शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

सुविधांपासून मुकावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 21:52 IST

गाव हागणदारीमुक्त करुन स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास गावात रोगमुक्त वातावरण निर्माण होईल. सर्वांच्या घरी शौचालय असावे.

ठळक मुद्देजावेद इनामदार : बरबसपुरा येथे गुडमॉर्निंग पथकाची मोहीम

आॅनलाईन लोकमतकाचेवानी : गाव हागणदारीमुक्त करुन स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास गावात रोगमुक्त वातावरण निर्माण होईल. सर्वांच्या घरी शौचालय असावे. त्याचा नियमित वापर होणे गरजेचे आहे. शौचालय नसणाºया व वापर करीत नसल्यास त्यांना शासनाच्या मिळणाºया सुविधांना मुकावे लागणार, असा इशारा तिरोडा पं.स. चे गटविकास अधिकारी जावेद ईनामदार यांनी दिला.बरबसपुरा येथे गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून हागणदारी मुक्त अभियान राबविण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या सभेत ते मार्गदर्शन करीत होते.गुडमॉर्निंग पथकात गटविकास अधिकारी जावेद इनामदार, गटशिक्षणाधिकारी पी.पी. समरीत, कृषी विस्तार अधिकारी जी.एम. भायदे, सरपंच नरेश असाटी, उपसपरंच प्रमिला कोसरे, भूवन पेशने, सुरेश पटले, राठोड, बिसेन, ग्रा.पं. सदस्य उषा पटले, रत्नमाला शेंदरे, दिनेश पटले, गोपाल नेवारे, वीणा कटरे, मुख्याध्यापक हरिणखेडे, अंगणवाडी सेविका श्यामकला रहांगडाले, प्रेरक पायल डोंगरे यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांच्या नेतृत्वात बरबसपुरा गावात सकाळी ४.३० वाजता गुडमॉर्निंग पथक पोहोचले. त्यानंतर सरपंच नरेश असाटी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गावाचे भ्रमण करण्यात आले.संपूर्ण रस्ते आणि तळ्यावर जावून गुडमॉर्निंग पथकाने नजर ठेवली. मात्र बाहेर शौचास जाणारा एकही व्यक्ती आढळला नाही.यानंतर गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी आपल्या सहकाºयांसह ग्रामस्थांच्या घरी जावून शौचालयांची पाहणी केली.तसेच परिवारातील कोणताही सदस्य उघड्यावर शौचास जाणार नाही, याची काळजी घ्यावी. याकडे लक्ष देण्यात आले नाही तर शासनाकडून मिळणाºया सुविधा बंद करण्यात येईल असे सांगितले. याची गावातील कुटुंब प्रमुखांनी समजून घ्यावे. असेही इनामदार यांनी बजावून सांगितले. यावेळी गविअ इनामदार यांना अनेक नागरिकांनी उघड्यावर शौचास जाणार नाही, असे आश्वासन दिले.दंडात्मक कारवाईची भीतीगटविकास अधिकारी इनामदार यांच्या नेतृत्वात सतत गुडमॉर्निंग पथकाच्या गावो-गावी धाडी पडत असल्याने नागरिकांमध्ये आपल्यावर दंडात्मक कारवाई तर होणार नाही, याची भीती निर्माण झाली आहे. तसेच काही घरी शौचालयांची सुविधा नसल्याने किंवा सुस्थितीत नसल्यामुळे फजिती झाली आहे.सभेद्वारे मार्गदर्शनउच्च प्राथमिक शाळेत सभा घेण्यात आली. यात गविअ जावेद इनामदार यांनी शौचालयाचे महत्व सांगून उघड्यावर शौचास जाण्याच्या दुष्परिणामांची माहिती दिली. या वेळी गटशिक्षणाधिकारी पी.पी. समरीत यांनी मार्गदर्शन केले. सरपंच नरेश असाटी यांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या गुडमॉर्निंग पथकाला यश मिळवून देवू. तसेच गावात स्वच्छता राखून ठेवू, असे आश्वासन दिले.