शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

जास्तीचे पाणीही आरोग्याला अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे ...

गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असते. पाणी घाम, मूत्राद्वारे शरीरातून बाहेर पडते. व्यायाम किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या मानसिकतेवर आणि शरीरावर विपरित परिणाम होते. हे डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. दोन लीटर पाणी पिण्याचा सल्ला सामान्यत: आरोग्य तज्ज्ञ देतात. तहान नसतानाही दिवसभर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोणत्या व्यक्तीने किती पाणी प्यावे, या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात. वातावरण, तापमान, आहार, स्तनपान करणारी महिला, गर्भवती यांनी किती पाणी प्यावे, या संदर्भातही आरोग्य तज्ज्ञ सल्ला देतात.

..................

शरीरात कमी पाणी पडले तर...

शरीरात गरजेपेक्षा कमी पडले, तर किडनीमध्ये वारंवार स्टोन होतात. त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता असते. कमी पाणी प्यायल्याने लघवीत इन्फेक्शन होते, त्यामुळेही आजार बळावतात. त्यासाठी पाणी कमी पिऊ नये.

..................

शरीरात जास्त पाणी झाले तर...

प्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे, अशी काही गरज नाही. वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज ५ ते ६ लीटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे, यामुळे अनेक आजार होतात. अत्याधिक पाणी सेवनानेही किडनी फेल होण्याची शक्यता असते.

........

कोणी किती प्यावे पाणी?

नवजात----५ ते ६ कप

१२ वर्षांपर्यंत- २.५ लीटर

१६ ते २९ वर्षांपर्यंत---२.५ लीटर

३० ते ४० वर्षांपर्यंत----३ लीटर

४१ ते ६० वर्षांपर्यंत----३ लीटर

६१ वर्षांपेक्षा जास्त----२.५ लीटर

..........

तज्ज्ञ काय म्हणतात..

२० टक्के पाणी अन्नापासून तर ८० टक्के पाणी पिण्यातून शरीराला मिळते. दिवसभरात अडीच ते तीन लीटर पाणी सेवन केल्यास लघुशंकेतून शरीरातील मळ बाहेर पडतो. त्यामुळे माणूस दिवसभर ताजातवाना राहतो. पाणी अधिक घ्यावे.

- डॉ.नोव्हील ब्राह्मणकर, युरोलॉजिस्ट गोंदिया.

............

गरजेपेक्षा कमी पाण्याचे सेवन झाले, तर वारंवार किडनीमध्ये स्टोन होऊ शकतात. लघवीचे इनफेक्शन वाढू शकते आणि त्यातून किडनीचे आजार बळाऊ शकतात. यासाठी भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला आम्ही देतो.

- डॉ.मयूर चौरे, युरोलॉजिस्ट गोंदिया.