शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

त्या घटनेनंतरही धडा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:25 IST

शहरातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर २०१६ मध्ये घडली. या घटनेला आता दीड वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही नगर परिषदेच्या अग्नीश्मन विभागात सुधारणा झालेली नाही. बिंदलच्या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअग्नीशमन विभागात कर्मचाऱ्यांचा अभाव : सोशल मीडियावर रोष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर २०१६ मध्ये घडली. या घटनेला आता दीड वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही नगर परिषदेच्या अग्नीश्मन विभागात सुधारणा झालेली नाही. बिंदलच्या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याचे चित्र आहे.पान लाईनमधील दुकांनाना सोमवारी पहाटेच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन विभागाला पाणी आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागल्याची माहिती आहे. गोंदिया अग्नीशमन विभागाच्या चार वाहनाना वांरवार पाणी भरुन आणण्यासाठी गणेशनगर येथील अग्नीशमन विभागाच्या कार्यालय परिसरात जावे लागले.आग आटोक्यात आणण्यासाठी या चार वाहनानी २३ फेºया मारल्या. मात्र यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शहरातील अरुंद रस्ते आणि गल्यांमुळे चांगलीच अडचण झाली आहे. विशेष म्हणजे अग्नीशमन वाहनांच्या सोयीसाठी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी अग्नीशमन विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडण्याचा निर्णय घेतल्याने अग्नीशमन वाहनांमध्ये वेळीच पाणी भरुन आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. तर शहरातील अतिक्रमणाची समस्या अद्यापही कायम असल्याने अग्नीशमन विभागाचे वाहन घटनास्थळी पोहचण्यास मोठी अडचण जाते.ही आजची समस्या नसून बºयाच वर्षांपासूनची आहे. शहरात वांरवार आगीच्या घटना घडल्यानंतर सुध्दा नगर परिषदेकडून यावर उपाय योजना केल्या जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पान लाईनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विविध व्हॉटसअप ग्रुपवर सुध्दा बिंदलच्या घटनेनंतरही नगर परिषदेने धडा घेतला नसल्याची चर्चा सुरू झाली. अनेकांनी नगर परिषदेवर रोष व्यक्त केला.कर्मचाऱ्यांचा अभावनगर परिषदेच्या अग्नीशमन विभागात अद्यापही कर्मचाºयांची अनेक रिक्त पदे रिक्त आहेत. तर अजुनही जुन्याच वाहनाच्या भरोश्यावर या विभागाचा कारभार सुरू आहे. सध्या अग्नीशमन विभागात २८ कर्मचारी कार्यरत असून ते तीन पाळीत सेवा देत आहेत. एका पाळीत केवळ ९ कर्मचारी कार्यरत असतात. यामध्ये वाहन चालकाचा देखील समावेश असून चार वाहने एकाच वेळी गेल्यास केवळ पाच कर्मचाºयांच्या मदतीने आगीच्या घटनावर नियंत्रण मिळविण्यास मोठी अडचण जाते.फायर स्टेशनची प्रतीक्षागोंदिया नगर परिषदेला दुसऱ्या फायर स्टेशनसाठी रेलटोली परिसरात जागा निश्चित करण्यात आली. मात्र मागील १० वर्षांपासून फायर स्टेशनचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे फायर स्टेशनसाठी पुन्हा किती काळ प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.मजीप्राचा पाणी देण्यास नकारआगीच्या घटनावर वेळीच नियंत्रण मिळविता यावे. यासाठी अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधिकारी सी.एल.पटले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. मात्र मजीप्राच्या अधिकाºयांनी पाणी उपलब्ध करुन देण्यास नकार दिला. त्यामुळे अग्नीशमन विभागाला पान लाईनमधील दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.