शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

विजेच्या लंपडावाने ग्रामीण नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 9, 2017 00:57 IST

मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे.

अधिकाऱ्यांना निवेदन : दोन महिन्यांपासून वाढला प्रकार लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा-बुजरुक : मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे. आठ दिवसांपासून ग्रामीण भागात ऐन दुपारच्या वेळेत भारनियमन केले जात आहे.भारनियमनाची वेळ सकाळी ६ वाजतापासून १० वाजतापर्यंत ठेवावी, यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा तिरोडाच्यावतीने तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून विज पुरवठा कधीही खंडीत होत असते. रात्र असो किंवा दिवस, वेळेचा कुठलाच बंधन न ठेवता मनमर्जीने विद्युत पुरवठा बंद केला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असताना सकाळी १० वाजतापासून तापमानाचा पारा चढत आहे, घरात राहणे कठीण होत आहे. परिसरातील लघु, कुटीर उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.लहान मुले, म्हातारे व्यक्ती सुध्दा उन्हामुळे घाबरले असतात. याच वेळेत विद्युत विभाग सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ४ वाजतापर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवतात. रात्री ७ वाजतापासून अजून विजेचा लंपडाव सुरु असतो. यात ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाले आहेत. या संदर्भात विज वितरण कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रार केली मात्र या गंभीर समस्येकडे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले आहे. तिरोडा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. एप्रिल, मे महिना तापत आहे. पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. दुपारच्यावेळीही भारनियमन होत आहे. उन्हामुळे अंगाची लाई-लाई होत असताना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात ६ तास विज पूरवठा खंडीत केला जातो. भर उन्हात दुपारच्या वेळी भारनियमन केले जात आहे. सतत होणारे भारनियमन बंद करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष रफीक शेख यांच्या नेतृत्वात तहसीलदार कुंभरे व नायब तहसीलदार पटले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता तिरोडा यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)