शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

गावात स्फोटांचे हादरे

By admin | Updated: January 18, 2015 22:44 IST

सतत ३० वर्षांपासून चिरचाळबांध पहाडीवर क्रशर मशिनद्वारे गिट्टी फोडण्याचे काम सुरू आहे. महिन्यातून एक किंवा दोन वेळा बॉम्बस्फोट करुन दगड काढले जातात. या स्फोटामुळे

चिरचाळबांधवासीयांत दहशत : बारूदच्या दुर्गंधीमुळे गावकरी व पर्यावरणाला धोकाआमगाव : सतत ३० वर्षांपासून चिरचाळबांध पहाडीवर क्रशर मशिनद्वारे गिट्टी फोडण्याचे काम सुरू आहे. महिन्यातून एक किंवा दोन वेळा बॉम्बस्फोट करुन दगड काढले जातात. या स्फोटामुळे अर्ध्या कि.मी. अंतरावरील चिरचाळबांध गावाला हादरे बसत आहेत. या स्फोटांसाठी वापरण्यात येणाऱ्या बारुदच्या दुर्गंधीमुळे गावकरी व पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीच दखल घेतली नाही.या पहाडीवर क्रशर मशिनद्वारे गिट्टी फोडण्याचे काम सुरू आहे. दिवसातून अनेकवेळा लहान-सहान स्फोट करुन दगड बाहेर काढले जातात. मात्र मोठे दगड कठिण असल्यास त्यांच्यासाठी जास्त क्षमतेचे स्फोट केले जातात. या सततच्या स्फोटांमुळे चिरचाळबांध, शिवणी, भजेपार, सितेपार, बुराडीटोला, बासीपार या गावांना हादरा बसतो. यामुळे सिमेंट किंवा पक्क्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. क्रशर मशिनचे सहा सात ठिकाण असून तेथे बारीक गिट्टी तयार केली जाते. तर सुमारे १० ते १२ कंपन्या या पहाडीवर कार्यरत आहेत. पूर्ण चिरचाळबांध पहाडी ६० ते ७० एकरात विस्तारीत आहे. या पहाडीवरील गिट्टी अदानी पॉवर प्लांट, मध्यप्रदेश, गोंदिया व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रकने तसेच ट्रॅक्टरने पाठविली जाते. अनेक व्यवसायी याठिकाणी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष जुळले आहेत. सदर पहाडीवरील गिट्टी खोदकाम करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांची अनुमती आवश्यक आहे. यात किती मशिनला गिट्टी फोडण्याची व बॉम्बस्फोट करण्याची परवानगी देण्यात आली ते गुलदस्त्यात आहे. सत्य काय याची कल्पना कुणालाच नाही. मात्र येथील सततच्या स्फोटांमुळे परिसरात दहशत आहे. तर स्फोटांतून निघणाऱ्या बारुदच्या धुरामुळे खाणीत काम करणाऱ्या कामगारांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. हा परिसर सतत बॉम्बस्फोट व निघणाऱ्या पांढऱ्या धुळाने वेढलेला असतो. केवळ पैसा कमविणे हाच मुख्य उद्देश या पहाडीवर दिसत आहे. याचा परिणाम भविष्यात परिसरातील गावांना व नागरिकांना निश्चित होईल. मुकबधिर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)