शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

अखेर आमगाव नगर परिषद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:43 IST

राज्य शासनाने आमगाव नगर परिषद घोषीत करुन यात आठ गावांचा समावेश केला होता. या निणर्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा आदेश : ग्रामीण व शेतकºयांना आनंद

आॅनलाईन लोकमतगोंदिया : राज्य शासनाने आमगाव नगर परिषद घोषीत करुन यात आठ गावांचा समावेश केला होता. या निणर्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर अंतीम सुनावणी देताना मंगळवारी (दि.२८) रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने आमगाव नगर परिषदेकरिता शासनाने काढलेली अधिसूचना रद्द ठरविली.शासनाने दोन महिन्यांपूर्वी आमगावसह आठ गावे मिळून नगर परिषद जाहीर केली. यात रिसामा, कुंभारटोली, बनगाव, बिरसी, पदमपूर, किडंगीपार, माल्ही या गावांचा समावेश केला. या नगर परिषदेमुळे ग्रामीण भागातील लोकांना त्रास होत असल्यामुळे नागरिकांच्या हितासाठी रिसामा येथील उपसरपंच तिरथ येटरे व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष निकेश उर्फ बाबा मिश्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.आमगाव व परिसरातील गावांना एकत्र जोडून नगर परिषदेचा दर्जा देणे हा निर्णय नागरिकांसाठी अन्यायकारक ठरणारा असल्याने या निर्णयाविरूध्द आमगाव व परिसरातील गावांच्या नागरिकांनी एल्गार पुकारून १५ हजारापेक्षा अधिक आक्षेप शासनाकडे नोंदविले होते. परंतु शासनाने नागरिकांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करीत आमगावला नगर परिषदेचा दर्जा दिला. आक्षेपात आमगावची लोकसंख्या १२ हजार २०० असून कुटूंबसंख्या २०९४ आहे. नगर परिषदेच्या अधिनियमानुसार २५ हजारापेक्षा कमी आहे. त्यामुळे हे गाव ग्रामीण क्षेत्रातच येते. नगरपरिषद अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्र असायला पाहिजे. परंतु आमगाव हे कृषक क्षेत्र आहे. आमगाव नगर परिषद म्हणजे इतर गावांवर अन्याय होता. नगर परिषदेसाठी फक्त ३५ टक्के अकृषक भूखंड असणे आवश्यक आहे. मात्र, हे आमगाव येथे त्याचे प्रमाण नगण्य आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम आणि औद्योगिक अधिनियम १९३५ अन्वये आमगाव नगरपरिषद कोणत्याही नियमात बसत नव्हते. तरी देखील शासनाने नागरिकांच्या इच्छेविरूध्द व ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांना विश्वासात न घेता आमगावला नगर परिषदेचा दर्जा दिला होता. नगर परिषदेच्या स्थापनेनंतर परिसरातील गावातील नागरिकांना अडचण होत होती. उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.२८) रोजी न्या. भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्या खंडपिठाने आमगाव नगर परिषद संदर्भात काढलेली अधिसूचना रद्द ठरविली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर तर सरकारतर्फे अजय घारे यांनी बाजू मांडली.आमगाव नगर परिषद व्हावी यासाठी आ. संजय पुराम, माजी आमदार केशवराव मानकर यांनी पुढाकार घेतला होता. आमगावात नगर परिषदेच्या निवडणुकीला घेऊन सध्या गावागावांमध्ये जोरदार चर्चा होती. विशेष म्हणजे १३ डिसेबरला निवडणूक होणार होती. त्यासाठी निवडणूक विभागाची यंत्रणा सुध्दा तर तिकीट वाटपावरुन भाजपामध्ये रस्सीखेच असल्याचे चित्र होते. नगर परिषदेची अधिसूचना रद्द झाल्याने भाजपमधील काही नाराज कार्यकर्त्यांनी या निणर्याचे स्वागत केले.तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदविले होते बयाणआमगाव नगर परिषदेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर सचिव नगर विकास महाराष्टÑ राज्य, गोंदिया जिल्हाधिकारी, नगररचनाकार गोंदिया, देवरीचे उपविभागीय अधिकारी, आमगाव तहसीलदार व पदमपूर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा, बनगाव, आमगाव, किडंगीपार, माल्ही या गावातील ग्रामसेवक अशा १३ लोकांना पार्टी करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने आमगाव तहसीलदार व गोंदियाचे जिल्हाधिकारी यांचे यासंदर्भात बयान नोंदविले होते. त्यानंतर मंगळवारी अंतिम सुनावणी झाली.आमगाव नगर परिषद करण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी पुढाकार घेतला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर महाराष्टÑाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत आपला दारूण पराभव भाजपला दिसू लागल्याने भाजपच्या एका पदाधिकाºयाने स्वत: इंटरपीनर होऊन शासनाने काढलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला होता.- नरेश माहेश्वरीनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.आमगाव नगरपरिषद रद्द झाल्याची चर्चा आपण ऐकली. परंतु या संदर्भात कुठलीही माहिती हाती आली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.-साहेबराव राठोडप्रशासक तथा तहसीलदार आमगाव.