शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

राखीव जागेवर केले गावकऱ्यांनी अतिक्रमण

By admin | Updated: December 13, 2014 22:42 IST

शहर असो किंवा एखादे गाव मोकळी जागा दिसल्यास त्यावर अतिक्रमण केले जाते. असाच प्रकार जवळील ग्राम डुंडा येथील राखीव जागेवर काही गावकऱ्यांकडून केला जात आहे. गावातील मोकळ््या जागेवर

पांढरी : शहर असो किंवा एखादे गाव मोकळी जागा दिसल्यास त्यावर अतिक्रमण केले जाते. असाच प्रकार जवळील ग्राम डुंडा येथील राखीव जागेवर काही गावकऱ्यांकडून केला जात आहे. गावातील मोकळ््या जागेवर गावकऱ्यांनी धानाचे पुंजणे तयार केले आहे. यामुळे गावच्या त्या या जागेवर घाण होत असून गावचे वातावरणात प्रदूषित होत आहे. यावर ग्रामपंचायतने अतिक्रमण करणाऱ्या त्या व्यक्तींना नोटीस बजावले आहे. तर गावच्या राखीव जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून जागा मोकळी करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. ग्राम डुंडा येथील मुख्य भागातील राखीव जागेचे हे प्रकरण आहे. गवची ही जागा मोकळी असल्याने गावकरी विविध कार्यक्रम व कामानिमित्ताने या जागेचा वापर करतात. मात्र मागील काही दिवसांपासून गावातीलच काहींनी या मोकळ््या जागेवर धानाचे पुंजणे व खत तयार करण्यासाठी खड्डे खणून अतिक्रमण केले आहे.या प्रकारामुळे मात्र विविध कामांसाठी वापरण्यात येत असलेल्या या जागेवर घाण होत आहे. शिवाय या घाणीमुळे गावचे वातावरण प्रदुषीत होत आहे.विशेष म्हणजे या जागेवरच एक विहीर असून त्या विहीरीचे पाणी गावकरी वापरतात. मात्र या घाणीमुळे विहीरीचे पाणीही दुषीत होत असून तेच पाणी गावकऱ्यांना वापरावे लागत असल्याचेही गावकरी बोलत आहेत. एका वर्षापुर्वी अतिक्रमणाचा असाच प्रकार घडला होता व त्यावर ग्राम पंचायत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती. त्याची तक्रार डुग्गीपार पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. मात्र एवढे होऊनही गावकरी काही ऐकण्यास तयार नाहीत व अतिक्रमणाचा प्रकार सुरूच आहे. गावच्या राखीव जागेवर अतिक्रमण होत असल्याने या प्रकाराला घेऊन गावकऱ्यांत रोष निर्माण आहे. तर या प्रकारावर ग्राम पंचायत कार्यालयाने संबंधीतांना नोटीस बजावले आहे. मात्र जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. एकीकडे शासन गावागावांत स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र येथे गावकरीच गावच्या जागेवर अतिक्रमण करून गावात घाण पसरविण्याचा प्रकार करीत आहे. असे असतानाही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने गावकरी आश्चर्य व रोष व्यक्त करीत आहेत. तरी ग्राम पंचायत कार्यालयाने येथील धानाचे पुंजने, तणस, खताचे खड्डे हटवून गावात होत असलेल्या घाणीवर आळा घालावा. तसेच अतिक्रमण व घाण पसरविण्याचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. (वार्ताहर)