शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ दारापर्यंत पोहोचवा

By admin | Updated: March 2, 2017 00:13 IST

केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना गावपातळीवरील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहेत.

 नाना पटोले : १२ कोटींच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन बोंडगावदेवी : केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना गावपातळीवरील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहेत. आजही खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहोचत नसल्यामुळे गावातील सामान्य माणूस विकासापासून कोसो दूर आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. गावपातळीवरील सामान्य माणूस विकासाचा केंद्र बिंदू समजून विविध योजनांचा लाभ सामान्यांच्या दारापर्यंत सहजरित्या पोहोचविण्याचा आपला कटाक्ष राहणार. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी परिसरातील रस्ते निटनेटके असणे गरजेचे आहे. रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. गावातील सामान्य माणसाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीच्या योजना गावात आणण्याची ग्वाही खा.नाना पटोले यांनी दिली. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अड्याळ-दिघोरी-बोंडगावदेवी- नवेगावबांध-चिचगड या रस्त्यामधील नऊ किमी रस्त्याचे १२ कोटी रुपये खर्चून रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येत असलेल्या कामाचे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. येथील मातोश्री रमाई आंबेडकर चौकातील दिघोरी-चान्ना मार्गावर विधीवत पूजाअर्चा करुन खा. नाना पटोले यांच्या हस्ते कुदळ मारुन भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनानंतर स्थानिक बाजार चौकातील जि.प. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर घेण्यात आलेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. नाना पटोले होते. अतिथी म्हणून स्थानिक सरपंच राधेशाम झोळे, चान्नाचे सरपंच मोरेश्वर सोनवाने, बाक्टीचे सरपंच जितेंद्र शेंडे, सिलेझरीचे सरपंच प्रकाश टेंभुर्णे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुंभरे, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, उपसरपंच वैशाली मानकर, वनसमितीचे अध्यक्ष डॉ. श्यामकांत नेवारे, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, पं.स. उपसभापती आशा झिलपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता लांजेवार, शाखा अभियंता कुमार जांभुळकर, वासनिक, शहारे, माजी पं.स. सदस्य अभय फुल्लुके, प्रमोद पाऊलझगडे, राजू पालीवाल, मुकेश जायस्वाल, चुन्नू नशिने, संजय जायस्वाल उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. नाना पटोले म्हणाले, मागील काही वर्षापूर्वी ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था होती. आमदार असताना वैधानिक विकास महामंडळाच्या वतीने रस्त्यांची दुरुस्ती करुन गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला गेला. गावाची ओळख रस्त्यामुळे होत असल्याने संबंधित यंत्रनेने कामाचा दर्जा उत्तम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पूर्वी परंपरेपासून चालत आलेली गरिबीची परंपरा मोडीत काढावी लागणार आहे. गावातील बेरोजगार युवकांना काम मिळण्यासाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी पुढे उपाययोजना निश्चित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक अधिकार दिले आहेत. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब झाला. विद्यमान सरकार वंचितांना त्यांचे अधिकार व हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. बांधकाम विभागाने रस्त्यालगत तयार केलेल्या नाल्या खुल्या न ठेवता अंडरग्राऊंड कराव्या, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना केले. सामान्यांची तळमळ असल्याने लोकांच्या सामान्य तक्रारी निकाली काढण्यासाठी आपण जनता दरबाराच्या माध्यमातून एक उपक्रम राबवित असल्याचे खा. नाना पटोले यांनी सांगितले. संचालन रत्नाकर बोरकर तर प्रास्ताविक राधेशाम झोळे यांनी केले. आभार चान्नाचे सरपंच मोरेश्वर सोनवाने यांनी मानले. (वार्ताहर) घरापासून कुणीही वंचित राहणार नाही केंद्र व राज्याच्या विविध योजना मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आहेत. योजना समाजातील शेवटच्या घटकातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. येत्या २०२० पर्यंत प्रत्येक गरजूला घरे देण्याचा महत्वकांक्षी निर्णय प्रधानमंत्री मोदींनी घेतला आहे. त्यामुळे घरापासून कोणीही वंचित राहणार नाही. गावात होणारी ग्रामसभा विकासाचा प्राण आहे. गावातील जनतेने ग्रामसभेत सहभागी होवून विकास योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन खा. नाना पटोले यांनी याप्रसंगी केले.