शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

विजेच्या लंपडावाने ग्रामीण नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 9, 2017 00:57 IST

मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे.

अधिकाऱ्यांना निवेदन : दोन महिन्यांपासून वाढला प्रकार लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा-बुजरुक : मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे. आठ दिवसांपासून ग्रामीण भागात ऐन दुपारच्या वेळेत भारनियमन केले जात आहे.भारनियमनाची वेळ सकाळी ६ वाजतापासून १० वाजतापर्यंत ठेवावी, यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा तिरोडाच्यावतीने तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून विज पुरवठा कधीही खंडीत होत असते. रात्र असो किंवा दिवस, वेळेचा कुठलाच बंधन न ठेवता मनमर्जीने विद्युत पुरवठा बंद केला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असताना सकाळी १० वाजतापासून तापमानाचा पारा चढत आहे, घरात राहणे कठीण होत आहे. परिसरातील लघु, कुटीर उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.लहान मुले, म्हातारे व्यक्ती सुध्दा उन्हामुळे घाबरले असतात. याच वेळेत विद्युत विभाग सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ४ वाजतापर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवतात. रात्री ७ वाजतापासून अजून विजेचा लंपडाव सुरु असतो. यात ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाले आहेत. या संदर्भात विज वितरण कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रार केली मात्र या गंभीर समस्येकडे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले आहे. तिरोडा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. एप्रिल, मे महिना तापत आहे. पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. दुपारच्यावेळीही भारनियमन होत आहे. उन्हामुळे अंगाची लाई-लाई होत असताना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात ६ तास विज पूरवठा खंडीत केला जातो. भर उन्हात दुपारच्या वेळी भारनियमन केले जात आहे. सतत होणारे भारनियमन बंद करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष रफीक शेख यांच्या नेतृत्वात तहसीलदार कुंभरे व नायब तहसीलदार पटले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता तिरोडा यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)