शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

विद्यार्थ्यांची प्रतिभा ओळखून प्रोत्साहित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:09 IST

प्रतिभा ही केवळ शहरी विद्यार्थ्यांमध्येच असते असे नाही तर ग्रामीण भागातही आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांतून अनेक विद्यार्थी घडले. आजही उच्चपदावर असलेले बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले.

ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रम : जि.प. विद्यालयाचे स्नेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : प्रतिभा ही केवळ शहरी विद्यार्थ्यांमध्येच असते असे नाही तर ग्रामीण भागातही आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांतून अनेक विद्यार्थी घडले. आजही उच्चपदावर असलेले बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले. त्यामुळे जि.प.च्या शाळा सर्वोत्तम आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी केवळ आकर्षणाकडे न जाता पाल्यांना जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षण द्यावे, असे आवाहन नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त आर.एच. ठाकरे यांनी केले.जिल्हा परिषद हायस्कुल तथा जि.प. प्राथमिक शाळा क्र. २ अर्जुनी-मोरगावच्या त्रिदिवसीय स्रेहसंमेलनाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर, मार्गदर्शक म्हणून प्रशांत गाडे, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, पं.स.उपसभापती आशा झिलपे, शाळा समितीचे अध्यक्ष व जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, देवेंद्र रहेले, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार, गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर, प्राचार्य डी.के. मस्के, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. कापगते, शाळा समिती सदस्य अ‍ॅड. राजेश पालीवाल, शंकर लोधी, विजय पशिने, प्रतिभा नाकाडे, शाळा नायक सुशांत तागडे, नंदीनी मेश्राम उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांना घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे. शैक्षणिक अडचणी आहेत. यातून मार्ग काढत जे कमी असेल ते पूर्ण करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यावर शिक्षकांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे.विद्यार्थ्यांमध्ये पुढे येवून बोलण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांची पारख करुन त्यांचा ज्याकडे अधिक कल दिसतो त्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रशांत गाडे म्हणाले हे स्पर्धेचे युग आहे. भविष्य घडविण्यासाठी विविध दालने खुली आहेत.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी शालेय शिक्षण सुरू असतानाच केली पाहिजे. स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके वाचनापेक्षा स्वत:ला प्रश्न पडली पाहिजेत. ज्यांना प्रश्न पडत नाहीत ते यशस्वी होत नाही. विद्यार्थ्यांना प्रत्येक बाब जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. यातूनच जिज्ञासा व चिकित्सक बुद्धी वाढत असल्याचे म्हणाले.