शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात

By admin | Updated: June 9, 2017 01:28 IST

मध्य भारत एज्युकेशन सोसायटी, सस्टेनिग एनव्हायर्नमेंट व वाईल्डलाईफ असेम्बन्स व जन शिक्षण संस्थान यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मध्य भारत एज्युकेशन सोसायटी, सस्टेनिग एनव्हायर्नमेंट व वाईल्डलाईफ असेम्बन्स व जन शिक्षण संस्थान यांच्या संयुक्तवतीने सोमवारी (दि.५) छोटा पाल चौक येथे जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन लोक कल्याण शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सुरजकुमार पाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष, सस्टेनिग एनव्हायर्नमेंट व वाईल्ड लाईफ असेम्बलन्स संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका नेहा नायक, मैथुला बिसेन, दिपक बोबळे, चीत्रा जितेश वडेरा, जीवनज्योती रघुवंशी, महेंद्र लिल्हारे, मध्य भारत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सम्राट पाल उपस्थित होते. याप्रसंगी सम्राट पाल यांनी प्रास्ताविकात, पर्यावरण अनुकुल असल्यास मनुष्य आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा भरपूर उपयोग करत आहे व आपल्या आरोग्याला पण कायम ठेवले आहे. वन्य प्राणी-पक्ष्यांचे संरक्षण करणे वनाचे रक्षण, झाडे तोडण्यास आळा, आठवड्यातून एक दिवस सायकल चालविणे नदी व तलावात कचरा न टाकणे, पाण्याची बचत, रेन वॉटर, हार्व्हेंस्टींग तंत्र उपयोगात आणणे व पर्यावरण संरक्षणासाठी नेहमी सजग राहून दुसऱ्यांनाही प्रेरणा देणे इत्यादी महत्वपूर्ण माहिती दिली. बोबळे यांनी, वनांपासून जनसंधारण व मृद संधारण होऊन पावसाचे पाणी जमिनीत झिरपते. ज्यामुळे भुजलाचे स्तर वाढते. तापमान नियंत्रण, पुर नियंत्रण, रोग नियंत्रण, पाऊस, ग्लोबल वार्मिग, जलवायुचे प्रदर्शन नियंत्रीत होते असे मत व्यक्त केले. नायक यांनी, वृक्ष कार्बनडाय आॅक्साईड शोषूण घेतात आणि आॅक्सीजन देतात. दैनिक व्यवहारात उपयोगात आणली गेलेली प्लास्टीक थैली न फेकता त्याला जाळली पाहिजे. यापासून काही प्रमाणात प्रदूषणावर अंकुश लावता येऊ शकते असे मत व्यक्त केले. डॉ.पाल यांनी, जागतिक पर्यावरण दिन मोहीम संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल विधानसभा करून १९७२ मध्ये गेला. ते जून महिन्यात प्रत्येक वर्षी महिन्याच्या ५ व्या दिवशी साजरा केला जातो. तो मानव पर्यावरणावर स्टोकहोम परीषद नजीकच्या भविष्यात उघडण्याच्या पर्यावरण समस्या लक्ष काढणे वार्षिक मोहीम म्हणून घोषीत करण्यात आले. जगातील तीव्र हवामान समस्या जागृती निर्माण करण्यासाठी मुख्य साधन म्हणून युनायटेड नेशन्सद्वारे उत्पादीत होते असे सांगीतले. बहेकार यांनी घरातून निघालेल्या केरकचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे नाहीतर त्यांचे दुष्परिणाम प्राणीमात्रावर होतात. तसेच जवळपासचे वातावरण हिरवेगार असावयास हवे. याकरीता शासकीय, अर्धशासकीय आणि निजी संस्थाना वृक्ष लावण्याकरीता प्रेरीत करायला पाहिजे. जोपर्यंत लोकांचा सहभाग राहणार नाही तो पर्यत वृक्ष लावणे आणि त्यांचे संवर्धन अभियान सफल होणार नाही. पर्यावरणासाठी झाडांची आवश्यकता असते. निसर्गात असलेल्या प्रत्येक झाडाचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी होऊ शकतो. सुधारण्याची सुरुवात आपल्या घरापासून करावी. प्रत्येक घरी झाडांची लागवड केली तर काही अंशी का होईना पर्यावरणात सुधारण होऊन घर परिसर स्वच्छ व सुंदर दिसतो असे मत व्यक्त केले. या दिवसाचे औचित्य साधून जन शिक्षण संस्थाद्वारे तयार करण्यात आलेल्या पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ओला व कोरडा कचरा कुंडीचे प्रकाशन करून वृक्षारोपण करण्यात आले. संचालन विनायक डोंगरवार यांनी केले. आभार महेश बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी अजय खवसकर, नंदीनी गणवीर, मंगेश शेंडे, दिपक उईके, विनायक डोंगरे आदिंनी सहकार्य दिले.