शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

बिंदलच्या घटनेनंतरही धडा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:52 IST

२१ डिसेंबर २०१६ चा बुधवारचा दिवस गोंदियाच्या इतिहासात काळा दिवस ठरला. संपूर्ण गोंदिया पहाटेच्या साखरझोपेत असताना गोरेलाल चौकात मात्र एकच आगडोंब उठला होता.

ठळक मुद्देसुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष : नोटीस बजावून विभाग मोकळा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : २१ डिसेंबर २०१६ चा बुधवारचा दिवस गोंदियाच्या इतिहासात काळा दिवस ठरला. संपूर्ण गोंदिया पहाटेच्या साखरझोपेत असताना गोरेलाल चौकात मात्र एकच आगडोंब उठला होता. मुख्य चौकातील हॉटेल बिंदल आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. सर्वत्र एकच धावपळ सुरू होती. बाहेरच्या कडाक्याच्या थंडीतही या उष्ण ज्वाळांनी घटनेचे प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांच्या शरीरालाच नाही तर मनालाही चटके लागत होते. गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आगेने सर्वच जण हादरून गेले होते. ही आग जेवढी बाहेरून भयानक दिसत होती त्यापेक्षा कितीतरी पटींनी हॉटेलच्या आतून धगधगत होती. त्यात होरपळून आणि गुदमरून सात जीवांना नाहक प्राणाला मुकावे लागले. आताही तो संपूर्ण घटनाक्रम आठवला की अंगावर शहारे येतात.२१ डिसेबर २०१६ ची पहाट गोंदिया शहरवासीय कधीही विसरु शकणार नाहीत. गोरेलाल चौकातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागल्याने ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेला आता आता वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी नगर परिषद आणि प्रशासनाने कुठलाच धडा घेतलेला नाही. मागील वर्षभरात नगर परिषद अग्नीश्मन विभागाने केवळ हॉटेल संचालकांना नोटीस बजावण्यापलिकडे काहीच केले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे आगीच्या घटनेनंतरही हॉटेल बिंदल प्लाजाचे फायर आॅडिट केले नसल्याची माहिती आहे. नगर परिषदेच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार फायर आॅडिट करण्यासाठी शहरातील ७० ते ७५ लोकांना नोटीस बजाविण्यात आली. यात हॉटेल व्यावसायीक, क्लिनीक, बियर बार आदींचा समावेश आहे. नोटीसनंतर ५० जणांनी फायर आॅडिटची रिर्पोट सादर केली तर २८ जणांनी अद्यापही संबंधित विभागाकडे फायर आॅडिट रिर्पोट सादर केला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अग्नीश्मन विभागाने या सर्व संस्थानी अग्नीश्मन यंत्रे व आश्यक उपाय योजना केल्या किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.सर्वेक्षणानंतर सुरक्षा विषयक यंत्रसामुग्री न लावणाºया संचालकावर फायर अ‍ॅक्ट -५ अंतर्गत नोटीस बजावून कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात अग्नीशमन विभागाचे प्रभारी फायर अधिकारी शोभेलाल पटले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फायर आॅडिट करिता केवळ नोटीस बजावल्याचे सांगितले.कर्मचारी संख्या ७५ वरुन ३० वरयेथील अग्नीश्मन विभागात १९९५ मध्ये ७५ कर्मचारी कार्यरत होते. मात्र आता या विभागात केवळ ३० कर्मचारी कार्यरत आहेत. मागील २२ वर्षांत शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शिवाय व्यावसायीक प्रतिष्ठाणामध्ये सुध्दा वाढ झाली. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांची आणि अग्नीश्मन वाहनाची संख्या वाढविण्याची गरज होती. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे.आगीच्या घटनांमध्ये वाढशहरात मागील वर्षभरात आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत हा विभाग अद्यापही अपडेट झालेला नाही. या विभागात एका शिप्टमध्ये केवळ ७-८ कर्मचारी काम करतात. त्यातही या विभागाच्या कर्मचाºयांवर दुसरीच कामे सोपविली जातात. त्यामुळे एखाद्या वेळेस आगीची घटना घडल्यास तिथे वेळीच पोहचणे शक्य होत नाही. या समस्येने या विभागाचे कर्मचारी सुध्दा हैराण आहेत.अतिक्रमणाची समस्या कायमशहरातील मुख्य मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा काहींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आगीची घटना घडल्यास त्या ठिकाणी अग्नीश्मन वाहन पोहचण्यास मोठी अडचण जाते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करण्याची गरज आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही.अग्नीश्मन वाहन नादुरुस्तवर्षभरापूर्वी हॉटेल बिंदल प्लाजाला आग लागल्याची घटना घडली. तेव्हा गोंदिया अग्नीश्मन विभागाचे वाहन फार उशीराने घटनास्थळी पोहचले होते. त्यामुळे वेळेवर मदत मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. शहरातील अरुंद रस्त्यांमुळे अग्नीश्मन विभागाच्या कर्मचाºयांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी अग्नीशमन विभागाकडे २ मिनी टँकर, आणि २ वॉटर टँकर उपलब्ध होते. मागील बºयाच वर्षांपासून अग्नीश्मन विभागाला नवीन वाहन मिळालेले नाही. वर्षभरापूर्वी नादुरस्त अग्नीश्मन वाहनाची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. मागीेल काही वर्षांपासून या विभागाला कायम स्वरुपी फायर अधिकारी नाही.