुरापासून मुक्तता करुन वृक्षतोड थांबविली. सर्व विभागाच्या योजनांचा प्रत्यक्ष जनतेस थेट लाभ डीबीटीच्या माध्यमातून कसा होईल यावर भर दिला आहे. महसूल विभागाने दिलेल्या निर्णयानुसार शेतकºयांचे सातबारा वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये हस्तांतरीत करुन वर्ग १ चा सातबारा उताºयाचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.