शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नमाद महाविद्यालयात पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

गोंदिया : येथील गोंदिया शिक्षण संस्था संचलित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात ...

गोंदिया : येथील गोंदिया शिक्षण संस्था संचलित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने पर्यावरणाला कसे वाचवायचे, या विषयावर विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी डाॅ. एच. पी. पारधी होते. चर्चासत्राला प्राचार्य डाॅ. शारदा महाजन, डाॅ. किशोर वासनिक, डाॅ. शशिकांत चौरे व प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते. ऑनलाइन विद्यार्थी संवादात एम.ए. राज्यशास्त्राचे विद्यार्थी अमित गोपलानी, गौरी भेलावे, आलिया शेख, अंजली धुर्वे, विश्वनाथ उईके व तृप्ती बिरोले सहभागी झाले होते. जल, जंगल, प्राणी, पशू, पक्षी, खनिज पर्यावरणाच्या या घटकांचा प्रमुख समावेश असलेल्या पर्यावरणाला कसे वाचवायचे व त्या माध्यमातून नागरिकांना निरोगी आयुष्य मिळेल, यावर विचारमंथन करण्यात आले, तर प्रत्येकाने पर्यावरणाप्रति आपली जबाबदारी ओळखून आठवड्यातून एक दिवस पर्यावरणाच्या कामासाठी वेळ द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येकाला खांद्यावर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जीवन जगावे लागेल. ही वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन विश्वनाथ उके यांनी केले. आभार नेहा यादव यांनी मानले.

.......

पर्यावरणाच्या समस्या आणि त्यांचे निराकरण

इतिहास विभागाच्या वतीने ‘पर्यावरणाच्या समस्या आणि त्यांचे निराकरण’ या विषयावर डाॅ. कोंढा-कोसरे येथील महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक अरुण मोटघरे, अरुण अलेवार यांचे व पर्यावरण वाचविणे काळाजी गरज या विषयावर एमबी पटेल महाविद्यालय सालेकसा येथील प्रा. आश्विन खांडेकर यांचे ऑनलाइन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. पर्यावरणा समस्येवर साधक-बाधक चर्चा करून पर्यावरण वाचविणे कशी काळाची गरज आहे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा. योगेश भोयर व डाॅ. अंबादास बाकरे यांनी सहकार्य केले.

------------------------

प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन

पर्यावरणाची माहिती व्हावी व पर्यावरण विषयाची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याच्या दृष्टीने भूगोल विभागाच्या वतीने पर्यावरण विषयावर ५० प्रश्नांची प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेेतील दोन विजेत्या विध्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी भूगोल विभागाचे डाॅ. संतोष चोपकर व डाॅ. माया आंभोरे यांनी सहकार्य केले.