शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

विजेच्या लंपडावाने ग्रामीण नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 9, 2017 00:57 IST

मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे.

अधिकाऱ्यांना निवेदन : दोन महिन्यांपासून वाढला प्रकार लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा-बुजरुक : मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे. आठ दिवसांपासून ग्रामीण भागात ऐन दुपारच्या वेळेत भारनियमन केले जात आहे.भारनियमनाची वेळ सकाळी ६ वाजतापासून १० वाजतापर्यंत ठेवावी, यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा तिरोडाच्यावतीने तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून विज पुरवठा कधीही खंडीत होत असते. रात्र असो किंवा दिवस, वेळेचा कुठलाच बंधन न ठेवता मनमर्जीने विद्युत पुरवठा बंद केला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असताना सकाळी १० वाजतापासून तापमानाचा पारा चढत आहे, घरात राहणे कठीण होत आहे. परिसरातील लघु, कुटीर उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.लहान मुले, म्हातारे व्यक्ती सुध्दा उन्हामुळे घाबरले असतात. याच वेळेत विद्युत विभाग सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ४ वाजतापर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवतात. रात्री ७ वाजतापासून अजून विजेचा लंपडाव सुरु असतो. यात ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाले आहेत. या संदर्भात विज वितरण कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रार केली मात्र या गंभीर समस्येकडे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले आहे. तिरोडा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. एप्रिल, मे महिना तापत आहे. पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. दुपारच्यावेळीही भारनियमन होत आहे. उन्हामुळे अंगाची लाई-लाई होत असताना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात ६ तास विज पूरवठा खंडीत केला जातो. भर उन्हात दुपारच्या वेळी भारनियमन केले जात आहे. सतत होणारे भारनियमन बंद करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष रफीक शेख यांच्या नेतृत्वात तहसीलदार कुंभरे व नायब तहसीलदार पटले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता तिरोडा यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)