शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

मुखवट्याआड दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:51 IST

भर उन्हाळ्यात भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होणार आहे.

ठळक मुद्देदिल्ली ते गल्लीचे निवडणुकीकडे लक्ष : लोकसभा पोटनिवडणूक, प्रचाराचा ज्वर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भर उन्हाळ्यात भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होणार आहे. ही निवडणूक जेवढी उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. त्यापेक्षा ती अधिक या उमेदवारांच्या मुखवट्या आड असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार नाना पटोले यांच्यासाठी महत्त्वाचीे आहे. त्यामुळेच ही पोटनिवडणूक हेवीवेट ठरत आहे. याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत नजर लागली आहे.माजी खा. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. पटोले यांनी शेतकऱ्यांच्या ज्या मुद्दावर राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला. तसेच पोटनिवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.ही निवडणूक २०१९ च्या निवडणुकांची नांदी असल्याने ही जागा कायम ठेवणे भाजपासाठी प्रतिष्ठेचे झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुकडे आणि पटले हे उमेदवार असले तरी खरी लढत पटोले आणि फडणवीस यांच्यामध्येच असल्याची चर्चा या मतदार संघात आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र सुरूवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. त्यामुळेच या क्षेत्रातून राष्ट्रवादीने मधुकर कुकडे यांना उमेदवारी जाहीर केली.या पोटनिवडणुकीत कुकडे यांच्या विजयासाठी खा. प्रफुल पटेल पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे. मागील दोन महिन्यापासून या क्षेत्रात सभा बैठकांच्या माध्यमातून पदाकारी, कार्यकर्ते आणि मतदारांच्या संपर्कात आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी कुकडे यांचे नाव ठरविल्याने त्यांच्या विजयासाठी पटेल, पटोले यांच्यासह सर्व नेते मेहनत घेत असल्याचे चित्र आहे. भाजपाने मतदार संघावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा कामाला लावला आहे.नागपुरातील अनेक वरिष्ठ नेते यासाठी या लोकसभा क्षेत्रात तळ ठोकून आहेत. त्यामुळे भाजपाने ही पोटनिवडणूक फार गांर्भियाने घेतल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील एकूण १७ लाख ७० हजार मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यात जातीय समीकरण सुध्दा फार महत्त्वाचे ठरणार आहे. या दोन्ही जिल्ह्यात अडीच लाखांवर पोवार समाजाचे मतदार तर तीन लाखांवर कुणबी समाजाचे मतदार आहेत. तर युवा आणि नव मतदारांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या निवडणुकीचे समीकरण बºयाच प्रमाणात यासर्व गोष्टींवर सुध्दा अवलंबून आहे.या लोकसभा क्षेत्रात आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये या दोन्ही समाजाच्या मतांची फार मोठी भूमिका राहीली आहे. या दोन्ही समाजाची मते घेण्यात ज्या पक्षाचा उमेदवार यशस्वी होईल, त्याचा विजयाचा मार्ग बºयाच प्रमाणात सुकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा वैयक्तीक दाडंगा जनसंपर्क सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सोशल मीडियावरून आगपखाडभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची सोशल मिडियावर सुध्दा चांगलीच चर्चा रंगली आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्हॉटसअ‍ॅप व फेसबुकवर एकामेकांच्या पक्षांच्या उमेदवारांची उणे दुणे काढत आहे. तर काहींनी घोषवाक्य सुध्दा तयार केले आहे. ना काँग्रेस ना रॉका आपला ताणू काका, ना इकडे तिकडे आपला भाऊ कुकडे असे घोषवाक्य ही घोष वाक्य सुध्दा मतदारांसाठी मनोरंजनात्मक ठरत आहेत. तर काही कार्यकर्ते विविध कार्टून तयार करुन मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करित आहे.वादळाचा फटकायंदा तापमानात चांगलीच वाढ होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सभांचे शेड्युल सांयकाळच्या वेळेत ठेवले आहे. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून तापमानात बदल झाला आहे. रविवार आणि सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळासह पावासाने हजेरी लावली. त्यामुळे याचा फटका विविध पक्षाच्या नियोजीत प्रचार संभाना बसला. काही ठिकाणच्या सभा सुध्दा रद्द कराव्या लागल्याची माहिती आहे.प्रचार संभाना गर्दी जमविण्यासाठी दमछाकभर उन्हाळ्यात लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्याने आधीच मतदारांमध्ये उत्सुकता नाही. त्यातच शेतकरी सध्या खरीप हंगामपूर्व शेतीच्या कामात व्यस्त आहे. तर मजुरवर्ग तेंदूपत्ता आणि मनरेगाच्या कामांवर गेले आहे. त्यामुळे गावात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सामसूम असते. त्यामुळे दुपारच्या वेळेत सभा घेतांना गर्दी जमविताना उमदेवारांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे.जे चार वर्षांत झाले नाही ते दहा महिन्यात होणार का?या लोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला केवळ आठ ते दहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे ऐवढ्या कमी कालावधीत या मतदार संघातील विकास कामे, प्रलबिंत समस्या मार्गी लागणार का? असा सवाल सुध्दा मतदारांकडून केला जात आहे. कारण मागील चार वर्षांत या क्षेत्रात जी कामे झाली नाहीत ती दहा महिन्यात पूर्ण होणार का? अशी चर्चा सुध्दा मतदारांमध्ये आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक