शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणीही आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे ...

गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असते. पाणी घाम, मूत्राद्वारे शरीरातून बाहेर पडते. व्यायाम किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या मानसिकतेवर आणि शरीरावर विपरित परिणाम होते. हे डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. दोन लीटर पाणी पिण्याचा सल्ला सामान्यत: आरोग्य तज्ज्ञ देतात. तहान नसतानाही दिवसभर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोणत्या व्यक्तीने किती पाणी प्यावे, या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात. वातावरण, तापमान, आहार, स्तनपान करणारी महिला, गर्भवती यांनी किती पाणी प्यावे, या संदर्भातही आरोग्य तज्ज्ञ सल्ला देतात.

..................

शरीरात कमी पाणी पडले तर...

शरीरात गरजेपेक्षा कमी पडले, तर किडनीमध्ये वारंवार स्टोन होतात. त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता असते. कमी पाणी प्यायल्याने लघवीत इन्फेक्शन होते, त्यामुळेही आजार बळावतात. त्यासाठी पाणी कमी पिऊ नये.

..................

शरीरात जास्त पाणी झाले तर...

प्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे, अशी काही गरज नाही. वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज ५ ते ६ लीटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे, यामुळे अनेक आजार होतात. अत्याधिक पाणी सेवनानेही किडनी फेल होण्याची शक्यता असते.

........

कोणी किती प्यावे पाणी?

नवजात----५ ते ६ कप

१२ वर्षांपर्यंत- २.५ लीटर

१६ ते २९ वर्षांपर्यंत---२.५ लीटर

३० ते ४० वर्षांपर्यंत----३ लीटर

४१ ते ६० वर्षांपर्यंत----३ लीटर

६१ वर्षांपेक्षा जास्त----२.५ लीटर

..........

तज्ज्ञ काय म्हणतात..

२० टक्के पाणी अन्नापासून तर ८० टक्के पाणी पिण्यातून शरीराला मिळते. दिवसभरात अडीच ते तीन लीटर पाणी सेवन केल्यास लघुशंकेतून शरीरातील मळ बाहेर पडतो. त्यामुळे माणूस दिवसभर ताजातवाना राहतो. पाणी अधिक घ्यावे.

- डॉ.नोव्हील ब्राह्मणकर, युरोलॉजिस्ट गोंदिया.

............

गरजेपेक्षा कमी पाण्याचे सेवन झाले, तर वारंवार किडनीमध्ये स्टोन होऊ शकतात. लघवीचे इनफेक्शन वाढू शकते आणि त्यातून किडनीचे आजार बळाऊ शकतात. यासाठी भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला आम्ही देतो.

- डॉ.मयूर चौरे, युरोलॉजिस्ट गोंदिया.