शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

गुटखाबंदीनंतरही जिल्ह्यात केवळ दोन कारवाया

By admin | Updated: March 27, 2015 00:34 IST

राज्य शासनाने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी, खर्रा, आवेष्टित किंवा खुली असलेली किंवा विकलेली तंबाखू आणि सुपारी ..

गोंदिया : राज्य शासनाने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी, खर्रा, आवेष्टित किंवा खुली असलेली किंवा विकलेली तंबाखू आणि सुपारी यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्रीवर २० जुलै २०१४ पासून वर्षभराच्या कालावधीसाठी प्रतिबंध घातला. तशी अधिसूचना शासनाने १६ जुलै २०१४ रोजीच काढली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने केवळ दोनच कारवाया केल्या आहेत. १ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्यापासून वेगळे करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावरील सर्व कार्यालये गोंदिया येथे उघडणे सुरू झाले. मात्र केवळ अन्न व औषध विभागाच्या गोंदिया कार्यालयात ठणठणाट आहे. जिल्हा निर्मितीपासून आतापर्यंत सदर विभागाचे पदच भरण्यात आले नाही. नागपूर किंवा भंडारा विभागावर अतिरिक्त कार्यभार सोपवून कसेबसे अन्न व औषध प्रशासन सांभाळले जात आहे. डिसेंबर २०१४ पूर्वी भंडारा जिल्ह्यात चार कारवाया करण्यात आल्या. मात्र गोंदियात शून्य. जानेवारी २०१५ मध्ये गोंदियात केवळ दोन कारवाया करण्यात आल्या. हाच वर्षभराचा काय तो लेखाजोखा.गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुवासिक सुपारी, खर्रा, तंबाखू व सुपारीमिश्रित कोणतीही उत्पादने ग्राहकांच्या आरोग्यास अत्यंत अपायकारक आहेत. त्यांच्या प्रतिकूल परिणामामुळे भावी पिढ्यांच्या जणुकीय रचनेमध्ये फेरबदल होवू शकतो, असे विविध वैज्ञानिक अहवालांच्या तपासात दिसून आले आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासह समाजाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे शासनाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ३० (२) (अ) अन्वये अधिसूचना काढून वर्षभरासाठी निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीवर प्रतिबंध घातला आहे.मात्र संबंधित विभागाचे पदच गोंदियात नियमित नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदर पदार्थांची विक्री होताना आढळते. असे असतानाही कारवाई तर महिनोमहिने होत नाही. सध्या नागपूर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर गोंदिया जिल्ह्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मात्र अधिकच्या कार्यभारामुळे व एकाच वेळी दोन जिल्हे सांभाळणे अत्यंत कठीण असल्याने त्याचा परिणाम कारवायांवर होत आहे. गोंदियातील रिक्त पदांच्या भरतीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात धूळखात आहे. मात्र अद्याप त्याबाबतही काहीही प्रक्रिया झालेली नाही. (प्रतिनिधी)