शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

शेतीला विद्युत पुरवठा करण्यास कमालीचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST

बोंडगावदेवी : वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोणामुळे बाक्टी-चान्ना येथील ५ शेतकऱ्यांच्या विहिरींना वीजपुरवठा करण्यास कमालीचा विलंब होत असल्याची ओरड ...

बोंडगावदेवी : वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोणामुळे बाक्टी-चान्ना येथील ५ शेतकऱ्यांच्या विहिरींना वीजपुरवठा करण्यास कमालीचा विलंब होत असल्याची ओरड आहे. परिणामी या शेतकऱ्यांना पीक घेणे अशक्य झाले आहे.

बाक्टी येथील एकनाथ शहारे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान योजनेंतर्गत शेतात बोअरवेलसह विहीर खोदण्यात आली. त्यांच्याच शेतशिवाराजवळील अन्य चार शेतकऱ्यांनी शेतात विहीर खोदली आहे. स्वत:च्या शेतात पाण्याची सोय झाल्याने बारमाही पीक घेण्याची संधी त्या शेतकऱ्यांना चालून आली. विहिरीच्या पाण्यातून जलसिंचन होण्यासाठी वीजपुरवठा व्हावा या हेतूने त्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह वीज वितरण कंपनीकडे अर्स सादर केला. मागील वर्षी २५ फेब्रुवारी २०२० रोजी डिमांड पोटी पाच हजार ८०६ रुपयांचा भरणा सुद्धा केला.

याला आता तब्बल एक वर्षांचा कालावधी होऊन सुद्धा आजपावेतो त्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सौजन्य दाखविले नाही. वीजपुरवठा होऊ न शकल्याने त्या शेतकऱ्यांना शेती उत्पादनापासून वंचित रहावे लागत आहे. कुंभकर्णी झोपी गेलेल्या वीज वितरण कंपनीला जाग केव्हा येईल हे कळायला मार्गच दिसत नाही.