शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

त्या घटनेनंतरही धडा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:25 IST

शहरातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर २०१६ मध्ये घडली. या घटनेला आता दीड वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही नगर परिषदेच्या अग्नीश्मन विभागात सुधारणा झालेली नाही. बिंदलच्या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअग्नीशमन विभागात कर्मचाऱ्यांचा अभाव : सोशल मीडियावर रोष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर २०१६ मध्ये घडली. या घटनेला आता दीड वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही नगर परिषदेच्या अग्नीश्मन विभागात सुधारणा झालेली नाही. बिंदलच्या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याचे चित्र आहे.पान लाईनमधील दुकांनाना सोमवारी पहाटेच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन विभागाला पाणी आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागल्याची माहिती आहे. गोंदिया अग्नीशमन विभागाच्या चार वाहनाना वांरवार पाणी भरुन आणण्यासाठी गणेशनगर येथील अग्नीशमन विभागाच्या कार्यालय परिसरात जावे लागले.आग आटोक्यात आणण्यासाठी या चार वाहनानी २३ फेºया मारल्या. मात्र यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शहरातील अरुंद रस्ते आणि गल्यांमुळे चांगलीच अडचण झाली आहे. विशेष म्हणजे अग्नीशमन वाहनांच्या सोयीसाठी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी अग्नीशमन विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडण्याचा निर्णय घेतल्याने अग्नीशमन वाहनांमध्ये वेळीच पाणी भरुन आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. तर शहरातील अतिक्रमणाची समस्या अद्यापही कायम असल्याने अग्नीशमन विभागाचे वाहन घटनास्थळी पोहचण्यास मोठी अडचण जाते.ही आजची समस्या नसून बºयाच वर्षांपासूनची आहे. शहरात वांरवार आगीच्या घटना घडल्यानंतर सुध्दा नगर परिषदेकडून यावर उपाय योजना केल्या जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पान लाईनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विविध व्हॉटसअप ग्रुपवर सुध्दा बिंदलच्या घटनेनंतरही नगर परिषदेने धडा घेतला नसल्याची चर्चा सुरू झाली. अनेकांनी नगर परिषदेवर रोष व्यक्त केला.कर्मचाऱ्यांचा अभावनगर परिषदेच्या अग्नीशमन विभागात अद्यापही कर्मचाºयांची अनेक रिक्त पदे रिक्त आहेत. तर अजुनही जुन्याच वाहनाच्या भरोश्यावर या विभागाचा कारभार सुरू आहे. सध्या अग्नीशमन विभागात २८ कर्मचारी कार्यरत असून ते तीन पाळीत सेवा देत आहेत. एका पाळीत केवळ ९ कर्मचारी कार्यरत असतात. यामध्ये वाहन चालकाचा देखील समावेश असून चार वाहने एकाच वेळी गेल्यास केवळ पाच कर्मचाºयांच्या मदतीने आगीच्या घटनावर नियंत्रण मिळविण्यास मोठी अडचण जाते.फायर स्टेशनची प्रतीक्षागोंदिया नगर परिषदेला दुसऱ्या फायर स्टेशनसाठी रेलटोली परिसरात जागा निश्चित करण्यात आली. मात्र मागील १० वर्षांपासून फायर स्टेशनचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे फायर स्टेशनसाठी पुन्हा किती काळ प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.मजीप्राचा पाणी देण्यास नकारआगीच्या घटनावर वेळीच नियंत्रण मिळविता यावे. यासाठी अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधिकारी सी.एल.पटले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. मात्र मजीप्राच्या अधिकाºयांनी पाणी उपलब्ध करुन देण्यास नकार दिला. त्यामुळे अग्नीशमन विभागाला पान लाईनमधील दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.