शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अखेर आमगावला नगर परिषदेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:45 IST

आमगाव नगरपंचायतला नगर परिषदेला दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष समितीने लढा उभारला होता.

ठळक मुद्देआठ ग्रामपंचायतींचा समावेश, शासनाने काढली अधिसूचना : संघर्ष समितीच्या लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव नगरपंचायतला नगर परिषदेला दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष समितीने लढा उभारला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आल्याची अधिसूचना काल २ आॅगस्ट रोजी काढली. या निर्णयाने आमगाववासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राज्य शासनाने राज्यातील अनेक तालुका पातळीवरील ग्रामपंचायतींना लोकसंख्या व ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्राचा समावेश करुन होणारे क्षेत्र यांचे नगर पंचायतीत समायोजन करुन नगर पंचायतची स्थापना २०१५ केली होती. परंतु, आमगाव येथील नागरिकांनी नगर पंचायत ऐवजी शासनाने नगर परिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी लावून धरली. यासाठी संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने शासनाने नगर परिषद स्थापनेचा निर्णय शासनाकडे सोपविला. परंतु, शासनाने मागील दोन वर्षांपासून यासंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नव्हता.निर्णयाअभावी नागरिकांना प्रशासकाच्या अनियंत्रीत कारभारामुळे विकासापासून वंचित राहावे लागले. संघर्ष समितीने शासनाकडे नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा. या मागणीसाठी अनेक पत्र व्यवहार व आंदोलनाची भूमिका घेतली होती. संघर्ष समितीने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांनाही या संदर्भात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शासनाने आमगाव नगर परिषद स्थापनेचा निर्णय घेत काल (दि.२) रोजी त्याची अधिसुचना काढली. शासनाने विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले.विकासाकरिता संघर्ष कायम राहणारआमगाव परिसरातील नागरिकांच्या मागणीला घेवून नगर परिषद करिता संघर्ष समितीचा लढा सुरू होता. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा आणि विकासासाठी नगर परिषद हा गतीशील पर्याय होता. यासाठी संघर्ष समितीने पुढाकार घेवून पाठपुरावा केला. आंदोलनाची भूमिका घेतली होती. याची दखल घेत शासनाने योग्य निर्णय घेतला. पुढे नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत विकासाकरिता पुढाकार राहणार नाहे.आठ ग्रामपंचायतीचा समावेशआमगाव नगर परिषदेत आमगाव, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, माल्ही, पदमपूर, किंडगीपार, बिरसी या आठ ग्राम पंचायतींना ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रात समावेश करुन नगर परिषदची स्थापना करण्याचे परिपत्रक काढले.नगर परिषदेच्या प्रशासकपदी तहसीलदारशासनाने आठ ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश केला. या ठिकाणी निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी व या गावातील विकासात्मक कार्य सुरळीतपणे चालविण्यासाठी प्रशासकपदी आमगावचे तहसीलदार साहेबराव राठोड यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.लोकप्रतिनिधींचा यशस्वी पाठपुरावाआमगाव नगर परिषद व्हावी, यासाठी नागरिकांच्या मागणीला घेवून आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. शासनाने अखेर आमगाववासीयांच्या मागणीची दखल घेतली. यामुळे आमगावच्या विकासाला निश्चित दिशा मिळण्यास मदत होईल. यात आमगाव येथील अ‍ॅड. येशुलाल उपराडे, क्रिष्णा चुटे, राकेश शेंडे यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.