शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राखीव जागेवर केले गावकऱ्यांनी अतिक्रमण

By admin | Updated: December 13, 2014 22:42 IST

शहर असो किंवा एखादे गाव मोकळी जागा दिसल्यास त्यावर अतिक्रमण केले जाते. असाच प्रकार जवळील ग्राम डुंडा येथील राखीव जागेवर काही गावकऱ्यांकडून केला जात आहे. गावातील मोकळ््या जागेवर

पांढरी : शहर असो किंवा एखादे गाव मोकळी जागा दिसल्यास त्यावर अतिक्रमण केले जाते. असाच प्रकार जवळील ग्राम डुंडा येथील राखीव जागेवर काही गावकऱ्यांकडून केला जात आहे. गावातील मोकळ््या जागेवर गावकऱ्यांनी धानाचे पुंजणे तयार केले आहे. यामुळे गावच्या त्या या जागेवर घाण होत असून गावचे वातावरणात प्रदूषित होत आहे. यावर ग्रामपंचायतने अतिक्रमण करणाऱ्या त्या व्यक्तींना नोटीस बजावले आहे. तर गावच्या राखीव जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून जागा मोकळी करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. ग्राम डुंडा येथील मुख्य भागातील राखीव जागेचे हे प्रकरण आहे. गवची ही जागा मोकळी असल्याने गावकरी विविध कार्यक्रम व कामानिमित्ताने या जागेचा वापर करतात. मात्र मागील काही दिवसांपासून गावातीलच काहींनी या मोकळ््या जागेवर धानाचे पुंजणे व खत तयार करण्यासाठी खड्डे खणून अतिक्रमण केले आहे.या प्रकारामुळे मात्र विविध कामांसाठी वापरण्यात येत असलेल्या या जागेवर घाण होत आहे. शिवाय या घाणीमुळे गावचे वातावरण प्रदुषीत होत आहे.विशेष म्हणजे या जागेवरच एक विहीर असून त्या विहीरीचे पाणी गावकरी वापरतात. मात्र या घाणीमुळे विहीरीचे पाणीही दुषीत होत असून तेच पाणी गावकऱ्यांना वापरावे लागत असल्याचेही गावकरी बोलत आहेत. एका वर्षापुर्वी अतिक्रमणाचा असाच प्रकार घडला होता व त्यावर ग्राम पंचायत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती. त्याची तक्रार डुग्गीपार पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. मात्र एवढे होऊनही गावकरी काही ऐकण्यास तयार नाहीत व अतिक्रमणाचा प्रकार सुरूच आहे. गावच्या राखीव जागेवर अतिक्रमण होत असल्याने या प्रकाराला घेऊन गावकऱ्यांत रोष निर्माण आहे. तर या प्रकारावर ग्राम पंचायत कार्यालयाने संबंधीतांना नोटीस बजावले आहे. मात्र जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. एकीकडे शासन गावागावांत स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र येथे गावकरीच गावच्या जागेवर अतिक्रमण करून गावात घाण पसरविण्याचा प्रकार करीत आहे. असे असतानाही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने गावकरी आश्चर्य व रोष व्यक्त करीत आहेत. तरी ग्राम पंचायत कार्यालयाने येथील धानाचे पुंजने, तणस, खताचे खड्डे हटवून गावात होत असलेल्या घाणीवर आळा घालावा. तसेच अतिक्रमण व घाण पसरविण्याचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. (वार्ताहर)