शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

कालबाह्यआहाराचा पुरवठा

By admin | Updated: April 18, 2015 00:39 IST

येथील आठही अंगणवाड्यांमधून लाभार्थ्यांना एक्सपायर आहाराचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अंगणवाड्यांतील प्रकार : नागरिकांची कारवाईची मागणी नवेगावबांध : येथील आठही अंगणवाड्यांमधून लाभार्थ्यांना एक्सपायर आहाराचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाककृती-१ व पाकृती-२ नावाचे होऊनही त्याचा लाभार्थ्यांना पुरवठा होत असल्याने हा प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप परिसरात होत आहे. सविस्तर वृत्त असे की, पंचायत समिती अर्जुनी/मोरगावच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत येथील आठ आंगणवाड्यांमधून बालक, किशोरवयीन मुली, गरोदर महिला व स्तनदा मातांना पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. सदर पोषण आहार पाककृती-१ व पाककृती-२ नावाने सध्या पुरविला जात आहे. सदर आहाराची निर्मिती समता महिला बचत गट (गोंदिया) यांनी केलेली असल्याचे दिसून येते. या उत्पादनाचा बॅच नं. पी.एम. ०१/० १५ व उत्पादनाचा दिनांक फेब्रुवारी २०१५ सीआरएएम ९९० असा उत्पादनावर प्रकाशित आहे. सदर उत्पादनाचा कालावधी उत्पादन निर्मितीच्या दिनांकापासून दोन महिने राहिल असा देखील उल्लेख पाकीटावर आहे. परंतु अशा कालबाह्य उत्पादानांचा बिनधास्तपणे वाटप करण्यात येत आहे. जि.प. आरोग्य विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे ही चुक झालेली आहे. याचा अर्थ असा की पदाधिकारी कमजोर व शासकीय यंत्रणा वरचढ झालेली दिसत असल्याचेही बोलले जाते. पुरवठादार व प्रशासकीय यंत्रणा यांचे काही लागेबांधे असल्याचा संशय देखील घेण्यात येत आहे.सदर बाब गंभीर स्वरुपाची असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य महादेव बोरकर व किशोर तरोणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)यंत्रणेची कर्तव्यदक्षता चव्हाट्यावरआंगणवाड्यांतून लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेल्या पाककला या आहारांच्या पाकीटावर १ फेब्रुवारी १५ रोजी पॅकिंग दिनांक नोंदविले असून १ एप्रिल १५ पर्यंत वापरता येण्यालायक हे पदार्थ आहेत. त्यानंतर मात्र ते कालबाह्य ठरते. असे कालबाह्य उत्पादन नष्ट करणे आवश्यक असते. मात्र लाभार्थ्यांना अशा या कालबाह्य आहाराचा पुरवठा केला जाणे हि गंभीर बाब आहे. यातून जिल्ह्यातील यंत्रणेची कर्तव्यदक्षता चव्हाट्यावर आली आहे.