शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

गटबाजी सोडून पूर्ण जोमाने कामाला लागा

By admin | Updated: June 3, 2015 01:17 IST

मोदी सरकारच्या एक वर्षाच्या अयशस्वी कार्यकाळाने देशात निराशेचे वातावरण आहे.

गोंदिया : मोदी सरकारच्या एक वर्षाच्या अयशस्वी कार्यकाळाने देशात निराशेचे वातावरण आहे. त्यामुळे हीच संधी साधून कार्यकर्त्यांनी गटबाजी सोडून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने रविवारी (दि.३१) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यकर्ता मेळावा व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूक लढण्यास इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी जिल्हा निवड समितीची सभा येथील अग्रसेन भवन मध्ये घेण्यात आली. या सभेला माजी प्रदेशाध्यक्ष ठाकरे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीने नियुक्त केलेले जिल्हा प्रभारी कृष्णकुमार पांडे, लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आमदार रामरतन राऊत, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. के.आर.शेंडे, रजनी नागपुरे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपाल गुलाटी, विनोद जैन प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, उद्योगपतींसाठी काम करणाऱ्या सरकारला गरिबांची भूक व अश्रू दिसत नाही. त्यात आता प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये देण्याचे खोटे आश्वासन देणारे प्रधानमंत्री बीमा करून दोन लाख रूपये देण्याची गोष्ट करीत आहेत. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका बघता भाजप सरकारने २५० रूपयांचे बोनस घोषीत केले. मात्र त्याला आता उशीर झाला आहे. कारण शेतकऱ्यांचे धान आता व्यापाऱ्यांच्या हातात गेले आहे. याच राज्य सरकारने सुमारे साडे तीन कोटींचे जिल्हा परिषदेचे काम रद्द केले आहेत. त्यामुळे जनतेला खोटे स्वप्न दाखविणाऱ्यांची सरकार आता बनू नये. यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर करून कामाला लागण्याचे आवाहन केले. संचालन महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. मेळाव्याला जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामसिंह बघेले, महासचिव पी.जी.कटरे, अशोक लंजे, राजेश नंदागवळी, बाजार समिती उपसभापती धनलाल ठाकरे, सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, एनएसयुआय अध्यक्ष संदीप रहांगडाले, जिल्हा परिषद पक्ष नेता डॉ. योगेंद्र भगत, जिल्हा बँक उपाध्यक्ष राधेलाल पटले, तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर, देवेंद्र तिवारी, डोमेंद्र रहांगडालेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)