शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

नदीकाठालगतच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:02 IST

आमगाव खुर्द (सालेकसा) गावाबाहेर रस्त्यालगत नदीकाठालगतच्या परिसरात मागील काही दिवसांपासून अतिक्रमण करुन बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे. पुराचा धोका असलेल्या भागातच झोपड्या व पक्के बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या बांधकामाला पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासर्व प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागात बांधल्या झोपड्या : काहींनी केले पक्के बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आमगाव खुर्द (सालेकसा) गावाबाहेर रस्त्यालगत नदीकाठालगतच्या परिसरात मागील काही दिवसांपासून अतिक्रमण करुन बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे. पुराचा धोका असलेल्या भागातच झोपड्या व पक्के बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या बांधकामाला पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासर्व प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.आमगाव खुर्द येथे गावात मांस विक्रेत्यांची दुकाने वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होती. यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या त्रासापासून मुक्ती मिळावी, यासाठी मांस विक्रेत्यांना गावाबाहेर स्थायी स्वरुपात जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आमगाव मार्गावरील जागा निश्चित करण्यात आली. यानंतर काही मांस विक्रेत्यांनी आपल्या सोयीनुसार जागा पकडून त्यावर कच्चे व पक्के बांधकाम करुन दुकाने थाटली. दरम्यान याच गोष्टीचा फायदा घेत काहींनी नदीकाठालगत असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येत असून पुलावरुन सुध्दा चार ते पाच फूट पाणी असते. त्यामुळे याचा या अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टयांना व दुकानाना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठालगतच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन कच्चे व पक्के बांधकाम केले जात असताना या प्रकाराकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांची हिम्मत वाढत चालली आहे. पावसाळ्यात पूर येऊन त्याचा फटका या अतिक्रमणधारकांना बसल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केले अतिक्रमणआमगाव मार्गावरील शासकीय जागेवर अतिक्रमण करुन कच्चे व पक्के बांधकाम केले जात आहे. बांधकाम करणाऱ्यांमध्ये काही सेवानिवृत्त कर्मचाºयांचा सुध्दा समावेश आहे. त्यामुळे या सर्वांना कोणत्या आधारावर पक्के बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली. असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.प्रशासन दखल घेणार का?शासकीय जागेवर कच्चे व पक्के बांधकाम करण्याचा सपाटा मागील काही महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे वेळीच याची दखल घेवून कार्यवाही न केल्यास भविष्यात ही समस्या बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन या सर्व प्रकाराची दखल घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.