शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारी धान पिकावर अळींचे अतिक्रमण

By admin | Updated: October 27, 2014 22:38 IST

कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला अहे. धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात बहुतांश पिके पस्त झाली असून काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

रावणवाडी : कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला अहे. धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात बहुतांश पिके पस्त झाली असून काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भारी धानपिकावर मावा अळींनी आक्रमण केले आहे.रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी विविध कंपन्यांची महागडी किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र हवामानाच्या लहरीपणामुळे रोग आटोक्यात येताना दिसून येत नाही. कृषी विभागाने ग्रामपंचायत स्तरावर सवलतीच्या दरात किटकनाशक औषधे उपलब्ध करवून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यातून स्वत:च्या उत्थानासाठी सर्वतोपरी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र निसर्गाच्या दृष्टचक्रात फसगत होवून बळीराजा कर्जाच्या कचाट्यात सापडत आहे. अनेक वर्षापासून कधी पूर-महापूर तर कधी अवकाळी पाऊस, तर कधी कोरडा दुष्काळ, त्यात भर म्हणून विविध रोगांचे धानपिकावर आक्रमण अशा कालचक्राचा सामना त्यांना करावा लागत आहे. बळीराजाला शेतीसाठी खर्च अधिक तर त्या बदल्यात उत्पन्न कमी, अशी परिस्थिती आहे. मात्र धान उत्पादक बळीराजा आशावादी असल्याने आज नाही तर उद्या निसर्ग साथ देईल व कर्जाच्या बोझ्याची परतफेड करू, अशा आशेवर दरवर्षी तो शेती करतच आहे.यावर्षी पावसाळाच्या हंगामाला सुरूवात होऊनही दिड महिने पावसाचा एक थेंबही पडला नाही. शेतात पेरलेले धान जागीच फस्त झाले असून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कशीबशी रोवणी केली. मात्र हवा तसा पाऊस या हंगामात न आल्याने बळीराज्याची चिंता अधिकच वाढली. काही ठिकाणी तर पिके वाळून गेलीत, कुठे सिंचनाची अपुरी सोय आहे. त्या ठिकाणची पिके पाण्याअभावी करपून गेलीत. तर सध्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून विविध किडी, मावा अशा अनेक रोगांनी ग्रासले आहे. तरी बळीराजा सर्वकस प्रयत्न करून पीक वाचवण्याचा प्रयत्नात गुंतला आहे. या पिकावरील रोगांवर दुबार-तिबार किटनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नाही. त्यामुळे शासनाने समस्येची दखल घेऊन कृषी विभागामार्फत सवलतींच्या दरात औषधी उपलब्ध कराव्यात, तसेच ग्रामपंचायत स्तरावरून खत वितरण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)