शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

विकास योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भाग व सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभासाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक मागासले आहेत. कारण त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहचत नाही. अशात पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचवावी. तेव्हाच सर्व सामान्यांचा विकास होणार असे प्रतिपादन आमदार ...

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पंचायत समितीच्या आमसभेत विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भाग व सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभासाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक मागासले आहेत. कारण त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहचत नाही. अशात पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचवावी. तेव्हाच सर्व सामान्यांचा विकास होणार असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.पंचायत समितीची वार्षिक आमसभा नुकतीच पार पडली असून सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, पशुसंवर्धन-कृषी विभागाकडे पशुधन विकासासाठी पशुपालकांना गाय-बैल देण्याची योजना आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांच्या नावावर लाखो रूपयांचे पशुधन वितरीत केले जाते त्यांना या योजनेबाबत काही माहिती नसते. तसेच त्यांच्याकडे पशु ही नसते. यामुळे सरकारच्या निधीचा गैरवापर थांबविण्यासाठी गंभीर प्रयत्न व्हायला हवे. अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार रहावे असा इशाराही त्यांनी पंचायत समितीतील सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिला.पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, सर्व सामान्य नागरिकांच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी पंचायत समिती प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. तर जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांनी, आमदारांच्या नेतृत्वात तालुका विविध विकास कामे होत असून अशी दूरदृष्टी अन्य लोकप्रतिनिधीत बघावयास मिळत नसल्याचे सांगीतले. दरम्यान सभेत कृषी, पंचायत, शिक्षण, पशुसवंर्धन, बांधकाम, महिला सशक्तीकरण व बालविकास, वीज मंडळ, पोलीस, तहसील कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा आदि विषयांवर तालुक्यात सुरू असलेली कामे तसेच नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.सभेला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, बाजार समिती सभापती चुन्नी बेंद्रे, उपसभापती धनलाल ठाकरे, चमन बिसेन, स्नेहा गौतम, प्रकाश रहमतकर, अर्जुन नागपुरे, रूद्रसेन खांडेकर, सरिता अंबुले, लक्ष्मी रहांगडाले, ओमप्रकाश भक्तवर्ती, मनिष मेश्राम, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, विमल नागपुरे, अनिल मते, विनिता टेंभरे, निता पटले, प्रमिला करचाल, प्रकाश डहाट, जयप्रकाश बिसेन, प्रिया मेश्राम, सारंग भेलावे, हरिचंद कावळे, इंद्रानी धावडे, योगराज उपराडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपससरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.पाणी टंचाईवरही चर्चाआमसभेत आमदार अग्रवाल यांनी तालुक्यातील पाणी टंचाईचा विषय ही मांडला. त्यांनी पाणी टंचाईच्या समस्येशी निपटण्यासाठी योजनांवर गंभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. तसेच याबाबत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय सत्रात याकडे सरकारचे ध्यानाकर्षित केले असून पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्याचे सांगीतले. तसेच शासनाच्या योजनांची माहिती सर्व नागरिक व सामाजीक कार्यकर्त्यांना व्हावी यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रस्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यास सांगीतले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल