शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणीही आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे ...

गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असते. पाणी घाम, मूत्राद्वारे शरीरातून बाहेर पडते. व्यायाम किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या मानसिकतेवर आणि शरीरावर विपरित परिणाम होते. हे डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. दोन लीटर पाणी पिण्याचा सल्ला सामान्यत: आरोग्य तज्ज्ञ देतात. तहान नसतानाही दिवसभर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोणत्या व्यक्तीने किती पाणी प्यावे, या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात. वातावरण, तापमान, आहार, स्तनपान करणारी महिला, गर्भवती यांनी किती पाणी प्यावे, या संदर्भातही आरोग्य तज्ज्ञ सल्ला देतात.

..................

शरीरात कमी पाणी पडले तर...

शरीरात गरजेपेक्षा कमी पडले, तर किडनीमध्ये वारंवार स्टोन होतात. त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता असते. कमी पाणी प्यायल्याने लघवीत इन्फेक्शन होते, त्यामुळेही आजार बळावतात. त्यासाठी पाणी कमी पिऊ नये.

..................

शरीरात जास्त पाणी झाले तर...

प्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे, अशी काही गरज नाही. वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज ५ ते ६ लीटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे, यामुळे अनेक आजार होतात. अत्याधिक पाणी सेवनानेही किडनी फेल होण्याची शक्यता असते.

........

कोणी किती प्यावे पाणी?

नवजात----५ ते ६ कप

१२ वर्षांपर्यंत- २.५ लीटर

१६ ते २९ वर्षांपर्यंत---२.५ लीटर

३० ते ४० वर्षांपर्यंत----३ लीटर

४१ ते ६० वर्षांपर्यंत----३ लीटर

६१ वर्षांपेक्षा जास्त----२.५ लीटर

..........

तज्ज्ञ काय म्हणतात..

२० टक्के पाणी अन्नापासून तर ८० टक्के पाणी पिण्यातून शरीराला मिळते. दिवसभरात अडीच ते तीन लीटर पाणी सेवन केल्यास लघुशंकेतून शरीरातील मळ बाहेर पडतो. त्यामुळे माणूस दिवसभर ताजातवाना राहतो. पाणी अधिक घ्यावे.

- डॉ.नोव्हील ब्राह्मणकर, युरोलॉजिस्ट गोंदिया.

............

गरजेपेक्षा कमी पाण्याचे सेवन झाले, तर वारंवार किडनीमध्ये स्टोन होऊ शकतात. लघवीचे इनफेक्शन वाढू शकते आणि त्यातून किडनीचे आजार बळाऊ शकतात. यासाठी भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला आम्ही देतो.

- डॉ.मयूर चौरे, युरोलॉजिस्ट गोंदिया.