शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मंडईच्या मनोरंजनात समाजप्रबोधनाला बगल

By admin | Updated: October 19, 2014 23:39 IST

झाडीपट्टीची मंडई सर्वदूर प्रसिद्ध आहे. भाऊबीजेनंतर जिल्ह्यात गावोगावी मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा गावकरी मनसोक्त आनंद लुटतात.

गोंदिया : झाडीपट्टीची मंडई सर्वदूर प्रसिद्ध आहे. भाऊबीजेनंतर जिल्ह्यात गावोगावी मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा गावकरी मनसोक्त आनंद लुटतात. परंतु यानिमित्त विविध सरकारी कार्यक्रम, मोहिमांबद्दल जनजागृती व समाजप्रबोधन करण्याची सुवर्णसंधी असताना त्याबाबत कोणताही विभाग जागरूक असल्याचे दिसत नाही. विविध योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी अशा मंडईंचा योग्य वापर होऊ शकतो. यावर्षी कोणकोणता विभाग त्यासाठी पुढाकार घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दिवाळीनंतर जिल्ह्यातील प्रत्येक गावी मंडई भरविली जाते. या दिवसात शेतकऱ्यांच्या हाती धानाचे उत्पादन आले असते तर त्यांच्या हातात दोन पैसे खेळू लागतात. तीन-चार महिने शेतात राबून शेतकऱ्यांना उसंत मिळाली असते. त्यामुळे मंडईत थोडे मनोरंजन आणि मौजमजा करण्याचा सर्वांचा मूड असतो. यातच काही प्रबोधनपर नाटकांचेही आयोजन अनेक ठिकाणी केले जाते. शासनाच्या योजना किंवा मोहिमांची प्रसिद्धी या मंडईतून प्रभावीपणे होऊ शकते. परंतु त्यासाठी कोणत्याही विभागाकडून पुढाकार घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे.मंडईत गावकऱ्यांसाठी पाहुनपणाला येणारे लोकही मनाजोगी खरेदी करतात. हा मंडई उत्सव जवळपास महिनाभर चालतो. कार्तिक पौर्णिमेपर्यंत मंडईची धूम असते. ज्या गावी मंडई असते, त्या गावातील नागरिक आपल्या नातेवाईकांना मंडईचे निमंत्रण देतात. दिवसभर मंडईचा भरपूर आस्वाद घेतल्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडईनिमित्त प्रामुख्याने दंडार, नाटके, संगीतमय कार्यक्रम, कीर्तन, गोंधळ, तमाशा, लावणी या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहरातील नागरिकसुद्धा या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. मंडईत सादर करण्यात येणाऱ्या लोककलांना चांगला प्रतिसाद मिळत असतो. विशेष म्हणजे घराघरांत पोहोचलेल्या टीव्हीवर सर्व प्रकारचे मनोरंजन होत असले तरी मंडईची मजा काही औरच असते. यानिमित्त घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचा सामूहिकपणे आनंद लुटताना, त्यात गावातील सर्व मंडळी पूर्णपणे समर्पित होताना दिसतात. त्यामुळेच या कार्यक्रमांचा लोकांवर तेवढ्याच तीव्रपणे प्रभाव पडतो. त्यामुळे एखाद्या विषयावर जनजागृती करण्यासाठी किंंवा सरकारी कार्यक्रमांची, योजनांची माहिती देण्यासाठी ही मंडई म्हणजे मोठी पर्वणी असते. परंतु दुर्दैवाने जिल्हा प्रशासनासोबतच विविध विभाग त्याबाबत फारसा पुढाकार घेत नाही. ग्रामस्थांशी संवाद साधण्याचे मंडई उत्सव हे चांगले माध्यम असताना त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता त्यातून प्रबोधन साधल्यास शासनाच्या मोहिमा, अभियान बऱ्याच प्रमाणात यशस्वी होऊ शकते. अत्यंत कमी खर्चात प्रबोधन करता येणाऱ्या या उत्सवाकडे प्रशासन दुर्लक्ष का करते, हे न समजणारे कोडे आहे. (प्रतिनिधी)