शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शिल्लक निधी खर्च करण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:01 IST

गोरेगाव नगर पंचायतकडे शिल्लक असलेल्या तीन कोटींच्या अखर्चित निधीला खर्च करण्यासाठी नगर विकास विभागाने मुदत वाढ दिली आहे.

ठळक मुद्देनगर विकास विभागाचे आदेश : आमदार अग्रवाल यांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव नगर पंचायतकडे शिल्लक असलेल्या तीन कोटींच्या अखर्चित निधीला खर्च करण्यासाठी नगर विकास विभागाने मुदत वाढ दिली आहे. शिल्लक निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.नागरी सुविधा योजनेंतर्गत गोरेगाव शहरात रस्ते, नाली व समाजभवन आदी नागरी सुविधांसाठी शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (रोहयो) वेळेवर अंदाजपत्रक तयार करून तांत्रीक मंजुरी न मिळाल्याने हा निधी वेळेत खर्च झाला नाही. शासनाकडून ३१ मार्च २०१७ पर्यंत निधी खर्च करण्याचे आदेश होते. मात्र मुदत निघून गेल्याने तीन कोटी रुपयांचा निधी नगर पंचायतकडे अखर्चित निधी म्हणून शिल्लक होता.नगराध्यक्ष सीमा कटरे व कॉंग्रेसच्या नगर पंचायत सदस्यांनी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन निधी खर्च करण्यासाठी शासनाकडून मुदत वाढवून देण्याची मागणी केली. आमदार अग्रवाल यांनी १ आॅगस्ट रोजी नगर पंचायतकडून सविस्तर प्रस्ताव मागवून मुख्यमंत्री व नगर विकास मंत्रालयाचे प्रभारी मंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निधी खर्च करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. आमदार अग्रवाल यांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी मुदत वाढवून देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले होते. परिणामी मंत्रालयीन स्तरावर कागदोपत्री पाठपुरावा करून ६ नोव्हेंबर रोजी नगर विकास विभागाने तीन कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ देत असल्याचे पत्र गोरेगाव नगर पंचायतला दिले. विशेष म्हणजे या आदेशाची प्रत आमदार अग्रवाल यांनी गोरेगाव नगर पंचायत पदाधिकाºयांच्या सुपूर्द केली आहे.निधी खर्च करण्यासाठी मुदत वाढवून दिल्याबद्दल नगराध्यक्ष कटरे, सभापती रवींद्र चन्ने, राजू टेंभूर्णीकर, मलेशाम येरोला, आशिष बारेवार, पक्षनेता मधुबाला साखरे, हिरणबाई झंझाड, निमावती धपाडे, श्यामली जायस्वाल, चंद्ररेखा कांबळे, डेमेंद्र रहांगडाले, जगदीश येरोला आदिंनी आमदार अग्रवाल यांचे आभार मानले. विशेष म्हणजे, निधीची मुदतवाढ करवून देण्याचे विधान परिषद सदस्य लाटण्याचा प्रयत्न करीत होते. यावर मात्र काहीही प्रयत्न न करता श्रेय लाटण्याचे काम उच्च पदांवर बसलेल्यांनी करू नये, अशी टिका कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांनी केली.