शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

 गोंदिया जिल्ह्यातील शृंगारबांध तलावात विदेशी पक्ष्यांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:04 IST

Gondia News अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोडगाव सुरबन येथील शृंगारबांध तलावाच्या पाण्यात दोन विदेशी पक्षी गुरुवारी मृतावस्थेत आढळले. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू, विषयुक्त पाणी की अन्य कारणांमुळे झाला हा चर्चेचा विषय आहे.

ठळक मुद्देदोन मृत पक्षी आढळल्याने खळबळबर्ड फ्ल्यू, विषयुक्त पाणी की अन्य कारणामुळे मृत्यू चर्चेचा विषय

 लोकमत न्यूज नेटवर्क  गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोडगाव सुरबन येथील शृंगारबांध तलावाच्या पाण्यात दोन विदेशी पक्षी गुरुवारी मृतावस्थेत आढळले. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू, विषयुक्त पाणी की अन्य कारणांमुळे झाला हा चर्चेचा विषय आहे. या पक्ष्यांच्या मृत्यूबद्दल अनभिज्ञता आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला याची शहानिशा होणे गरजेचे आहे.पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे तर झाला नाही ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. येथील तलावात दरवर्षी साधारणतः ऑक्टोबर महिन्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन होत असते. जास्त तापमान सहन होत नसल्याने हे पक्षी हिवाळा संपला की फेब्रुवारी महिन्यात परत जातात. यावर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी आले. परतीचा काळ संपूनही अद्याप ते परत गेले नसल्याने पक्षीप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्जुनी मोरगाव येथील पक्षीमित्र डॉ. प्रा. गोपाल पालिवाल, डॉ. प्रा.शरद मेश्राम, प्रा.अजय राऊत यांनी रविवारी शृंगारबांध तलावाला भेट दिली. यंदाच्या हिवाळा ऋतूतील नियमित भेटीत जेवढे विदेशी पक्षी आढळून आले नाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात त्यांना रविवारी या तलावावर विदेशी पक्षी आढळून आले. एवढ्या मोठ्या संख्येत पक्षी बघून ते थक्क झाले. या तलावावर जणू पक्ष्यांची शाळाच भरली होती हे दृश्य बघून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. मात्र तलावात दोन मोठे ग्रे लेग गुज (कलहंस) मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळले. हे दृश्य बघून ते गहिवरले. एकीकडे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तर दुसरीकडे दुखाश्रूचे भाव स्पष्ट दिसून येत होते.

नेमका मृत्यू कशामुळे ?

दोन स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी व तेवढीच खेदजनक बाब आहे. दिवसेंदिवस वाढत्या अतिक्रमणांमुळे तलावांचे क्षेत्र कमी होत चालले आहे. तलावांच्या काठावर शेती होत आहे. शेतात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. तेच पाणी तलावात येते किंवा शेतकरी कीटकनाशकाचा रिकामा झालेला डब्बा तलावाच्या दिशेने फेकून देतात. यातील विषारी द्रव्य तलावाच्या पाण्यात मिसळते व पाणी दूषित होतो. विषयुक्त पाणी प्राशन केल्याने पक्ष्यांचा मृत्यू संभवतो. असे अनेक प्रकार घडत असतात जे दृष्टीस येत नाहीत.

तलावावर पक्ष्यांची शिकार

या तलावावर पक्ष्यांची शिकार सुद्धा होत असल्याचे बोलल्या जाते. पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाला असता तर याची बाधा इतर पक्ष्यांवर झाली असती व अधिक प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाला असता. अशीच एक दुर्दैवी घटना २९ जुलै २०११ रोजी घडली होती. या तलावात एक सारस पक्ष्यांची जोडी होती. या जोडीमुळेच श्रुंगारबांध तलाव नावारूपाला आला होता. अत्यंत दुर्मिळ असलेले सारस पक्ष्यांचे जोडपे कीटकनाशक औषधीयुक्त धानबिया खाल्ल्याने मृत्युमुखी पडले होते.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यBird Fluबर्ड फ्लू