शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ दारापर्यंत पोहोचवा

By admin | Updated: March 2, 2017 00:13 IST

केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना गावपातळीवरील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहेत.

 नाना पटोले : १२ कोटींच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन बोंडगावदेवी : केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना गावपातळीवरील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहेत. आजही खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहोचत नसल्यामुळे गावातील सामान्य माणूस विकासापासून कोसो दूर आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. गावपातळीवरील सामान्य माणूस विकासाचा केंद्र बिंदू समजून विविध योजनांचा लाभ सामान्यांच्या दारापर्यंत सहजरित्या पोहोचविण्याचा आपला कटाक्ष राहणार. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी परिसरातील रस्ते निटनेटके असणे गरजेचे आहे. रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. गावातील सामान्य माणसाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीच्या योजना गावात आणण्याची ग्वाही खा.नाना पटोले यांनी दिली. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अड्याळ-दिघोरी-बोंडगावदेवी- नवेगावबांध-चिचगड या रस्त्यामधील नऊ किमी रस्त्याचे १२ कोटी रुपये खर्चून रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येत असलेल्या कामाचे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. येथील मातोश्री रमाई आंबेडकर चौकातील दिघोरी-चान्ना मार्गावर विधीवत पूजाअर्चा करुन खा. नाना पटोले यांच्या हस्ते कुदळ मारुन भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनानंतर स्थानिक बाजार चौकातील जि.प. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर घेण्यात आलेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. नाना पटोले होते. अतिथी म्हणून स्थानिक सरपंच राधेशाम झोळे, चान्नाचे सरपंच मोरेश्वर सोनवाने, बाक्टीचे सरपंच जितेंद्र शेंडे, सिलेझरीचे सरपंच प्रकाश टेंभुर्णे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुंभरे, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, उपसरपंच वैशाली मानकर, वनसमितीचे अध्यक्ष डॉ. श्यामकांत नेवारे, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, पं.स. उपसभापती आशा झिलपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता लांजेवार, शाखा अभियंता कुमार जांभुळकर, वासनिक, शहारे, माजी पं.स. सदस्य अभय फुल्लुके, प्रमोद पाऊलझगडे, राजू पालीवाल, मुकेश जायस्वाल, चुन्नू नशिने, संजय जायस्वाल उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. नाना पटोले म्हणाले, मागील काही वर्षापूर्वी ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था होती. आमदार असताना वैधानिक विकास महामंडळाच्या वतीने रस्त्यांची दुरुस्ती करुन गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला गेला. गावाची ओळख रस्त्यामुळे होत असल्याने संबंधित यंत्रनेने कामाचा दर्जा उत्तम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पूर्वी परंपरेपासून चालत आलेली गरिबीची परंपरा मोडीत काढावी लागणार आहे. गावातील बेरोजगार युवकांना काम मिळण्यासाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी पुढे उपाययोजना निश्चित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक अधिकार दिले आहेत. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब झाला. विद्यमान सरकार वंचितांना त्यांचे अधिकार व हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. बांधकाम विभागाने रस्त्यालगत तयार केलेल्या नाल्या खुल्या न ठेवता अंडरग्राऊंड कराव्या, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना केले. सामान्यांची तळमळ असल्याने लोकांच्या सामान्य तक्रारी निकाली काढण्यासाठी आपण जनता दरबाराच्या माध्यमातून एक उपक्रम राबवित असल्याचे खा. नाना पटोले यांनी सांगितले. संचालन रत्नाकर बोरकर तर प्रास्ताविक राधेशाम झोळे यांनी केले. आभार चान्नाचे सरपंच मोरेश्वर सोनवाने यांनी मानले. (वार्ताहर) घरापासून कुणीही वंचित राहणार नाही केंद्र व राज्याच्या विविध योजना मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आहेत. योजना समाजातील शेवटच्या घटकातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. येत्या २०२० पर्यंत प्रत्येक गरजूला घरे देण्याचा महत्वकांक्षी निर्णय प्रधानमंत्री मोदींनी घेतला आहे. त्यामुळे घरापासून कोणीही वंचित राहणार नाही. गावात होणारी ग्रामसभा विकासाचा प्राण आहे. गावातील जनतेने ग्रामसभेत सहभागी होवून विकास योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन खा. नाना पटोले यांनी याप्रसंगी केले.