शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST

मुंडीकोटा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन शासनाने दीड वर्षापासून संपूर्ण शाळा बंद ठेवल्या आहेत. या महामारीचा विद्यार्थ्यांच्या ...

मुंडीकोटा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन शासनाने दीड वर्षापासून संपूर्ण शाळा बंद ठेवल्या आहेत. या महामारीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अत्यंत विपरीत परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला. पण साधनाअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण परिसरातील प्राथमिक शाळा नियमित पूर्ण उपस्थितीने सुरु कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर देण्यात आला. परंतु ग्रामीण दुर्गम भागात राहणाऱ्या तसेच गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, शोषीत वंचित घटकातीलच नव्हे तर मध्यमवर्गीय कुटूंबातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचू शकले नाही ही वास्तविकता आहे. त्यामुळे मागील दीड वर्षापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णत: टळलेला आहे. २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात पहिलीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली शाळा आणि शिक्षकही पाहिलेले नाहीत. शाळा बंद पण शिक्षकांची सेवा सुरुच विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतांना मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळेत येत असतात. दरम्यानच्या काळात शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत अनेक शिक्षकांच्या सेवा अधिग्रहीत केल्याने शिक्षकांनी कोरोना सबंधाने सोपविण्यात आलेली सर्व कामे सातत्याने केलेली आहेत. अजूनही अनेक शिक्षक कर्तव्यावर आहेत. यावेळी कोरोना स्थिती बरीच कमी झाली आहे. शासनाने शिथीलता दिली असून व्यवहारी सुरळीत व्हायला लागले आहेत. बाजारपेठ उघडल्या आहेत. त्यामुळे निकषाच्या आधारे इयत्ता पहिली ते आठवीच्या सुरु करण्याची मागणी ग्रामीण भागात होत आहे.