शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

वीजेच्या दाबाने उपकरणे, वायरिंग जळाली

By admin | Updated: March 18, 2016 02:07 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गंगाझरी (एकोडी) येथील सहायक अभियंता कार्यालयांतर्गत काचेवानी ...

जीवित हानी टळली : नागरिकांचे १५ ते २० लाखांचे नुकसान काचेवानी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गंगाझरी (एकोडी) येथील सहायक अभियंता कार्यालयांतर्गत काचेवानी येथे अचानक वाढलेल्या विद्युत दाबामुळे गावातील एक मोहल्ला वगळता सर्व गावातील बहुतांश लोकांचे वीजेवरील ेसाहित्य जळाले. यात १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले.काचेवानी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळ महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर लागले आहे. १५ मार्च २०१६ ला सायंकाळी ७ वाजता गावात अचानक विद्युत दाब वाढला. यावेळी क्रिकेट मॅच सुरू असल्याने सर्वाच्या घरी विद्युत उपकरणे सुरू होती. ज्यात टीव्ही, फ्रिज, पंखे, कुलर आणि घरची वायरिंग जळाल्याची माहिती गावकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.या व्यतिरीक्त घरी फिट केलेली वायरिंगही जळाली आहे. यामुळे एकूण १५ ते २० लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. ट्रान्सफार्मरच्या केबलची दुरूस्ती मराविवि कंपनीद्वारे करण्यात आली होती. परंतू घातलेला केबल हा निकृष्ट दर्जाचा असावा असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला. यापूर्वी या डीपीमध्ये अनेकदा फ्युज उडाल्याच्या घटना घडत आहेत. अनेक वेळा फ्युज वायरची व्यवस्था विद्युत विभागाने केली नसल्याने वायर सोलून जाड ताराने फ्यूज सुरू करती असतात. यामुळेच विद्युत दाब वाढताच त्याचा परिणाम घरच्या विद्युत पुरवठ्यावर आणि उपकरणांवर पडून गावकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.डीपीवर फ्युज वायराचा उपयोग करण्यात आला असता तर डीपीवरील दाब वाढताच फ्यूज उडाला असता. परंतु जाड वायर असल्याने फ्युज उडाला नाही व दाबाचा झटका सर्व घरावर पोहोचला, असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. काचेवानीमध्ये विद्युत दाब वाढल्याने ग्राहकांचे नुकसान झाले हे खरे असले तरी विद्युत कनेक्शनच्या ठिकाणी अनेकांच्या घरी एलसीडी नसल्याने वाढलेला दाब हा सरळ कनेक्शनवर गेला आणि त्यातून विद्युत उपकरणांचे नुकसान झाले असल्याचे गंगाझरीचे (एकोडी) सहायक अभियंता अमित एस.चवरे यांनी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व सरपंच यांने पती उमाशंकर चौधरी यांना दूरध्वनीवरून सांगितले. यासंबंधी मिळाल्या माहितीनुसार, एबी फ्यूजची व्यवस्था नव्या डीपीमध्ये आहे. परंतु जुन्या डीपीमध्ये नसल्याने असे प्रकार घडू शकतात, असेही बोलले जात आहे. विद्युत विभागाने अशा प्रकारची पुनरावृत्ती अन्यत्र होवू नये याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा वीज ग्राहक करीत आहेत.बल्ब फुटण्याच्या आवाजाने दहशतघरच्या फिटिंगचे वायर जळाल्याने बल्ब जोराच्या आवाजात फुटल्याने घरच्या परिवारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्युत दाबाच्या नुकसानीमध्ये सर्वाधिक नुकसान विजय असाटी, प्रभू जांभूळकर, परमानंद कटरे, रवि कुंभरे आणि भोजराज पारधी सहीत शेकडो वीज ग्राहकांचे झाले आहे. विद्युत डीपीकडे दुर्लक्षगावकऱ्यांनी विद्युत विभागावर आक्षेप नोंदविताना सांगितले, गावातील डीपीला फाटक नाहीत, पूर्णत: उघडी असल्याने कोणीही त्यात काहीही करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा भुर्दंड सर्वांना सोसावा लागतो. विद्युत विभागाच्या या हलगर्जीपणामुळे जीवित हानी होवू शकते. त्यामुळे याकडे जातीने लक्ष द्यावे, असेही नागरिकांनी बोलून दाखविले. मोठी दुर्घटना टळली विद्युत दाब वाढलेला होता त्यावेळी त्याची क्षमता ४४० व्होल्टच्यावर असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. वायरींग फटाक्याच्या वातीप्रमाणे जळत असल्याने अनेक घरी गोठ्यात जनावरांचा चारा, तणस भरलेले होते. अशा वेळी घराला किंवा गोठ्याला आग लागली असती तर गावात भयावह दुर्घटना घडली असती. मात्र यावेळी कोणत्याही शेतकऱ्यांने घरी तणस आणलेले नव्हते.