शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

केशोरी येथील पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

केशोरी : विद्युत वितरण कंपनीने नोटीस बजावून केशोरी येथील सार्वजनिक पथदिव्यांची वीज गेल्या पंधरा दिवसांपासून खंडित केल्याने संपूर्ण ...

केशोरी : विद्युत वितरण कंपनीने नोटीस बजावून केशोरी येथील सार्वजनिक पथदिव्यांची वीज गेल्या पंधरा दिवसांपासून खंडित केल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे.

राज्य शासनाने ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून सार्वजनिक पथदिव्यांची थकीत विद्युत देयके भरण्याचे आदेश जारी केल्यामुळे पथदिव्यांची विद्युत देयके भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असताना त्यांना हात वर करण्याची संधी शासनानेच देऊन कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर देऊन ग्रामपंचायतींना अडचणीत आणले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील सार्वजनिक पथदिव्यांचे विद्युत बिल २००६ पासून जिल्हा परिषदेने थकीत केल्यामुळे पथदिव्यांच्या विद्युत बिलाची रक्कम प्रचंड फुगली आहे. २३ जून रोजी ग्रामविकास विभागाने १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिल्याने पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीपेक्षा थकीत पथदिव्यांची रक्कम जास्त असल्यामुळे पथदिव्यांचे बिल भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावविकासाची कामे करणे अपेक्षित असून त्यादृष्टीने खर्चाचे नियोजन केले जाते. ऐनवेळी शासनाने पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणा ग्रामपंचायतेने करावा असा निर्णय घेऊन ग्रामपंचायतींना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप सरपंच तालुका संघटना अर्जुनी मोरगाव यांनी केला आहे. पथदिव्यांची थकीत देयके पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेने भरावीत, असा पवित्रा सरपंच संघटनेने घेऊन पथदिव्यांचे विद्युत बिल भरण्यास ग्रामपंचायतींनी नकार दिला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेला पथदिव्यांचा विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवण्यासाठी केशोरीचे सरपंच नंदू पाटील गहाणे संघर्ष करीत आहेत. परंतु अजूनही पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिल भरण्याचा तिढा कायम आहे.

कोट ....

‘पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल ग्रामपंचायत भरणार नाही. त्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

- नंदू पाटील गहाणे, सरपंच केशोरी.