शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

गांडूळ खत निर्मितीतून ओल्या कचऱ्याचे निर्मुलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:27 IST

शहरात निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे निर्मुलन करता यावे यासाठी नगर परिषदेने या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. यासाठी नगर परिषदेने शहरात पाच जागांवर टँक बनविले असून तेथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेचा यशस्वी प्रयोग : प्रयोगशाळेने दिला पॉजिटिव्ह रिपोर्ट

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे निर्मुलन करता यावे यासाठी नगर परिषदेने या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. यासाठी नगर परिषदेने शहरात पाच जागांवर टँक बनविले असून तेथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेने अशाप्रकारे तयार केलेल्या गांडूळ खताच्या नमुन्यांना प्रयोगशाळेने पॉजिटिव्ह रिपोर्ट दिला आहे.शासन सध्या स्वच्छतेवर जास्त भर देत असून स्वच्छ भारत अभियान आता एक चळवळ म्हणून राबविले जात आहे. शहर स्वच्छ असल्यास वातावरण शुद्ध राहून नागरिकांचे आरोग्यही चांगले राहणार हे सत्य आहे.यामुळे शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरांची रँकींगही केली जात आहे. एकंदर शहर स्वच्छ रहावे यासाठी शहरातील कचºयाच्या निर्मुलनावर भर दिला जात आहे.यात मोठ्या शहरांकडे तेवढ्या प्रमाणात यंत्रणा व सोयी असल्याने त्यांच्याकडून कचरा निर्मुलन सहज केले जाते. मात्र येथील नगर परिषदेकडे त्याप्रमाणात यंत्रणा व सोयी नाहीत.परिणामी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे जिकरीचे काम झाले आहे. यातूनच शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारही दिसून येतात. यात सर्वात जास्त धोका ओल्या कचऱ्यापासून असतो. ओल्या कचऱ्यापासून एकतर दुर्गंध पसरते शिवाय त्यातून डास व किड्यांची उत्पत्ती होऊन आजारांचा धोका बळावतो.यावर तोडगा म्हणून नगर परिषदेने ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिताचा प्रयोग हाती घेतला. डिसेंबर २०१७ पासून नगर परिषदेने या प्रयोगांतर्गत शहरात पाच ठिकाणी टँक तयार केले असून त्यात ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया केली जात आहे.अशाप्रकारे तयार करण्यात आलेल्या गांडूळ खताचे नमुने नगर परिषदेने अमरावती येथे प्रयोगशाळेत पाठविले होते. प्रयोगशाळेने त्या नमुन्यांना पॉजिटिव्ह रिपोर्ट दिला आहे हे विशेष.बागेत केला जातो गांडूळ खताचा वापरनगर परिषदेने ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीसाठी नगर परिषद कार्यालयाच्या मागील भागात, अग्निशमन विभाग, इंजिनशेड शाळा, मालवीय शाळा व सुभाष बागेत टँक बनविले आहेत. येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. भविष्यात हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर केला जाणार असून त्यातून नगर परिषदेला आर्थिक उत्पन्नही होणार आहे. सध्या नगर परिषदेने तयार केलेल्या खताचा वापर सुभाष बागेत केला जात आहे.