शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक संकटसमयी काँग्रेस शेतकºयांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे रोवणीचे खरे आकडे पाठवावे अन्यथा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तर प्रत्येक संकटसमयी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस त्यांच्या पाठिशी उभी असल्याचे आश्वासन देत त्यांना ...

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दुष्काळग्रस्त गावांचा केला दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे रोवणीचे खरे आकडे पाठवावे अन्यथा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तर प्रत्येक संकटसमयी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस त्यांच्या पाठिशी उभी असल्याचे आश्वासन देत त्यांना आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिलासा दिला.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची आमदार अग्रवाल यांनी बुधवारी (दि.१६) पाहणी केली. यादरम्यान ग्राम तेढवा येथे शेतकºयांशी चर्चा करताना ते बोलत होते. आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील ग्राम दासगाव खुर्द, दासगाव बू., निलज, तेढवा यासह अन्य गावांचा दौरा करून वर्तमान स्थिती जाणून घेतली.याप्रसंगी शेतकºयांनी, परिसरातील बहुतांश शेतकºयांची खार (रोपे) मरत असल्याचे सांगीतले. अशात आता पाऊस आला तरिही दुबार पेरणीची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यात कृषी व सिंचन विभागाकडून काहीच मदत मिळत नसल्याचेही शेकतºयांनी सांगीतले.अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना १० हजार रूपयांचे तातडीचे कर्ज मिळाले नाही. शिवाय आॅनलाईन पिक विमा न झाल्याने पूर्णपणे अडकल्याची व्यथा शेतकºयांनी आमदार अग्रवाल यांच्यापुढे मांडली.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे, तहसीलदार चव्हाण, पंचायत समिती सभापती माधुरी रहांगडाले, सदस्य अनील मते, बाजार समिती संचालक आनंद तूरकर, गोविंद तूरकर यांच्यासह कृषी विभागाचे अन्य अधिकारी होते.मुख्यमंत्र्याकडे मांडली वास्तविकतास्वत: केलेली पाहणी व शेतकºयांची व्यथा जाणून घेतल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यात त्यांनी, जिल्हाधिकाºयांकडून ५० टक्के रोवणीचे आकडे दिले जात असताना, प्रत्यक्षात ३०-३५ टक्क्यांपेक्षा जास्त रोवणी झाली असल्याची माहिती दिली. तर झालेली रोवणीही पाण्याअभावी करपत चालली असून जिल्ह्यातील नदी, नाले व तलाव कोरडे आहेत. त्यामुळे भविष्यात जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार असल्याचे सांगत जिह्यातील वास्तवीकतेशी अवगत करविले.