शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

फडणवीस सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:54 IST

महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : सातबारा वाटप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यापासून संपूर्ण राज्यात सिंचनावर विशेष भर देवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लघू सिंचन,जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव, तलाव खोलीकरण व पुनरुज्जीवन, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, उपसा सिंचन प्रकल्पांना विशेष निधी, भातखाचर दुरुस्ती कार्यक्रम, मग्रारोहयो माध्यमातून रस्ता खडीकरण व तिरोडा शहराकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन योजनेकरिता २७ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करुन दिला असून प्रत्यक्ष कामाला सुध्दा सुरुवात झाली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने दिलेल्या शब्द पूर्ण केला असल्याचे आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले.तालुक्यातील अर्जुनी, सेजगाव व कवलेवाडा क्षेत्र अंतर्गत शेतकºयांना सातबारा वाटप कार्यक्रम शनिवारी (दि.२६) पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, उपसभापती डॉ. वसंत भगत, जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर, कृउबास संचालक चत्रभूज बिसेन, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, सरपंच कमलेश आतिलकर उपस्थित होते. रहांगडाले म्हणाले, केंद्र सरकारने उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांची धुरापासून मुक्तता करुन वृक्षतोड थांबविली. सर्व विभागाच्या योजनांचा प्रत्यक्ष जनतेस थेट लाभ डीबीटीच्या माध्यमातून कसा होईल यावर भर दिला आहे. महसूल विभागाने दिलेल्या निर्णयानुसार शेतकºयांचे सातबारा वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये हस्तांतरीत करुन वर्ग १ चा सातबारा उताºयाचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.