शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नेत्रदानाप्रती नागरिक होताहेत डोळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:28 IST

नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे, मृत्युनंतर मनुष्याचे शरीर नषवर होते. मात्र मृत्युनंतर ६ तासांनी नेत्रदान करता येते. यामुळे मृत्युनंतर एखाद्याच्या जीवनातील अंधकार दूर करता येणे शक्य आहे. हळूहळू ही बाब आता शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुध्दा कळू लागली आहे.

ठळक मुद्देचारशे नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प : तिघांनी केले नेत्रदान

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे, मृत्युनंतर मनुष्याचे शरीर नषवर होते. मात्र मृत्युनंतर ६ तासांनी नेत्रदान करता येते. यामुळे मृत्युनंतर एखाद्याच्या जीवनातील अंधकार दूर करता येणे शक्य आहे. हळूहळू ही बाब आता शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुध्दा कळू लागली आहे. नागरिक नेत्रदानाप्रती डोळस होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील चारशे नागरिकांनी नेत्रदान करण्याचे प्रतिज्ञपत्र भरले आहे. तर तिघांनी मृत्युनंतर नेत्रदान करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.देशात नेत्रहिनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहींचे डोळे आजारामुळे तर काहींचे अपघातमुळे निकामी झाले. त्यामुळे त्यांना जगातील सौंदर्य पाहण्यापासून मुकावे लागले.यामुळे त्यांच्या जीवनात अंधकार निर्माण झाला आहे. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे अंध व्यक्तींना पुन्हा डोळस करणे शक्य असून त्यांना जगातील सौंदर्य न्याहाळता येणे शक्य आहे. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर ते नेत्रदान करू शकतात. मृत्युनंतर ६ तासांच्या कालावधीत नेत्र बुबुळ काढावे लागते.नेत्रदानाच्या माध्यमातून नेत्रबुबुळाच्या आजाराने पिढीत रुग्णांना दृष्टी देता येते. गंभीर आजाराचे रुग्ण वगळता सर्वांनाच नेत्रदान करता येते. शिवाय आपण केलेल्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करता येतो. या सर्व गोष्टींची जाणीव आता जिल्हावासीयांना होवू लागली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ४०० नागरिकांनी मृत्युपश्चात नेत्रदान करण्याचे प्रतिज्ञापत्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र रुग्ण विभागाकडे भरुन दिले आहे. विशेष म्हणजे गोंदिया येथे महिनाभरापूर्वी आयोजित सिंधी समाजबांधवाच्या एका कार्यक्रमात तब्बल दीडशे नागरिकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. तर दोन दिवसांपूर्वी गोंदिया विधानसभा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या कार्यक्रमात सुध्दा अनेकांनी नेत्रदान करण्याचे प्रतिज्ञा पत्र भरुन देत नेत्रदानाचा संकल्प केला. यामुळे नेत्रदानाप्रती नागरिक डोळस होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.नेत्रदानासाठी काय करावे लागते?गंभीर आजाराचा रुग्ण वगळता कुणीही नेत्रदान करु शकतो. नेत्रदान करण्यासाठी संमतीपत्र भरण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर नेत्रदान कर्त्यांची नोंदणी करुन त्यांना डोनर शासकीय रुग्णालयातून डोनर कार्ड दिले जाते. नेत्रदान कर्त्याच्या मृत्त्युनंतर लगेच त्याच्या नातेवाईकांनी याची माहिती जवळच्या शासकीय रुग्णालयाला देणे आवश्यक आहे. मृत्युच्या आधी नेत्रदान संकल्प पत्र भरले नसल्यास मृत व्यक्तीचे नातेवाईक वेळवर नेत्रदानाचा निर्णय घेवून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.