शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

उमेदवारांना २५ ते ५० हजार रुपयांच्या खर्चाची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

ग्रामपंचायतला १४ वित्त आयोग आणि इतर योजनांमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तर जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी अलीकडे स्पर्धा वाढली आहे. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांसह इतर उमेदवारांनी सुध्दा रस घेतला आहे. 

ठळक मुद्देग्रा.पं.निवडणूक : निकालानंतर ३० दिवसात द्यावा लागणार खर्चाचा हिशोब

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतची निवडणूक १५ जानेवारी होवू घातली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीला सुध्दा अलीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे महत्व प्राप्त झाले आहे. उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने ७ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायच्या उमेदवारांना २५ हजार, ११ ते १३ सदस्य असलेल्या उमेदवारांना ३५ हजार आणि १५ ते १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतसाठी उमेदवारांना ५० हजार रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. ग्रामपंचायतला १४ वित्त आयोग आणि इतर योजनांमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तर जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी अलीकडे स्पर्धा वाढली आहे. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांसह इतर उमेदवारांनी सुध्दा रस घेतला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार खर्च करण्यास मागे पुढे पाहत नाही.  त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांचा बजेट आता लाखाच्यावर गेला आहे. त्यामुळे खर्चाला मर्यादा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादा ठरवून दिली असून या मर्यादेत राहूनच खर्च करावा लागणार आहे. अन्यथा सदस्यांचे सदस्यत्व सुध्दा रद्द होवू शकते. निवडणुकी दरम्यान उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा योग्य ताळमेळ कळावा यासाठी निवडणूक काळात स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य केले आहे. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत या सर्व खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेवर निवडणूक विभागाची बारीक नजर असणार आहे. त्यामुळे उमेदवारांना मतदारांना खूश करण्यासाठी खर्च करताना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थाने बुधवारपासून (दि.२३) सुरुवात होणार आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मागील आठ दिवसांपासून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. असा आहे निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची तारीख २३ ते ३० डिसेंबर सकाळी११  वाजता ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी,४ जानेवारी  अर्ज मागे घेण्याची तारीख, ४ जानेवारी दुपारी ३ वाजतानंतर चिन्ह वाटप व १५जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान व १८ जानेवारी रोजी  मतमोजनी असा निवडणूक कार्यक्रम आहे. निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत