शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

प्रत्येक संकटसमयी काँग्रेस शेतकºयांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे रोवणीचे खरे आकडे पाठवावे अन्यथा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तर प्रत्येक संकटसमयी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस त्यांच्या पाठिशी उभी असल्याचे आश्वासन देत त्यांना ...

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दुष्काळग्रस्त गावांचा केला दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे रोवणीचे खरे आकडे पाठवावे अन्यथा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तर प्रत्येक संकटसमयी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस त्यांच्या पाठिशी उभी असल्याचे आश्वासन देत त्यांना आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिलासा दिला.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची आमदार अग्रवाल यांनी बुधवारी (दि.१६) पाहणी केली. यादरम्यान ग्राम तेढवा येथे शेतकºयांशी चर्चा करताना ते बोलत होते. आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील ग्राम दासगाव खुर्द, दासगाव बू., निलज, तेढवा यासह अन्य गावांचा दौरा करून वर्तमान स्थिती जाणून घेतली.याप्रसंगी शेतकºयांनी, परिसरातील बहुतांश शेतकºयांची खार (रोपे) मरत असल्याचे सांगीतले. अशात आता पाऊस आला तरिही दुबार पेरणीची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यात कृषी व सिंचन विभागाकडून काहीच मदत मिळत नसल्याचेही शेकतºयांनी सांगीतले.अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना १० हजार रूपयांचे तातडीचे कर्ज मिळाले नाही. शिवाय आॅनलाईन पिक विमा न झाल्याने पूर्णपणे अडकल्याची व्यथा शेतकºयांनी आमदार अग्रवाल यांच्यापुढे मांडली.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे, तहसीलदार चव्हाण, पंचायत समिती सभापती माधुरी रहांगडाले, सदस्य अनील मते, बाजार समिती संचालक आनंद तूरकर, गोविंद तूरकर यांच्यासह कृषी विभागाचे अन्य अधिकारी होते.मुख्यमंत्र्याकडे मांडली वास्तविकतास्वत: केलेली पाहणी व शेतकºयांची व्यथा जाणून घेतल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यात त्यांनी, जिल्हाधिकाºयांकडून ५० टक्के रोवणीचे आकडे दिले जात असताना, प्रत्यक्षात ३०-३५ टक्क्यांपेक्षा जास्त रोवणी झाली असल्याची माहिती दिली. तर झालेली रोवणीही पाण्याअभावी करपत चालली असून जिल्ह्यातील नदी, नाले व तलाव कोरडे आहेत. त्यामुळे भविष्यात जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार असल्याचे सांगत जिह्यातील वास्तवीकतेशी अवगत करविले.