शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जास्तीचे पाणीही आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे ...

गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असते. पाणी घाम, मूत्राद्वारे शरीरातून बाहेर पडते. व्यायाम किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या मानसिकतेवर आणि शरीरावर विपरित परिणाम होते. हे डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. दोन लीटर पाणी पिण्याचा सल्ला सामान्यत: आरोग्य तज्ज्ञ देतात. तहान नसतानाही दिवसभर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोणत्या व्यक्तीने किती पाणी प्यावे, या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात. वातावरण, तापमान, आहार, स्तनपान करणारी महिला, गर्भवती यांनी किती पाणी प्यावे, या संदर्भातही आरोग्य तज्ज्ञ सल्ला देतात.

..................

शरीरात कमी पाणी पडले तर...

शरीरात गरजेपेक्षा कमी पडले, तर किडनीमध्ये वारंवार स्टोन होतात. त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता असते. कमी पाणी प्यायल्याने लघवीत इन्फेक्शन होते, त्यामुळेही आजार बळावतात. त्यासाठी पाणी कमी पिऊ नये.

..................

शरीरात जास्त पाणी झाले तर...

प्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे, अशी काही गरज नाही. वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज ५ ते ६ लीटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे, यामुळे अनेक आजार होतात. अत्याधिक पाणी सेवनानेही किडनी फेल होण्याची शक्यता असते.

........

कोणी किती प्यावे पाणी?

नवजात----५ ते ६ कप

१२ वर्षांपर्यंत- २.५ लीटर

१६ ते २९ वर्षांपर्यंत---२.५ लीटर

३० ते ४० वर्षांपर्यंत----३ लीटर

४१ ते ६० वर्षांपर्यंत----३ लीटर

६१ वर्षांपेक्षा जास्त----२.५ लीटर

..........

तज्ज्ञ काय म्हणतात..

२० टक्के पाणी अन्नापासून तर ८० टक्के पाणी पिण्यातून शरीराला मिळते. दिवसभरात अडीच ते तीन लीटर पाणी सेवन केल्यास लघुशंकेतून शरीरातील मळ बाहेर पडतो. त्यामुळे माणूस दिवसभर ताजातवाना राहतो. पाणी अधिक घ्यावे.

- डॉ.नोव्हील ब्राह्मणकर, युरोलॉजिस्ट गोंदिया.

............

गरजेपेक्षा कमी पाण्याचे सेवन झाले, तर वारंवार किडनीमध्ये स्टोन होऊ शकतात. लघवीचे इनफेक्शन वाढू शकते आणि त्यातून किडनीचे आजार बळाऊ शकतात. यासाठी भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला आम्ही देतो.

- डॉ.मयूर चौरे, युरोलॉजिस्ट गोंदिया.