शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

प्रत्येक महिन्यात राबवू अभियान

By admin | Updated: November 6, 2014 01:58 IST

शासनाने स्वच्छ ग्राम-स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. तसेच तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी गावात जगनाबाठू वाघदेव बाबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे.

गोंदिया : शासनाने स्वच्छ ग्राम-स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. तसेच तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी गावात जगनाबाठू वाघदेव बाबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. त्यानिमित्ताने चिरेखनी येथे बुधवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात आली. यात संपूर्ण ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.स्वच्छता ही काळाची गरज आहे. स्वच्छता नसेल तर गावात रोगराईचे प्रमाण वाढते. आपले घर, परिसर व गाव नेहमी स्वच्छ ठेवावे. स्वच्छतेचे महत्त्व जाणून स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानेच चिरेखनी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सहभागी झालेल्या संपूर्ण ग्रामस्थांनी चिरेखनी गावात प्रत्येक महिन्यातून एकदा संपूर्ण स्वच्छ करण्याचा निर्धार व्यक्त केला. या स्वच्छता अभियानाची सुरूवात चिरेखनीच्या हनुमान मंदिर चौकातून करण्यात आली. सोबतच एक ट्रॅक्टर-ट्रॉली ठेवण्यात आली. यानंतर वार्ड-३ मधून संपूर्ण साफसफाई करण्यात आली. जमा झालेला केरकचरा ट्रॉलीमध्ये घालून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यानंतर चिरेखनी ग्रामपंचायत ते जि.प. पूर्व माध्यमिक शाळेपर्यंतच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. यात वार्ड-२ मधील नालंदा बुद्ध विहार व शिवमंदिर परिसरातील केरकचरा जमा करून ट्रालीत घालण्यात आला. गावाच्या मधातील वार्ड-१ चीसुद्धा साफसफाई करण्यात आली. यानंतर जमा झालेला गावातील संपूर्ण केरकचरा व घाण ट्रॅक्टर-ट्रॉलीने गावाबाहरे दूर अंतरावर नेवून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.चिरेखनी गावातील प्रत्येक नाली व प्रत्येक गल्ली स्वच्छ असावी, गावात डास असू नये, गावात आजार पसरू नये, संपूर्ण गावात आरोग्य, शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी दर महिन्यात ग्रामपंचायत प्रशासन नेहमीच पुढाकार घेईल व संपूर्ण गाव घाणमुक्त करण्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू राहतील. त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे सरपंच जगन्नाथ पारधी यांनी सांगितले. कृउबासचे संचालक रमेश टेंभरे यांनी गावात दर महिन्यात सदर अभियान राबवून नवीन आदर्श निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. या स्वच्छता अभियानात प्रामुख्याने तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश टेंभरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र कोटांगले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवचरण शहारे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवचंद रिनाईत, सरपंच जगन्नाथ पारधी, माजी ग्रा.पं. सदस्य भोजलाल पटले, डॉ. मेखचंद शहारे, गोपीचंद रिनाईत, गेंदलाल पारधी, माजी सरपंच उमेंद्र पारधी, इंदल बिसेन, पंतूलाल पारधी, खेमू रिनाईत, भागवत पारधी, उदेलाल पारधी, उपसरपंच सोनू पारधी, गणेश पारधी, छगणलाल पारधी, भावराव कोटांगले, घनश्याम जांभूळकर आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)